शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
2
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
3
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
4
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
5
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
6
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?
7
Ganeshotsav 2025: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मूर्तिकारांसाठी बीएमसीची महत्त्वाची पोस्ट
8
"बॉलिवूडमध्ये मंदी आली आहे, छोट्या कलाकारांकडे तर...", कल्कि कोचलीनचा खुलासा
9
प्रीतीचा 'मोहरा' विमानातून उतरला जयपूरमध्ये अन् त्याचं लगेज पोहचलं बंगळुरुला; मग भाऊनं असा काढला राग
10
Train Accident: अमळनेरला मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरले, सुरत-भुसावळ मार्गावरील वाहतूक ठप्प
11
'लापता लेडीज'च्या 'फूल'ची कान्समध्ये एन्ट्री, नितांशीच्या वेणीमध्ये 'या' ८ अभिनेत्रींचे फोटो
12
"मराठी मुलांनी आता उत्तर प्रदेशात जाऊन नोकऱ्या करायच्या का?"; शरद पवार गटाचा संतप्त सवाल
13
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
14
सोशल मीडियावर ट्रेंड होतंय #BoycottSitaareZameenPar, नेमकं कारण काय?
15
दिलजीत दोसांझची 'नो एन्ट्री २' मधून एक्झिट! 'या' कारणामुळे दिला नकार; नेटकरी खूश
16
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
17
मुंबईतील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून सम-विषम योजना लागू करा : वॉचडॉग फाउंडेशन
18
काश्मीरमधील दहशतवादी सैन्याच्या निशाण्यावर; जैश अन् लष्करच्या 6 दहशतवाद्यांना कंठस्नान
19
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
20
"जातीनिहाय जनगणनेसाठी तेलंगणा, कर्नाटक पॅटर्न राबवा; मराठा आरक्षणाचा प्रश्नही मार्गी लागेल"

शेतमालाच्या किमती पाडण्याचे षड्यंत्र

By admin | Updated: July 24, 2015 01:53 IST

भाजपा सरकार उद्योगपतींची बाजू घेणारे आहे. शेतकऱ्यांना देशोधडीला लावत या सरकारने जाणीवपूर्वक उत्पादन खर्च सतत वाढत असतानाही

मुंबई : भाजपा सरकार उद्योगपतींची बाजू घेणारे आहे. शेतकऱ्यांना देशोधडीला लावत या सरकारने जाणीवपूर्वक उत्पादन खर्च सतत वाढत असतानाही ग्राहकांना खूश करण्यासाठी शेतमालाच्या किमती मुद्दाम कमी ठेवण्याचे काम केले आहे. यामुळे देशातील आणि राज्यातील शेती आणि शेतकरी भयंकर संकटात सापडण्याची भीती निर्माण झाली आहे, असा गंभीर आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज विधानसभेत केला. शेतमालाच्या किमती कोसळत असतानाही कच्चा माल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांचा फायदा व्हावा यासाठी शेतकऱ्यांचा बळी दिला जात आहे. यामागे भाजपाचे मोठे राजकारण आहे; पण या राजकारणात महाराष्ट्रासारखे प्रगत राज्य देशोधडीला लागेल, असा इशाराही चव्हाण यांनी या वेळी दिला. विरोधी पक्षाच्या प्रस्तावावर बोलताना चव्हाण यांनी सरकारच्या धोरणावर कडाडून टीका केली. भाजपाच्या जाहीरनाम्यात या सरकारने कृषी उद्योग मंत्रालय स्थापन करण्याची घोषणा केली होती, राज्यात ५ हजार कृषी वसाहती उभ्या केल्या जातील असे सांगितले होते; पण त्यासाठी एक रुपयाची तरतूदही त्यांनी केलेली नाही, असे चव्हाण या वेळी म्हणाले. सरकारच्या निष्क्रियतेमुळे शेतमालाच्या किमती घसरल्या. कर्जमाफी न करण्याची घोषणा करत शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी टाकले. अजूनही शहाणपण सुचत असेल तर काही पावले उचला, असेही ते म्हणाले. सरकारला राज्यातील सगळी व्यवस्थाच मोडीत काढायची आहे असे दिसते आहे, यातून दिलासा मिळेल असे चित्र नाही, असे सांगून छगन भुजबळ यांनी उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीत सरकारच्या कारभारावर कसे ताशेरे ओढले आहेत हे दाखवून दिले. (विशेष प्रतिनिधी)