शहरं
Join us  
Trending Stories
1
तिकडे पाकिस्तान करतोय बॉम्बिंग, इकडे भारतानं अफगाणिस्तानला पाठवली मोठी मदद; तालिबान सरकार खुश
2
मनमोहनसिंग सरकारमधील कोळसामंत्री श्रीप्रकाश जायसवाल यांचे निधन, कानपूरमधून तीन वेळा झाले होते खासदार
3
डीके शिवकुमार यांच्या आमदारांशी गाठीभेटी; उद्या सकाळी मुख्यमंत्री सिद्धरामय्यांसोबत ब्रेकफास्ट करणार...
4
११ जहाल नलक्षवाद्यांचे गोंदिया पोलिसांसमोर आत्मसमर्पण; हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षल चळवळीला हादरा
5
कांदा निर्यात धडाम...! केंद्राचे धोरण आड आले;  बांगलादेश, सौदी अरब सारख्या देशांनी फिरवली पाठ
6
अविस्मरणीय अन् ऐतिहासिक! PM मोदींच्या हस्ते गोव्यात ७७ फूट उंच 'श्रीराम मूर्ती'चे अनावरण
7
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
8
५ राजयोगात १४१ दिवसांनी शनि मार्गी: ९ राशींचे कल्याण, सुख-समृद्धीचे वरदान; सौभाग्य-यश-लाभ!
9
“काँग्रेसमध्ये काही राहिले नाही, वडेट्टीवारांनी खांद्याला धनुष्यबाण लावावा”; कुणी दिली ऑफर?
10
Ayush Mhatre Century : षटकार-चौकारांची 'बरसात'; आयुष म्हात्रेचा २०० च्या स्ट्राइक रेटसह शतकी धमका!
11
भारताची क्षेपणास्त्र चाचणीची घोषणा, हिंदी महासागरात चौथे चिनी 'हेरगिरी जहाज' दाखल
12
SMAT 2025: अर्जुन तेंडुलकरची हवा! पहिल्या स्पेलमध्ये ५ धावांत २ विकेट्स घेत लुटली मैफील
13
सर्वांनी वयाच्या 30 व्या वर्षापूर्वीच जाणून घ्यायला हवं हे 'सीक्रेट'! असं करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग; तयार होईल मोठा निधी, आनंदात जगाल म्हातारपणी
14
गौतम गंभीरवर बीसीसीआय नाराज, कसोटी हरल्यानंतर जे बोलला, ते खटकले... 
15
Thailand Flood : हाहाकार! थायलंडमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस; १४५ जणांचा मृत्यू, ३६ लाख लोकांना फटका
16
धक्कादायक! अनियंत्रित कार तलावात कोसळली, चालक बेशुद्ध पडला, नाविक देवदूत बनून आला
17
नेपाळने भारताला डिवचले; 100 रुपयांच्या नवीन नोटेवर भारताचा भूभाग आपला दाखवला
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ २ दिवसांत सुटली; लग्नानंतर नवरदेवाचा बाथरुममध्ये संशयास्पद मृत्यू
19
चीनच्या शेजारी देशाने प्रचंड सोने घेतले; एवढे महाग असले तरी..., जगातील सर्वात मोठा खरेदीदार ठरला
20
भारताच्या अर्थव्यवस्थेची ताकद वाढली, दुसऱ्या तिमाहीत देशाचा जीडीपी ८.२% वाढला
Daily Top 2Weekly Top 5

ठेकेदारांची मनमानी, नगरसेवकांची खाबूगिरी

By admin | Updated: July 15, 2017 02:59 IST

डहाणू नगरपरिषद प्रशासनाच्या सुस्त व उदासीन कारभारामुळे डहाणू शहरात कोटयावधींची विकासकामे अर्धवट स्थितीत आहेत

