शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
3
कृषिमंत्री कोकाटे किती मिनिटे रमी खेळत होते?, विधिमंडळ चौकशी अहवालात उघड, रोहित पवारांचा दावा
4
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
5
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
6
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
7
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
8
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
9
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
10
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
11
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स
12
'ऑपरेशन महादेव'नंतर आता 'ऑपरेशन शिवशक्ती' सुरू! भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान
13
थंडबस्त्यात गेला अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' सिनेमा, रेणुका शहाणे म्हणाल्या - "मला धक्काच बसला.."
14
कमाल! स्मार्टफोन App द्वारे आतड्यांतील बॅक्टेरियावर नियंत्रण, आली ओरल कॅप्सूल, कसा होणार फायदा?
15
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...
16
"दीड लाख देऊन इथं आलोय, मला बोलू द्या..."; संसदेत हजेरी लावणं खासदार राशीद यांना इतकं महाग का पडलं?
17
Reliance Jio ची आपल्या ग्राहकांना मोठी भेट; फक्त ₹५९९ मध्ये घरच्या TV ला बनवा कॉम्प्यूटर
18
PM किसान योजनेचा २० वा हप्ता जाहीर! २००० रुपये थेट बँक खात्यात, लगेच 'असं' तपासा तुमचं नाव!
19
UPI मध्ये १ ऑगस्टपासून होणार बदल; बॅलन्स चेक ते ऑटो-पे पर्यंत सर्वकाही बदलणार, पाहा तुमच्यासाठी काय नवं?
20
भीक मागणाऱ्या व्यक्तीच्या दोन बायका, आता त्याची तक्रार तर ऐका; कलेक्टरकडे पोहोचला अन् म्हणाला...

देशव्यापी संप सुरू, बळीराजा पुन्हा रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 06:34 IST

राज्यातील शेतकरी संपानंतर आता देशातील बळीराजा शुक्रवारपासून आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरला आहे.

मुंबई : राज्यातील शेतकरी संपानंतर आता देशातील बळीराजा शुक्रवारपासून आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरला आहे. मागण्या पूर्ण होईपर्यंत शहरांची रसद थांबवण्याचा एल्गार शेतकरी संघटनांनी केला आहे. देशातील शेतकऱ्यांनी आज रस्त्यावर शहरांची रसद प्रत्यक्ष थांबवली. त्यामुळे त्याचा परिणाम भाजीपाला पुरवठ्यावर झाला.देशातील ११० शेतकरी संघटनांनी एकत्र येऊन या देशव्यापी संपाची हाक दिली होती. सरसकट कर्जमाफी व स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी या मागण्यांसाठी देशव्यापी संप सुरू झाला असून, महाराष्ट्रातही ठिकठिकाणी दूध रस्त्यावर ओतून, भाजीपाला फेकून शेतकºयांनी रोष व्यक्त केला.नगरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात भाकड जनावरे सोडण्यात आली. जळगाव जिल्ह्यात भाजीपाल्यांचे लिलाव बंद पाडण्यात आले. किसान सभेने नगर जिल्ह्यातील अकोले तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. बुलेट ट्रेन आणून शेतकरी उद्ध्वस्त करण्याचा डाव शेतकरी उधळून लावतील, असा इशारा किसान सभेचे अध्यक्ष डॉ.अशोक ढवळे यांनी दिला.बीड जिल्ह्याच्या रेणापूर तालुक्यातील खलंग्री येथील शेतकºयांनी सकाळीच संप सुरू केला. त्यांनी रेणापूर पिंपळफाटा येथे रास्ता रोको केला़ यावेळी उपसरपंच गजानन बोळंगे यांनी सरणावर बसून आत्मदहनाचा प्रयत्न केला़ पोलिसांनी पेट्रोलच्या बाटलीसह त्यांना ताब्यात घेतले़ जळगावातील चोपडा बाजार समितीत कडकडीत बंद पाळण्यात आला.नगरमध्ये जोर, अकोले तहसीलवर मोर्चाअहमदनगरमध्ये शेतकºयांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर भाकड जनावरे नेत आंदोलन केले. दूधदरवाढ करा नाहीतर जनावरांची व्यवस्था सरकारने करावी, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. अकोले तहसीलवर मोर्चा काढण्यात आला. मोर्चेकºयांनी तहसीलदारांच्या दालनासमोर जमिनीवर दूध ओतून निषेध नोंदविला.गोदाकाठी ४२ गावात दूध संकलन ठप्पनाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी शेतकरी रस्त्यावर उतरले होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सिन्नर-शिर्डी महार्गावर सायखेडा चौफुली येथे रस्त्यावर दूध ओतून सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी पोलिसांनी तीन आंदोलन कार्यकर्त्यांनी ताब्यात घेतले. गोदाकाठ भागातील ४२ गावात शेतकºयांनी बंद पाळला असून दूध संकलन केंद्रे बंद होती. खामखेड्यात शेतकºयांनी रस्त्यावर टॉमेटो व कांदे फेकून संपाला पाठिंबा दिला.कुठे झालाकाय परिणाम?राजस्थान । शेतकºयांच्या संपामुळे राज्याच्या दक्षिण भागातील श्रीगंगानगर, हनुमानगढ, झुनझुनू या जिल्ह्यांतील भाज्या व दुधाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला. बिकानेर, नागौर, सिकर जिल्ह्यांनाही शेतकरी संपाची झळ बसली. मात्र दैनंदिन जीवनावर परिणाम झालेला नाही.उत्तर प्रदेश । येथील संभल जिल्ह्यात भाज्या, दूध व अन्य वस्तूंचा पुरवठा तेथील शेतकºयांनी पूर्णपणे थांबविला आहे. लखनौ व त्याच्या जवळील जिल्ह्यांतील फारच कमी शेतकरी या संपात सहभागी झाले.पंजाब व हरयाणा । अनेक शहरांना फळे, भाज्या, दूधाचा पुरवठा शेतकºयांनी बंद केला. या संपात सहभागी होण्यासाठी शेतकºयांवर दबाव आणलेला नाही, असे भारतीय किसान युनियनने म्हटले आहे.मध्य प्रदेश । या राज्यात शेतकरी संपामुळे दैनंदिन जीवनावर परिणाम झाला नसला, तरी भाज्या,दूध व अन्य वस्तुंचा पुरवठा रोखल्याने येत्या काही दिवसांत विविध ठिकाणी त्यांची टंचाई जाणवू लागेल. हा संप देशातील २२ राज्यांत सुरु असल्याचा दावा राष्ट्रीय किसान मजदूर महासंघाने केला असला तरी तसे चित्र दिसलेले नाही.जम्मू-काश्मीर, कर्नाटकमध्ये या संपाचा विशेष परिणाम जाणवला नाही.