शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

देशव्यापी संप सुरू, बळीराजा पुन्हा रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 06:34 IST

राज्यातील शेतकरी संपानंतर आता देशातील बळीराजा शुक्रवारपासून आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरला आहे.

मुंबई : राज्यातील शेतकरी संपानंतर आता देशातील बळीराजा शुक्रवारपासून आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरला आहे. मागण्या पूर्ण होईपर्यंत शहरांची रसद थांबवण्याचा एल्गार शेतकरी संघटनांनी केला आहे. देशातील शेतकऱ्यांनी आज रस्त्यावर शहरांची रसद प्रत्यक्ष थांबवली. त्यामुळे त्याचा परिणाम भाजीपाला पुरवठ्यावर झाला.देशातील ११० शेतकरी संघटनांनी एकत्र येऊन या देशव्यापी संपाची हाक दिली होती. सरसकट कर्जमाफी व स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी या मागण्यांसाठी देशव्यापी संप सुरू झाला असून, महाराष्ट्रातही ठिकठिकाणी दूध रस्त्यावर ओतून, भाजीपाला फेकून शेतकºयांनी रोष व्यक्त केला.नगरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात भाकड जनावरे सोडण्यात आली. जळगाव जिल्ह्यात भाजीपाल्यांचे लिलाव बंद पाडण्यात आले. किसान सभेने नगर जिल्ह्यातील अकोले तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. बुलेट ट्रेन आणून शेतकरी उद्ध्वस्त करण्याचा डाव शेतकरी उधळून लावतील, असा इशारा किसान सभेचे अध्यक्ष डॉ.अशोक ढवळे यांनी दिला.बीड जिल्ह्याच्या रेणापूर तालुक्यातील खलंग्री येथील शेतकºयांनी सकाळीच संप सुरू केला. त्यांनी रेणापूर पिंपळफाटा येथे रास्ता रोको केला़ यावेळी उपसरपंच गजानन बोळंगे यांनी सरणावर बसून आत्मदहनाचा प्रयत्न केला़ पोलिसांनी पेट्रोलच्या बाटलीसह त्यांना ताब्यात घेतले़ जळगावातील चोपडा बाजार समितीत कडकडीत बंद पाळण्यात आला.नगरमध्ये जोर, अकोले तहसीलवर मोर्चाअहमदनगरमध्ये शेतकºयांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर भाकड जनावरे नेत आंदोलन केले. दूधदरवाढ करा नाहीतर जनावरांची व्यवस्था सरकारने करावी, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. अकोले तहसीलवर मोर्चा काढण्यात आला. मोर्चेकºयांनी तहसीलदारांच्या दालनासमोर जमिनीवर दूध ओतून निषेध नोंदविला.गोदाकाठी ४२ गावात दूध संकलन ठप्पनाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी शेतकरी रस्त्यावर उतरले होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सिन्नर-शिर्डी महार्गावर सायखेडा चौफुली येथे रस्त्यावर दूध ओतून सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी पोलिसांनी तीन आंदोलन कार्यकर्त्यांनी ताब्यात घेतले. गोदाकाठ भागातील ४२ गावात शेतकºयांनी बंद पाळला असून दूध संकलन केंद्रे बंद होती. खामखेड्यात शेतकºयांनी रस्त्यावर टॉमेटो व कांदे फेकून संपाला पाठिंबा दिला.कुठे झालाकाय परिणाम?राजस्थान । शेतकºयांच्या संपामुळे राज्याच्या दक्षिण भागातील श्रीगंगानगर, हनुमानगढ, झुनझुनू या जिल्ह्यांतील भाज्या व दुधाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला. बिकानेर, नागौर, सिकर जिल्ह्यांनाही शेतकरी संपाची झळ बसली. मात्र दैनंदिन जीवनावर परिणाम झालेला नाही.उत्तर प्रदेश । येथील संभल जिल्ह्यात भाज्या, दूध व अन्य वस्तूंचा पुरवठा तेथील शेतकºयांनी पूर्णपणे थांबविला आहे. लखनौ व त्याच्या जवळील जिल्ह्यांतील फारच कमी शेतकरी या संपात सहभागी झाले.पंजाब व हरयाणा । अनेक शहरांना फळे, भाज्या, दूधाचा पुरवठा शेतकºयांनी बंद केला. या संपात सहभागी होण्यासाठी शेतकºयांवर दबाव आणलेला नाही, असे भारतीय किसान युनियनने म्हटले आहे.मध्य प्रदेश । या राज्यात शेतकरी संपामुळे दैनंदिन जीवनावर परिणाम झाला नसला, तरी भाज्या,दूध व अन्य वस्तुंचा पुरवठा रोखल्याने येत्या काही दिवसांत विविध ठिकाणी त्यांची टंचाई जाणवू लागेल. हा संप देशातील २२ राज्यांत सुरु असल्याचा दावा राष्ट्रीय किसान मजदूर महासंघाने केला असला तरी तसे चित्र दिसलेले नाही.जम्मू-काश्मीर, कर्नाटकमध्ये या संपाचा विशेष परिणाम जाणवला नाही.