शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘एमबीए’च्या विद्यार्थ्यांमध्ये सातत्याने घट

By admin | Updated: March 7, 2016 03:34 IST

अभियांत्रिकीसोबतच राज्यात व्यवस्थापन अभ्यासक्रमांनादेखील विद्यार्थ्यांच्या दुष्काळाचा सामना करावा लागतो आहे. गेल्या दशकात पदव्युत्तर शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची सर्वात मोठी

योगेश पांडे,  नागपूरअभियांत्रिकीसोबतच राज्यात व्यवस्थापन अभ्यासक्रमांनादेखील विद्यार्थ्यांच्या दुष्काळाचा सामना करावा लागतो आहे. गेल्या दशकात पदव्युत्तर शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची सर्वात मोठी पसंती असलेल्या ‘एमबीए’ची क्रेझ हळूहळू सरत चालली आहे. गेल्या चार वर्षांपासून सातत्याने विद्यार्थ्यांची संख्या कमी होत असून, पदव्युत्तर व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयांची संख्यादेखील सुमारे ११ टक्क्यांनी घटली आहे.‘एआयसीटीई’च्या (आॅल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन) आकडेवारीनुसार २०१२ सालापासून महाविद्यालयांची संख्या सातत्याने कमी होत असून, विद्यार्थ्यांची प्रवेशक्षमतादेखील कमी झाली आहे. २०१२ साली महाराष्ट्रात ४५९ महाविद्यालयांत हे दोन्ही अभ्यासक्रम होते. २०१५ मध्ये हाच आकडा ४०६ वर पोहोचला. केवळ तीन वर्षांत ५३ महाविद्यालये बंद झाल्याचे दुर्दैवी चित्र राज्यात पाहायला मिळाले. महाविद्यालयांची संख्या कमी झाल्यामुळे ओघाने प्रवेशक्षमतेतही घट झाली. ०१२ मध्ये जी प्रवेशक्षमता ६४ हजार ४१६ होती ती २०१५ मध्ये ५५ हजार ८०१ वर पोहोचली. तीन वर्षांतच ८ हजार ६१५ म्हणजे सुमारे १३.४ टक्के जागा कमी झाल्या. २०१२पासूनच्या आकडेवारीनुसार ‘एमबीए’ किंवा ‘एमएमएस’ अभ्यासक्रमांत प्रवेश घेण्यासंदर्भात विद्यार्थ्यांमध्ये निरुत्साह दिसून येत असल्याचे स्पष्ट होते. प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने दाखविली जातात. मात्र, त्यानंतर त्यांच्या पदरी निराशाच येते. यातूनच महाविद्यालयांतील जागा रिकाम्या राहण्यास सुरुवात झाली. २०१२ साली राज्यातील २५ हजार १७६ (३९ टक्के) जागा रिक्त होत्या. २०१५ मध्ये हा आकडा ३२ ते ३६ टक्क्यांच्या घरात होता.