शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
3
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल
4
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
5
MS Dhoni च्या गॅरेजमध्ये 100 हून अधिक लक्झरी बाईक्स; किंमत ऐकून बसेल धक्का..!
6
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
7
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
8
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
9
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
10
"सध्या अ‍ॅक्शन सिनेमे चालत आहेत, त्यामुळे.."; आमिर खान 'सितारे जमीन पर'साठी चिंताग्रस्त, म्हणाला-
11
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
12
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
13
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
14
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
15
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
16
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
17
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
19
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
20
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक

हिंदूराष्ट्र निर्मितीचे षड्यंत्र

By admin | Updated: October 5, 2015 03:34 IST

भाजपा हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (आरएसएस) कळसूत्री बाहुली आहे. त्यामुळे देशावर संघाची विचारधारा थोपविण्यासाठी हिंदूराष्ट्र निर्मितीचे षड्यंत्र पुन्हा एकदा रचले जात आहे

नागपूर : भाजपा हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (आरएसएस) कळसूत्री बाहुली आहे. त्यामुळे देशावर संघाची विचारधारा थोपविण्यासाठी हिंदूराष्ट्र निर्मितीचे षड्यंत्र पुन्हा एकदा रचले जात आहे, अशी टीका मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे राष्ट्रीय महासचिव खासदार सीताराम येचुरी यांनी रविवारी केली.रिपब्लिकन परिवारतर्फे रविवारी विदर्भ साहित्य संघाच्या सभागृहात आयोजित ‘संघीकरणविरोधी परिषदे’चे उद्घाटक म्हणून येचुरी बोलत होते. ते म्हणाले, आरएसएसला धर्मावर आधारित देशाची रचना पूर्वीपासूनच करायची आहे. त्या दिशेने त्यांचे काम सुरू आहे. राजकारणात भाग घेणार नाही, या अटीवर आरएसएसवरील बंदी मागे घेण्यात आली. तेव्हा आरएसएसने स्वतंत्र राजकीय संघटन उभे केले. यातून जनसंघाची स्थापना झाली. नंतर भाजपात त्याचे रूपांतर झाले. त्यामुळे भाजपा संघापासून वेगळा नाही.आम्ही (कम्युनिस्ट) आर्थिक क्षेत्राच्या न्यायासाठी लढण्यासंदर्भात जो विश्वास निर्माण करू शकलो. तसा विश्वास आम्हाला सामाजिक न्यायासाठी निर्माण करता आला नाही, अशी कबुली देत डॉ. आंबेडकरांच्या विचारातील भारत घडविण्यासाठी आर्थिक व सामाजिक न्यायाची लढाई कम्युनिस्ट आणि आंबेडकरवादी यांनी मिळून लढावी, अशी सादही खा. येचुरी यांनी यावेळी घातली.बिहारमध्ये दिल्लीची पुनरावृत्तीपंतप्रधान नरेंद्र मोदी याचे ‘मॅजिक’ दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. लोकसभेच्या निकालानंतर विरोधी पक्ष सिटी बसमध्ये जाण्यापुरता शिल्लक राहिला, अशी टीका करणाऱ्या मोदींचा पक्ष दिल्लीच्या निकालात आॅटोने जाण्यापुरताही राहिला नाही. जनता जागरूक झाली आहे. त्यामुळे बिहारच्या निवडणुकीत दिल्लीची पुनरावृत्ती होईल, भाजपाचा पत्ता साफ होईल, असा दावा खासदार येचुरी यांनी पत्रकारांशी बोलताना केला.