शौकत शेख । लोकमत न्यूज नेटवर्कडहाणू : डहाणू नगरपरिषद प्रशासनाच्या सुस्त व उदासीन कारभारामुळे डहाणू शहरात कोटयावधींची विकासकामे अर्धवट स्थितीत आहेत. शासनाच्या विविध योजनेतून मंजूर झालेली विकासकामे नगरपरिषदेच्या आशिर्वादाने ठेकेदार आपल्या सोयीनुसार करीत असल्याने पुरती गैरसोय झाली आहे. त्यातच या विरोधात नगरसेवक ब्र सुद्धा काढत नसल्याने त्यांच्यात साटेलोट आहे की, काय अशी परिस्थिती आहे. चौकशीच्या विळख्यात अडकलेल्या डहाणू नगरपरिषदेची लोकसंख्या ६० हजार आहे. पर्यटनाच्या दृष्टीने मिनीगोवा भासणाऱ्या या गावात पर्यटन विकासा अंतर्गत तलाव, रस्ते, पथदिवे, सुशोभिकरणाचे काम सुरु करण्यात आले होते. त्यावर आतापर्यंत चाळीस लाख रुपयां पेक्षा अधिक खर्च करण्यात झाला आहे. परंतु, गेल्या दीड, दोन वर्षापासून निधी उपलब्ध असतांनाही काम बंद आहेत. येथील प्रभूपाडा, आगार येथे स्मशानभुमीचे काम अद्याप सुरु करण्यात आलेले नाही. विशेष म्हणजे डहाणूतील रस्त्यांवर बसणाऱ्या मासळी विक्रेत्या महिलांसाठी नॅशलन फिशरीस डेव्हलपमेंट बोर्ड, हैद्राबाद यांच्या कडून महाराष्ट्र राज्य मत्स्य उद्योग महामंडळ यांच्या मार्फत डहाणू लोणीपाडा येथे अद्ययावत वातानुकुलीत मासळीमार्केट बांधण्यात आले आहे. परंतु गेल्या दोन वर्षापासून ते अपूर्ण असल्याने ते जूगरी तसेच दारुपिणाऱ्याचा अड्डा बनले आहे. डहाणू शहरातील लोकांना पूरेसे पाणी मिळावे म्हणून शासनाने चाळीस कोटी रूपयांची सुजल निर्मल पाणी पूरवठा योजना मंजूर दिली. परंतु मुदतवाढ देऊनही पूरेशा प्रमाणात काम झालेले नाही. पालिका प्रशासन याबाबतीत ठोस निर्णय घेत नसल्याने ही योजना बारगळणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. दरम्यान, शहरासाठी शासनाने स्वतंत्र अग्निशमन दलासाठी लाखोचा निधी दिला आहे. त्यासाठी फायर ब्रिगेडचे वाहन असले तरी ते ठेवण्यासाठी स्वतंत्र विभाग, कार्यालय व सोयी-सुविधांची अद्याप कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. तसेच वारंवार सुचना देऊनही घराघरातून निघणारा घनकचऱ्यासाठी डहाणू पालिकेकडे डंपिंग ग्राऊंड नसल्याने सध्या मिळेल त्या जागेवर कचरा टाकला जात आहे. विशेष म्हणजे डहाणू नगरपरिषद प्रशासनाच्या नियोजनशुन्य कारभारामुळे वर्षभरात ओव्हर बजेट कामे केली जात असल्याने पालिकेच्या तिजोरीवर त्याचा भार पडत आहे. परिणामी वार्षिक काम करणाऱ्या ठेकेदारांना त्यांच्या बिलांसाठी सहा, सहा महिने वाट पहावी लागते. तर पालिकेची आर्थिक परिस्थिती दयनिय असतांना देखील पालिकेने वर्षभरापूर्वी डहाणू स्टेशन जवळचे स्वत:चे कार्यालय सोडून दरमहा ७५ हजार भाडे असलेल्या इमारतीत कार्यालय स्थलांतर केल्याने ही दिवाळखोरी कुणासाठी आणि का असा प्रश्न उपस्थित होत आहे.‘अपयशाचे सव्वा वर्ष’ तलाव, रस्ते, पथदिवे, सुशोभिकरणाचे कामावर अद्याप चाळीस लाखांपेक्षा जास्त निधी खर्ची पडला आहे. पाणी योजनेचे बारा वाजले असून डंपिंग ग्राऊंड नसल्याने शहराची कचरा कुंडी बनली आहे.मात्र, मुख्याधिकारी विनोड डवले म्हणतात की, मी येऊन फक्त सव्वा वर्ष झाला आहे. तसेच मी पदभार स्विकारल्यापासून अनेक विकासकामे सुरु असल्याचेही ते सांगतात. आता मात्र शहराच्या बकाल अवस्थेला कुणाची कारकीर्द जबाबदार आहे असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.