शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
2
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
3
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
4
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
5
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
6
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
7
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
8
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
9
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
10
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
11
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
12
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
13
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
14
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
15
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
17
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
18
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
19
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
20
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
Daily Top 2Weekly Top 5

शेतमालाच्या किमती पाडण्याचे षड्यंत्र

By admin | Updated: July 24, 2015 01:53 IST

भाजपा सरकार उद्योगपतींची बाजू घेणारे आहे. शेतकऱ्यांना देशोधडीला लावत या सरकारने जाणीवपूर्वक उत्पादन खर्च सतत वाढत असतानाही

मुंबई : भाजपा सरकार उद्योगपतींची बाजू घेणारे आहे. शेतकऱ्यांना देशोधडीला लावत या सरकारने जाणीवपूर्वक उत्पादन खर्च सतत वाढत असतानाही ग्राहकांना खूश करण्यासाठी शेतमालाच्या किमती मुद्दाम कमी ठेवण्याचे काम केले आहे. यामुळे देशातील आणि राज्यातील शेती आणि शेतकरी भयंकर संकटात सापडण्याची भीती निर्माण झाली आहे, असा गंभीर आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज विधानसभेत केला. शेतमालाच्या किमती कोसळत असतानाही कच्चा माल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांचा फायदा व्हावा यासाठी शेतकऱ्यांचा बळी दिला जात आहे. यामागे भाजपाचे मोठे राजकारण आहे; पण या राजकारणात महाराष्ट्रासारखे प्रगत राज्य देशोधडीला लागेल, असा इशाराही चव्हाण यांनी या वेळी दिला. विरोधी पक्षाच्या प्रस्तावावर बोलताना चव्हाण यांनी सरकारच्या धोरणावर कडाडून टीका केली. भाजपाच्या जाहीरनाम्यात या सरकारने कृषी उद्योग मंत्रालय स्थापन करण्याची घोषणा केली होती, राज्यात ५ हजार कृषी वसाहती उभ्या केल्या जातील असे सांगितले होते; पण त्यासाठी एक रुपयाची तरतूदही त्यांनी केलेली नाही, असे चव्हाण या वेळी म्हणाले. सरकारच्या निष्क्रियतेमुळे शेतमालाच्या किमती घसरल्या. कर्जमाफी न करण्याची घोषणा करत शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी टाकले. अजूनही शहाणपण सुचत असेल तर काही पावले उचला, असेही ते म्हणाले. सरकारला राज्यातील सगळी व्यवस्थाच मोडीत काढायची आहे असे दिसते आहे, यातून दिलासा मिळेल असे चित्र नाही, असे सांगून छगन भुजबळ यांनी उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीत सरकारच्या कारभारावर कसे ताशेरे ओढले आहेत हे दाखवून दिले. (विशेष प्रतिनिधी)