शहरं
Join us  
Trending Stories
1
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
2
Rashi Bhavishya: स्त्रीमुळे अडचणीत याल, अपघाताचीही शक्यता; आज 'या' राशीच्या लोकांनी काळजी घेणं आवश्यक
3
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
4
खोटे जात प्रमाणपत्र ही घटनात्मक फसवणूक, सरपंचाला हायकोर्टाने ठोठावला ५ लाखांचा दंड
5
भारताला तेलाची नाही चिंता; मित्र येतो कामी! इराणकडून आयात शून्य, पण...
6
पहिलीपासून तिसरी भाषा हिंदीचा निर्णय रद्द करा; मराठी भाषक अभ्यासकांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
7
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर
8
रतन टाटा यांचे उरलेले शेअर्स 'त्या' दोन संस्थांनाच; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
9
अग्रलेख: युद्ध थांबेल की अधिक पेटेल? परिणाम लवकरच जाणवू शकतात 
10
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
11
विशेष लेख: शेतकऱ्याला AI चार जास्तीचे पैसे मिळवून देईल?
12
स्पर्धा परीक्षेप्रमाणे सरळसेवा भरती परीक्षेसाठीही 'पर्सेटाइल' पद्धत; 'क' गट नोकर भरतीसाठी एमपीएससीचा निर्णय
13
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
14
लेख: गोव्यात चालणाऱ्या पार्ट्यांची 'धुंदी' वाढतेच आहे, कारण...
15
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
16
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
17
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
19
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
20
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार

‘एमबीए’च्या विद्यार्थ्यांमध्ये सातत्याने घट

By admin | Updated: March 7, 2016 03:34 IST

अभियांत्रिकीसोबतच राज्यात व्यवस्थापन अभ्यासक्रमांनादेखील विद्यार्थ्यांच्या दुष्काळाचा सामना करावा लागतो आहे. गेल्या दशकात पदव्युत्तर शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची सर्वात मोठी

योगेश पांडे,  नागपूरअभियांत्रिकीसोबतच राज्यात व्यवस्थापन अभ्यासक्रमांनादेखील विद्यार्थ्यांच्या दुष्काळाचा सामना करावा लागतो आहे. गेल्या दशकात पदव्युत्तर शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची सर्वात मोठी पसंती असलेल्या ‘एमबीए’ची क्रेझ हळूहळू सरत चालली आहे. गेल्या चार वर्षांपासून सातत्याने विद्यार्थ्यांची संख्या कमी होत असून, पदव्युत्तर व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयांची संख्यादेखील सुमारे ११ टक्क्यांनी घटली आहे.‘एआयसीटीई’च्या (आॅल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन) आकडेवारीनुसार २०१२ सालापासून महाविद्यालयांची संख्या सातत्याने कमी होत असून, विद्यार्थ्यांची प्रवेशक्षमतादेखील कमी झाली आहे. २०१२ साली महाराष्ट्रात ४५९ महाविद्यालयांत हे दोन्ही अभ्यासक्रम होते. २०१५ मध्ये हाच आकडा ४०६ वर पोहोचला. केवळ तीन वर्षांत ५३ महाविद्यालये बंद झाल्याचे दुर्दैवी चित्र राज्यात पाहायला मिळाले. महाविद्यालयांची संख्या कमी झाल्यामुळे ओघाने प्रवेशक्षमतेतही घट झाली. ०१२ मध्ये जी प्रवेशक्षमता ६४ हजार ४१६ होती ती २०१५ मध्ये ५५ हजार ८०१ वर पोहोचली. तीन वर्षांतच ८ हजार ६१५ म्हणजे सुमारे १३.४ टक्के जागा कमी झाल्या. २०१२पासूनच्या आकडेवारीनुसार ‘एमबीए’ किंवा ‘एमएमएस’ अभ्यासक्रमांत प्रवेश घेण्यासंदर्भात विद्यार्थ्यांमध्ये निरुत्साह दिसून येत असल्याचे स्पष्ट होते. प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने दाखविली जातात. मात्र, त्यानंतर त्यांच्या पदरी निराशाच येते. यातूनच महाविद्यालयांतील जागा रिकाम्या राहण्यास सुरुवात झाली. २०१२ साली राज्यातील २५ हजार १७६ (३९ टक्के) जागा रिक्त होत्या. २०१५ मध्ये हा आकडा ३२ ते ३६ टक्क्यांच्या घरात होता.