शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

बांधकामांचे धोरण ठरणार

By admin | Updated: June 13, 2014 03:14 IST

राज्यातील अनेक शहरांमध्ये अनधिकृत बांधकामांचा विषय महत्त्वाचा असून, या बांधकामांबाबत संपूर्ण राज्यासाठी एकच शासकीय धोरण आखण्यात येईल

मुंबई : राज्यातील अनेक शहरांमध्ये अनधिकृत बांधकामांचा विषय महत्त्वाचा असून, या बांधकामांबाबत संपूर्ण राज्यासाठी एकच शासकीय धोरण आखण्यात येईल, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी विधानसभेत जाहीर केले. हे धोरण आखण्यासाठी मुंबई महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवड परिसरातील अनधिकृत बांधकामांसंदर्भात पुणे जिल्ह्यातील विलास लांडे, बापुसाहेब पाठारे या सदस्यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. महापालिका प्रशासनाच्या सर्वेक्षणानुसार या संपूर्ण परिसरात १.१० लाख विनापरवाना बांधकामे आढळली. त्यांना महापालिकेने कलम ५३नुसार नोटिसा पाठविल्या असल्यानेत्यांच्यावर टांगती तलवार आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवडची बांधकामे नियमित करावीत, असा ठराव तेथील महापालिकेने राज्य शासनाकडे पाठविला आहे. अनधिकृत बांधकामांबाबत शासनाने केवळ एका शहरासाठी भूमिका घेऊन चालणार नाही. त्यासाठी सर्वसमावेशक राज्यव्यापी धोरण आणावे लागेल. हे धोरण कसे असावे, याची शिफारस करण्यासाठी मुंबई महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येणार आहे. समितीमध्ये एकूण १४ सदस्य असतील आणि त्यातील १२ हे विविध महापालिकांचे आयुक्त असतील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुख्यमंत्री म्हणाले की, कायद्यानुसार जी बांधकामे नियमित करणे शक्य नाही ती पाडून टाका असे स्पष्ट निर्देश मुंबई उच्च न्यायलयाने २०११मध्येच दिले आहेत. त्यानुसार कारवाई करण्यासाठी खूप मोठी यंत्रणा लागणार असून, ती उभी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले की, हा विषय खूप व्यापक आहे. त्यात नैतिकतेचा पेच आहे. कारण मानवतेचा विचार करून अनधिकृत इमारतीत राहणाऱ्या लोकांसाठी परवानगी द्यायची तर ती बांधकामे करणारे सुटतात आणि इमारती पाडायच्या म्हटले तर हजारो लोकांच्या निवासाचा प्रश्न उभा राहतो. समितीच्या अहवालानंतर जरूर तर कायदा बदलण्यासाठी सभागृहापुढे जावे लागेल. पण वेळेची मर्यादा घालता येणार नाही. (विशेष प्रतिनिधी)