शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
2
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
3
'ऑपरेशन सिंदूर'नंतर रशियाची भारताला मोठी ऑफर; पाकिस्तानसह अमेरिकेचीही झोप उडवणार
4
पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्थानचा बहिष्कार? भारत कोणत्या वस्तू आयात करतो?
5
Viral Video : प्रियकराचं लागत होतं लग्न, ऐन मुहूर्तावर झाली प्रेयसीची एंट्री; पुढं काय झालं बघाच!
6
सर्वोच्च न्यायलयाने फेटाळला दिल्लीतील व्यावसायिकाचा जामीन अर्ज,ड्रग्ज आणि लष्कर-ए-तोयबाशी आहे कनेक्शन!
7
बारावी नापास डॉक्टर! रुग्णांच्या जीवाशी खेळ; क्लिनिक उघडून मोठे आजार बरे करण्याचा दावा
8
पंतप्रधान मोदींनी आदमपूर एअरबेस का निवडला? एकाच झटक्यात पाकिस्तानची खोट्याची ८ मिसाईल पाडली...
9
डिफेन्समध्ये का आहे तेजी? घसरत्या बाजारातही HAL आणि BEL मध्ये खरेदीदारांची रांग; कारण आहे खास
10
'भूत बंगला'मध्ये अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेअर करणार 'हा' अभिनेता, फोटो पोस्ट करत म्हणाला...
11
चिनी क्षेपणास्त्रांनी आधी मैदानात मार खाल्ला, आता शेअर बाजारातही लाज निघाली
12
शत्रुला शांतपणे झोप का लागत नाही? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'त्या' फोटोद्वारे दिला थेट संदेश...
13
Rambabu Singh : अवघ्या ४ महिन्यांपूर्वी लग्न झालेले जवान रामबाबू सिंह शहीद; पत्नीला अजून सांगितलंच नाही...
14
१० तारखेला वाढदिवस साजरा केला अन् दुसऱ्याच दिवशी...; आईसह २ मुलांचा दुर्दैवी अंत
15
धक्कादायक! अचानक तोल गेला अन् खासदार अजय मंडल पडले खाली; पायाला झालं फ्रॅक्चर
16
₹२३९२ चा 'हा' शेअर आपटून आला ₹५१ वर; सोमवारी दोन मोठे राजीनामे, गुंतवणूकदारांना झटका
17
पाकिस्तानने केलेला एअरबेस उडवल्याचा दावा; PM मोदी तिथेच पोहोचले, जवानांशी साधला संवाद
18
Astro Tips: गाडीच्या डॅशबोर्डवर कोणत्या देवतेची मूर्ती ठेवणे ठरते अधिक लाभदायी?
19
"वाढलेल्या वजनामुळे मला.."; 'हास्यजत्रा' फेम ईशाने केला मोठा खुलासा, झालेला हा आजार
20
म्युच्युअल फंड की FD.. गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय चांगला? फक्त परतावा पाहू नका, 'हे' समजून घ्या

ज्ञानोबा-तुकोबांचा समाज तोडण्याचे षडयंत्र

By admin | Updated: May 28, 2015 00:44 IST

सध्या महाराष्ट्रात ज्ञानोबा-तुकोबांचा समाज तोडण्याचे षड्यंत्र चालू आहे. हा समाज तुटला तर महाराष्ट्र रसातळाला जाईल,

पुणे : सध्या महाराष्ट्रात ज्ञानोबा-तुकोबांचा समाज तोडण्याचे षड्यंत्र चालू आहे. हा समाज तुटला तर महाराष्ट्र रसातळाला जाईल, असे स्पष्ट करीत माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी ‘मराठ्यांचा इतिहास’ जातीपातीत नेला तर अहिष्णू, हिंसक समाजाला तोंड द्यावे लागेल, असा गर्भित इशाराहीदिला. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या १०९व्या वर्धापनदिनानिमित्त बुधवारी निवारा सभागृहात समारंभ झाला. त्यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून ते बोलत होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेचा सन्मान पुरस्कार ज्येष्ठ कादंबरीकार रंगनाथ पठारे यांना व भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कार मधू नेने यांना देऊन गौरविण्यात आले. याशिवाय राजा फडणीस पुरस्कृत उत्कृष्ठ मसाप शाखा फिरता करंडक मसापच्या सासवड शाखेस प्रदान करण्यात आला. तर श्यामराव पाटील आणि पद्माकर कुलकर्णी मसाप कार्यकर्ता पुरस्काराचे मानकरी ठरले. धर्माधिकारी म्हणाले, संत ज्ञानेश्वर ते कवी ग्रेसांपर्यंत मराठी भाषेतील राकट आणि कोमलपणा दिसला आहे. मराठी जतन करायची असेल तर नव्याची कास धरावी लागेल. जीवनाच्या सर्व क्षेत्रात मराठी भाषेचा ठसा उमटला तर ती नक्कीच समृद्ध होईल. मराठीला अभिजाततेचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न होत आहेत, पण मुळातच मराठी अभिजातच आहे. प्रतिभावंत माणसे निपजली म्हणूनच मराठी भाषा समृद्ध झाली. सत्काराला उत्तर देताना रंगनाथ पठारे म्हणाले, मराठी भाषेच्या ऱ्हासासाठी राज्यकर्त्यांपेक्षा सामान्यजनच जबाबदार आहेत. प्रास्ताविक प्रकाश पायगुडे, सूत्रसंचालन डॉ. कल्याणी दिवेकर यांनी केले. (प्रतिनिधी)पठारेंना ज्ञानपिठ मिळावे४प्रा. पठारे हे मराठी साहित्यातील ज्येष्ठ साहित्यिक आहेत, असे सांगत धर्माधिकारी यांनी यावेळी पठारे यांना ‘ज्ञानपिठ पुरस्कारा’ने सन्मानित करावे अशी इच्छा व्यक्त केली. इतकेच नव्हे तर तांम्रपटच्या ताकदीच्या कादंबरीला ‘नोबेल पुरस्कार’ मिळावा असे ही सांगितले. यामध्ये कोणत्याही मराठी साहित्यिकाने खोडा घालूनये असे बोलून कानही टोचले.नातीला प्रवेश नाकारला४ज्येष्ठ साहित्यिक प्रा.रंगनाथ पठारे यांच्या नातील भगवत गीतेतील अध्याय येत नसल्याने ज्ञानप्रबोधीनी शाळेने प्रवेश नाकारल्याची जाहीर खंत आज पठारे यांनी बोलून दाखवली. ते म्हणाले, जो अध्याय आज्याला येत नाही, बापाला येत नाही तो चार वर्षाच्या पोरीला कसा येणार अशीही टिपणी त्यांनी यावेळी केली.