शहरं
Join us  
Trending Stories
1
PM KP Sharma Oli Resign: अखेर नेपाळमध्ये सत्तांतर! पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी दिला राजीनामा; देश सोडून पळाले?
2
नेपाळमधील आंदोलनाला हिंसक वळण; राष्ट्रपती, गृहमंत्री आणि परराष्ट्रमंत्र्यांची घरे जमावाने जाळली
3
लाल किल्ल्यावरील कार्यक्रमातून का केली १ कोटींच्या कलशाची चोरी? समोर आलं भलतंच कारण!
4
आज नवे आयफोन लाँच होणार! iPhone 17 मध्ये ५००० एमएएच बॅटरी? आयफोन १६, १५ च्या किंमती कोसळणार
5
नेपाळमधील आंदोलनाने भारत चिंतेत? शेजारी राष्ट्र आपल्यासाठी इतका महत्त्वाचा का?
6
नेपाळमधील परिस्थिती नियंत्रणाबाहेर, पंतप्रधानांचा राजीनामा, आंदोलकांनी संसद भवन पेटवले
7
कोण आहे बालेन शाह? ज्यांच्याकडे देशाचं नेतृत्व सोपवण्याची मागणी Gen Z आंदोलनकर्ते करतायेत
8
Video - स्वाभिमानापेक्षा पैसा मोठा नाही! पूरग्रस्त भागातील मुलाने जिंकलं मन, पाणी घेतलं अन्...
9
Gen-Z क्रांतीमुळे नेपाळमध्ये सत्तापालट? पंतप्रधान ओली दुबईला पळून जाण्याच्या प्रयत्नात, खाजगी विमान तयार
10
मुंबई विमानतळावरील अधिकारी जप्त नारळ, तेलाच्या बाटल्या नेत होते; १५ जणांना नोकरीवरून काढले
11
Video : नेपाळमधील आंदोलन आणखी पेटलं; मंत्र्यांची घरं जाळल्यानंतर लोकांचा सुरक्षा दलांवर हल्ला
12
रणबीर कपूर 'या' कंपनीचे १२.५ लाख शेअर्स खरेदी करणार, सलग दुसऱ्या दिवशी अपर सर्किट; गुंतवणूकदार मालामाल
13
iPhone 17: अ‍ॅपल आज मोठा धमाका करणार! पहिल्यांदाच आयफोनमध्ये 'हे' ४ फीचर्स मिळण्याची शक्यता
14
हिरो डॉग! मालकाला वाचवण्यासाठी जळते डायनामाइट तोंडात धरले अन्..; Video पाहून भावूक झाले लोक
15
एक व्यक्ती, ६ जिल्ह्यात एकाच वेळी केली ९ वर्षे नोकरी, सरकारला घातला कोट्यवधींचा गंडा 
16
ओलाच्या नावाने शिमगा केला, बजाज चेतक भररस्त्यात पेटली; इचलकरंजीत शोला बनला आग का गोला...
17
नेपाळमध्ये सरकार कोसळण्याचं संकट, घटकपक्षाने सोडली साथ; आतापर्यंत ३ मंत्र्यांनी दिले राजीनामे
18
हेल्दी वाटणारा मिल्कशेक मेंदूसाठी ठरतोय 'विष'; आवडीने पिणाऱ्यांना धोक्याचा इशारा
19
डिफेन्स कंपनीचा शेअर ठरला 'मल्टीबॅगर', ६ महिन्यांत पैसे दुप्पट; ५ वर्षांत दिला २०००% परतावा
20
रशियन कच्च्या तेलावरील भारताच्या नफ्याला म्हटलं 'ब्लड मनी'; ट्रम्प यांच्या सहकाऱ्यानं पुन्हा गरळ ओकली

शेतमालाच्या किमती पाडण्याचे षड्यंत्र

By admin | Updated: July 24, 2015 01:53 IST

भाजपा सरकार उद्योगपतींची बाजू घेणारे आहे. शेतकऱ्यांना देशोधडीला लावत या सरकारने जाणीवपूर्वक उत्पादन खर्च सतत वाढत असतानाही

मुंबई : भाजपा सरकार उद्योगपतींची बाजू घेणारे आहे. शेतकऱ्यांना देशोधडीला लावत या सरकारने जाणीवपूर्वक उत्पादन खर्च सतत वाढत असतानाही ग्राहकांना खूश करण्यासाठी शेतमालाच्या किमती मुद्दाम कमी ठेवण्याचे काम केले आहे. यामुळे देशातील आणि राज्यातील शेती आणि शेतकरी भयंकर संकटात सापडण्याची भीती निर्माण झाली आहे, असा गंभीर आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज विधानसभेत केला. शेतमालाच्या किमती कोसळत असतानाही कच्चा माल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांचा फायदा व्हावा यासाठी शेतकऱ्यांचा बळी दिला जात आहे. यामागे भाजपाचे मोठे राजकारण आहे; पण या राजकारणात महाराष्ट्रासारखे प्रगत राज्य देशोधडीला लागेल, असा इशाराही चव्हाण यांनी या वेळी दिला. विरोधी पक्षाच्या प्रस्तावावर बोलताना चव्हाण यांनी सरकारच्या धोरणावर कडाडून टीका केली. भाजपाच्या जाहीरनाम्यात या सरकारने कृषी उद्योग मंत्रालय स्थापन करण्याची घोषणा केली होती, राज्यात ५ हजार कृषी वसाहती उभ्या केल्या जातील असे सांगितले होते; पण त्यासाठी एक रुपयाची तरतूदही त्यांनी केलेली नाही, असे चव्हाण या वेळी म्हणाले. सरकारच्या निष्क्रियतेमुळे शेतमालाच्या किमती घसरल्या. कर्जमाफी न करण्याची घोषणा करत शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी टाकले. अजूनही शहाणपण सुचत असेल तर काही पावले उचला, असेही ते म्हणाले. सरकारला राज्यातील सगळी व्यवस्थाच मोडीत काढायची आहे असे दिसते आहे, यातून दिलासा मिळेल असे चित्र नाही, असे सांगून छगन भुजबळ यांनी उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीत सरकारच्या कारभारावर कसे ताशेरे ओढले आहेत हे दाखवून दिले. (विशेष प्रतिनिधी)