शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता!
3
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
4
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
5
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
6
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
7
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
8
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
9
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
10
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
11
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
12
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
13
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
14
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
15
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
16
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
17
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
18
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
19
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
20
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल

देशव्यापी संप सुरू, बळीराजा पुन्हा रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 06:34 IST

राज्यातील शेतकरी संपानंतर आता देशातील बळीराजा शुक्रवारपासून आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरला आहे.

मुंबई : राज्यातील शेतकरी संपानंतर आता देशातील बळीराजा शुक्रवारपासून आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरला आहे. मागण्या पूर्ण होईपर्यंत शहरांची रसद थांबवण्याचा एल्गार शेतकरी संघटनांनी केला आहे. देशातील शेतकऱ्यांनी आज रस्त्यावर शहरांची रसद प्रत्यक्ष थांबवली. त्यामुळे त्याचा परिणाम भाजीपाला पुरवठ्यावर झाला.देशातील ११० शेतकरी संघटनांनी एकत्र येऊन या देशव्यापी संपाची हाक दिली होती. सरसकट कर्जमाफी व स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी या मागण्यांसाठी देशव्यापी संप सुरू झाला असून, महाराष्ट्रातही ठिकठिकाणी दूध रस्त्यावर ओतून, भाजीपाला फेकून शेतकºयांनी रोष व्यक्त केला.नगरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात भाकड जनावरे सोडण्यात आली. जळगाव जिल्ह्यात भाजीपाल्यांचे लिलाव बंद पाडण्यात आले. किसान सभेने नगर जिल्ह्यातील अकोले तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. बुलेट ट्रेन आणून शेतकरी उद्ध्वस्त करण्याचा डाव शेतकरी उधळून लावतील, असा इशारा किसान सभेचे अध्यक्ष डॉ.अशोक ढवळे यांनी दिला.बीड जिल्ह्याच्या रेणापूर तालुक्यातील खलंग्री येथील शेतकºयांनी सकाळीच संप सुरू केला. त्यांनी रेणापूर पिंपळफाटा येथे रास्ता रोको केला़ यावेळी उपसरपंच गजानन बोळंगे यांनी सरणावर बसून आत्मदहनाचा प्रयत्न केला़ पोलिसांनी पेट्रोलच्या बाटलीसह त्यांना ताब्यात घेतले़ जळगावातील चोपडा बाजार समितीत कडकडीत बंद पाळण्यात आला.नगरमध्ये जोर, अकोले तहसीलवर मोर्चाअहमदनगरमध्ये शेतकºयांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर भाकड जनावरे नेत आंदोलन केले. दूधदरवाढ करा नाहीतर जनावरांची व्यवस्था सरकारने करावी, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. अकोले तहसीलवर मोर्चा काढण्यात आला. मोर्चेकºयांनी तहसीलदारांच्या दालनासमोर जमिनीवर दूध ओतून निषेध नोंदविला.गोदाकाठी ४२ गावात दूध संकलन ठप्पनाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी शेतकरी रस्त्यावर उतरले होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सिन्नर-शिर्डी महार्गावर सायखेडा चौफुली येथे रस्त्यावर दूध ओतून सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी पोलिसांनी तीन आंदोलन कार्यकर्त्यांनी ताब्यात घेतले. गोदाकाठ भागातील ४२ गावात शेतकºयांनी बंद पाळला असून दूध संकलन केंद्रे बंद होती. खामखेड्यात शेतकºयांनी रस्त्यावर टॉमेटो व कांदे फेकून संपाला पाठिंबा दिला.कुठे झालाकाय परिणाम?राजस्थान । शेतकºयांच्या संपामुळे राज्याच्या दक्षिण भागातील श्रीगंगानगर, हनुमानगढ, झुनझुनू या जिल्ह्यांतील भाज्या व दुधाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला. बिकानेर, नागौर, सिकर जिल्ह्यांनाही शेतकरी संपाची झळ बसली. मात्र दैनंदिन जीवनावर परिणाम झालेला नाही.उत्तर प्रदेश । येथील संभल जिल्ह्यात भाज्या, दूध व अन्य वस्तूंचा पुरवठा तेथील शेतकºयांनी पूर्णपणे थांबविला आहे. लखनौ व त्याच्या जवळील जिल्ह्यांतील फारच कमी शेतकरी या संपात सहभागी झाले.पंजाब व हरयाणा । अनेक शहरांना फळे, भाज्या, दूधाचा पुरवठा शेतकºयांनी बंद केला. या संपात सहभागी होण्यासाठी शेतकºयांवर दबाव आणलेला नाही, असे भारतीय किसान युनियनने म्हटले आहे.मध्य प्रदेश । या राज्यात शेतकरी संपामुळे दैनंदिन जीवनावर परिणाम झाला नसला, तरी भाज्या,दूध व अन्य वस्तुंचा पुरवठा रोखल्याने येत्या काही दिवसांत विविध ठिकाणी त्यांची टंचाई जाणवू लागेल. हा संप देशातील २२ राज्यांत सुरु असल्याचा दावा राष्ट्रीय किसान मजदूर महासंघाने केला असला तरी तसे चित्र दिसलेले नाही.जम्मू-काश्मीर, कर्नाटकमध्ये या संपाचा विशेष परिणाम जाणवला नाही.