शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
3
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
4
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
5
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
6
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
7
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
8
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
9
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
10
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
11
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
12
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
13
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
14
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
15
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
16
आधी केस गळाले, नंतर नख; आता लोकांच्या हाताला पडताहेत भेगा; बुलढाणा जिल्ह्यातील गावात भीतीचे वातावरण
17
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
18
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
19
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
20
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातून हंगामी, कंत्राटी कामगार हद्दपार

By admin | Updated: August 11, 2015 03:12 IST

कंत्राटी कामगारांच्या भरवशावर चालणारा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा डोलाराही दोलायमान झाला आहे. हंगामी आणि कंत्राटी पद्धतीनेही कामगारांची नियुक्ती करू नये, असा आदेश प्राधिकरणाच्या

-  विलास गावंडे,  यवतमाळकंत्राटी कामगारांच्या भरवशावर चालणारा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा डोलाराही दोलायमान झाला आहे. हंगामी आणि कंत्राटी पद्धतीनेही कामगारांची नियुक्ती करू नये, असा आदेश प्राधिकरणाच्या सदस्य सचिवांनी काढला आहे. मात्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यकक्षेतील अभियंता संवर्गातील पदे भरण्यास मुभा देण्यात आली आहे. ‘कमवा आणि चालवा’ या तत्त्वावरच सध्या प्राधिकरणाचा कारभार सुरू आहे. योजना राबविण्यासाठी आणि चालविण्यासाठी शासनाकडून कुठलेही अनुदान मिळत नाही. एवढेच काय, वेतनासाठीही निधी दिला जात नाही. गेल्या २० वर्षांत प्राधिकरणाची आर्थिक स्थिती अतिशय दयनीय झाली आहे. त्यामुळेच विविध कारणांमुळे रिक्त झालेली आणि नव्याने कुठलीही पदे भरण्यास अनिश्चित काळासाठी पूर्णत: बंदी घालण्यात आली आहे. १ मार्च २००० च्या आदेशानुसार अ, ब, क आणि ड या गटातील सर्व संवर्गाची पदे सरळसेवेने न भरण्याचा आदेश काढण्यात आला होता. प्राधिकरणाच्या जवळपास २५ योजनांवर एक हजार २०० कंत्राटी कामगार कार्यरत आहेत.सेवानिवृत्ती, स्वेच्छानिवृत्ती, राजीनामा, मृत्यू आदी कारणांमुळे रिक्त झालेल्या जागा भरल्या गेल्या नाहीत. परिणामी प्राधिकरणात कर्मचाऱ्यांचा तुटवडा निर्माण झाला. यावर उपाय म्हणून हंगामी, कंत्राटी कामगारांची नियुक्ती करून त्यांच्यावर विविध प्रकारची जबाबदारी सोपविण्यात आली. संगणक चालक, पंपिंग, मीटर रीडिंग, पाण्याचा वॉल सुरू-बंद करणे, शिपाई आदी कामांसाठी कंत्राटी कामगार घेण्यात आले. त्यांना प्राधिकरणामार्फतच मानधन दिले जात होते. केवळ चार ते पाच हजार रुपयांवर त्यांना किमान दहा ते बारा तास काम करावे लागत होते. प्राधिकरणाला मानधन देणेही झाले जड-प्राधिकरणाला या कर्मचाऱ्यांचे मानधन देणेही जड चालले आहे. कंत्राटी आणि हंगामी कामगारांना ठेवायचेच नाही, असा आदेशच काढण्यात आला आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने नोकरभरती करू नये, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे. -आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल, अशी तंबीही त्यात देण्यात आली आहे. त्यामुळे कंत्राटी कामगार करीत असलेली कामे कोण करणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे.