शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

...हे तर गांधींच्या बदनामीचे षडयंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 01:43 IST

इयत्ता नववीच्या इतिहासाच्या पुस्तकात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्याविषयी चुकीची आणि आक्षेपार्ह माहिती देण्यात आली आहे.

मुंबई : इयत्ता नववीच्या इतिहासाच्या पुस्तकात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्याविषयी चुकीची आणि आक्षेपार्ह माहिती देण्यात आली आहे. भाजपा सरकार जाणीवपूर्वक इतिहासाचे विकृतीकरण करत असल्याचा आरोप करत, विरोधकांनी सोमवारी सरकारला चांगलेच धारेवर धरले.विधान परिषदेत काँगे्रस सदस्य संजय दत्त यांनी प्रश्नोत्तराचा तास व अन्य सर्व कामकाज बाजूला ठेवत, नववीच्या पुस्तकातील चुकीच्या नोंदीवर चर्चेची मागणी केली. सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी दत्त यांचा स्थगन प्रस्ताव फेटाळला. मात्र, त्यावर सदस्यांना भूमिका मांडण्याची संमती दिली. बोफोर्स तोफा खरेदी प्रकरणी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर इयत्ता नववीच्या पुस्तकात ठपका ठेवण्यात आला आहे. न्यायालयाने या प्रकरणी राजीव गांधी यांची निर्दोष मुक्तता केली असतानाही, पुस्तकात त्याचा उल्लेख करण्यात आला नाही. गांधी परिवाराच्या बदनामीचा हा प्रकार असल्याचा आरोप आ. दत्त यांनी केला.भाजपा सरकार पूर्वग्रहदूषित पद्धतीने इतिहासाची मांडणी करत असून, ज्या नेहरू-गांधी कुटुंबीयांनी देश उभा केला, देशासाठी आपले बलिदान दिले, त्यांच्याच बदनामीचे हे षडयंत्र आहे. चुकीचा इतिहास मांडून देशाची भावी पिढी बरबाद करण्याचे पाप हे सरकार करत असल्याचा आरोप सुनील तटकरे यांनी केला. त्याचप्रमाणे, याच बोफोर्स तोफांमुळे आपण कारगिल युद्ध जिंकू शकलो. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनीच हे मान्य केले होते, याची आठवण जनता दल युनायटेडचे कपिल पाटील यांनी करून दिली. ज्यांनी स्वातंत्र्ययुद्धात बघ्याची भूमिका घेतली, ज्यांनी इतिहासच घडवला नाही, ती मंडळी आज इतिहास बदलत आहेत, असा आरोप काँग्रेसच्या भाई जगताप यांनी केला. ‘स्वच्छ भारत’साठी गांधींचा चष्मा लागतो, पण दृष्टिकोन मात्र नथुराम गोडसेचाच असल्याचा आरोपही त्यांनी केला. यावर, इतिहासाचे पुस्तक कोणता मंत्री लिहीत नाही. त्यासाठी इतिहास अभ्यास मंडळ आहे, असे उत्तर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले. मात्र, अभ्यास मंडळात राजकीय हस्तक्षेप करण्यास ठाम नकार दिला. यावर संतप्त विरोधकांनी घोषणाबाजीला सुरुवात केल्याने सभागृहाचे कामकाज दोन वेळा तहकूब करण्यात आले.शेवटी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी हस्तक्षेप करत, मंत्री तावडे यांना तोडगा काढण्याची विनंती केली. सभागृहाच्या संतप्त भावना सरकारच्या सहमतीसह इतिहास अभ्यास मंडळाला कळविण्यात येतील, असे आश्वासन विनोद तावडे यांनी दिले आणि या विषयावर पडदा पडला.