शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
3
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
4
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
5
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
6
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
7
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
8
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
9
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
10
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
11
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
12
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
13
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
14
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
15
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
16
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
17
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
18
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
19
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
20
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ

‘माझ्या बदनामीसाठी ‘त्या’महिलांनी रचले षड्यंत्र’

By admin | Updated: March 14, 2016 02:38 IST

हिंदुत्ववाद्यांशी आर्थिक व्यवहार करून दुर्गा शुक्रे यांनी माझ्या बदनामीचे षड्यंत्र रचल्याचा आरोप भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी केला आहे.

नाशिक : हिंदुत्ववाद्यांशी आर्थिक व्यवहार करून दुर्गा शुक्रे यांनी माझ्या बदनामीचे षड्यंत्र रचल्याचा आरोप भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी केला आहे. त्र्यंबकेश्वर देवस्थानशी वाटाघाटी करणाऱ्या ‘त्या’ महिलांचा ब्रिगेडशी कोणताही संबंध नसून, त्यांची १० फेब्रुवारीला संघटनेतून हकालपट्टी केल्याचा दावाही देसाई यांनी केला आहे.त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात महिलांना प्रवेश देण्याच्या मागणीसाठी देसाई यांच्या नेतृत्वाखाली ७ मार्चला आंदोलन झाले. त्याला त्र्यंबकेश्वरवासियांनी तीव्र विरोध केला होता. पोलिसांनी देसाई यांना जिल्ह्याच्या हद्दीवरच रोखल्याने संघर्ष टळला होता. मात्र देसाई यांनी त्र्यंबक देवस्थानसमवेत बैठक बोलावण्यासाठी दहा दिवसांची मुदत जिल्हा प्रशासनाला दिली होती. शनिवारी भूमाता ब्रिगेडच्या दुर्गा शुक्रे, पुष्पक केवाडकर, प्रियंका जगताप आदिंनी त्र्यंबकेश्वर देवस्थानमध्ये बैठक घेऊन देसाई यांची भूमाता ब्रिगेडमधून हकालपट्टी केल्याचे वक्तव्य केले होते. गाभाऱ्यात महिलांना प्रवेश देण्याचा निर्णय धर्मसंसद घेईल, असा निर्णयही बैठकीत घेण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर देसाई यांच्याशी ‘लोकमत’ने संपर्क साधल्यावर त्यांनी भूमिका स्पष्ट केली. त्र्यंबक देवस्थानसमवेत बैठक बोलावण्यासाठी १८ मार्चची मुदत दिली आहे. बैठक न झाल्यास १९ मार्चला मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करू, असा इशाराही देसाई यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)