शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
3
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
4
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
5
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
6
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
7
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
8
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
9
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
10
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
11
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
12
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
13
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
14
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
15
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
16
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
17
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
18
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
19
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
20
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं

...हे तर गांधींच्या बदनामीचे षडयंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 01:43 IST

इयत्ता नववीच्या इतिहासाच्या पुस्तकात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्याविषयी चुकीची आणि आक्षेपार्ह माहिती देण्यात आली आहे.

मुंबई : इयत्ता नववीच्या इतिहासाच्या पुस्तकात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्याविषयी चुकीची आणि आक्षेपार्ह माहिती देण्यात आली आहे. भाजपा सरकार जाणीवपूर्वक इतिहासाचे विकृतीकरण करत असल्याचा आरोप करत, विरोधकांनी सोमवारी सरकारला चांगलेच धारेवर धरले.विधान परिषदेत काँगे्रस सदस्य संजय दत्त यांनी प्रश्नोत्तराचा तास व अन्य सर्व कामकाज बाजूला ठेवत, नववीच्या पुस्तकातील चुकीच्या नोंदीवर चर्चेची मागणी केली. सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी दत्त यांचा स्थगन प्रस्ताव फेटाळला. मात्र, त्यावर सदस्यांना भूमिका मांडण्याची संमती दिली. बोफोर्स तोफा खरेदी प्रकरणी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर इयत्ता नववीच्या पुस्तकात ठपका ठेवण्यात आला आहे. न्यायालयाने या प्रकरणी राजीव गांधी यांची निर्दोष मुक्तता केली असतानाही, पुस्तकात त्याचा उल्लेख करण्यात आला नाही. गांधी परिवाराच्या बदनामीचा हा प्रकार असल्याचा आरोप आ. दत्त यांनी केला.भाजपा सरकार पूर्वग्रहदूषित पद्धतीने इतिहासाची मांडणी करत असून, ज्या नेहरू-गांधी कुटुंबीयांनी देश उभा केला, देशासाठी आपले बलिदान दिले, त्यांच्याच बदनामीचे हे षडयंत्र आहे. चुकीचा इतिहास मांडून देशाची भावी पिढी बरबाद करण्याचे पाप हे सरकार करत असल्याचा आरोप सुनील तटकरे यांनी केला. त्याचप्रमाणे, याच बोफोर्स तोफांमुळे आपण कारगिल युद्ध जिंकू शकलो. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनीच हे मान्य केले होते, याची आठवण जनता दल युनायटेडचे कपिल पाटील यांनी करून दिली. ज्यांनी स्वातंत्र्ययुद्धात बघ्याची भूमिका घेतली, ज्यांनी इतिहासच घडवला नाही, ती मंडळी आज इतिहास बदलत आहेत, असा आरोप काँग्रेसच्या भाई जगताप यांनी केला. ‘स्वच्छ भारत’साठी गांधींचा चष्मा लागतो, पण दृष्टिकोन मात्र नथुराम गोडसेचाच असल्याचा आरोपही त्यांनी केला. यावर, इतिहासाचे पुस्तक कोणता मंत्री लिहीत नाही. त्यासाठी इतिहास अभ्यास मंडळ आहे, असे उत्तर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले. मात्र, अभ्यास मंडळात राजकीय हस्तक्षेप करण्यास ठाम नकार दिला. यावर संतप्त विरोधकांनी घोषणाबाजीला सुरुवात केल्याने सभागृहाचे कामकाज दोन वेळा तहकूब करण्यात आले.शेवटी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी हस्तक्षेप करत, मंत्री तावडे यांना तोडगा काढण्याची विनंती केली. सभागृहाच्या संतप्त भावना सरकारच्या सहमतीसह इतिहास अभ्यास मंडळाला कळविण्यात येतील, असे आश्वासन विनोद तावडे यांनी दिले आणि या विषयावर पडदा पडला.