शहरं
Join us  
Trending Stories
1
खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय?
2
थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले...
3
अलिबागजवळ अरबी समुद्रात संशयित बोट; पोलिसांनी बोटीकडे जाण्याचा प्रयत्न केला, पण...
4
Viral Video : असं कोण करतं रे... भर मांडवात नवरदेवाला आडवा पाडला; एवढा गदारोळ कशासाठी? बघाच 
5
१० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात...
6
IND vs ENG 2nd Test: भारताच्या ऐतिहासिक विजयाचं श्रेय कुणाला? विराट कोहली म्हणाला...
7
"माझी बहीण १६ वर्षांनी लहान आहे, पण मी तिचं..." रश्मिका मंदानाने व्यक्त केली खंत
8
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
9
भारतीयांसाठी आनंदाची बातमी! 'युएई'ने सुरू केला विशेष व्हिसा; काय आहे संपूर्ण प्रक्रिया? जाणून घ्या
10
आणखी एक सोनम रघुवंशी! आसिफच्या प्रेमात पडलेल्या दिशानं नवऱ्याला संपवलं, बेडवरच घेतला जीव
11
FD-RD विसरून जाल, LIC ची ही 'कन्यादान' स्कीम आहे जबरदस्त; मुलीच्या लग्नाच्या वेळी मिळतील २७ लाख
12
"मराठी बोलत नाही, दम असेल तर...", भोजपुरी अभिनेत्याचं थेट राज ठाकरेंना चॅलेंज
13
ढोंगी पाकिस्तान! ज्या सैनिकाला ओळखही दाखवायला तयार नव्हते, त्यालाच दिला शहीदाचा दर्जा; आता म्हणतात... 
14
ट्रम्प ठरवणार आज शेअर बाजारात काय होणार?
15
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
16
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
17
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
18
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...
19
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
20
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान

ज्ञानोबा-तुकोबांचा समाज तोडण्याचे षडयंत्र

By admin | Updated: May 28, 2015 00:44 IST

सध्या महाराष्ट्रात ज्ञानोबा-तुकोबांचा समाज तोडण्याचे षड्यंत्र चालू आहे. हा समाज तुटला तर महाराष्ट्र रसातळाला जाईल,

पुणे : सध्या महाराष्ट्रात ज्ञानोबा-तुकोबांचा समाज तोडण्याचे षड्यंत्र चालू आहे. हा समाज तुटला तर महाराष्ट्र रसातळाला जाईल, असे स्पष्ट करीत माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी ‘मराठ्यांचा इतिहास’ जातीपातीत नेला तर अहिष्णू, हिंसक समाजाला तोंड द्यावे लागेल, असा गर्भित इशाराहीदिला. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या १०९व्या वर्धापनदिनानिमित्त बुधवारी निवारा सभागृहात समारंभ झाला. त्यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून ते बोलत होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेचा सन्मान पुरस्कार ज्येष्ठ कादंबरीकार रंगनाथ पठारे यांना व भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कार मधू नेने यांना देऊन गौरविण्यात आले. याशिवाय राजा फडणीस पुरस्कृत उत्कृष्ठ मसाप शाखा फिरता करंडक मसापच्या सासवड शाखेस प्रदान करण्यात आला. तर श्यामराव पाटील आणि पद्माकर कुलकर्णी मसाप कार्यकर्ता पुरस्काराचे मानकरी ठरले. धर्माधिकारी म्हणाले, संत ज्ञानेश्वर ते कवी ग्रेसांपर्यंत मराठी भाषेतील राकट आणि कोमलपणा दिसला आहे. मराठी जतन करायची असेल तर नव्याची कास धरावी लागेल. जीवनाच्या सर्व क्षेत्रात मराठी भाषेचा ठसा उमटला तर ती नक्कीच समृद्ध होईल. मराठीला अभिजाततेचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न होत आहेत, पण मुळातच मराठी अभिजातच आहे. प्रतिभावंत माणसे निपजली म्हणूनच मराठी भाषा समृद्ध झाली. सत्काराला उत्तर देताना रंगनाथ पठारे म्हणाले, मराठी भाषेच्या ऱ्हासासाठी राज्यकर्त्यांपेक्षा सामान्यजनच जबाबदार आहेत. प्रास्ताविक प्रकाश पायगुडे, सूत्रसंचालन डॉ. कल्याणी दिवेकर यांनी केले. (प्रतिनिधी)पठारेंना ज्ञानपिठ मिळावे४प्रा. पठारे हे मराठी साहित्यातील ज्येष्ठ साहित्यिक आहेत, असे सांगत धर्माधिकारी यांनी यावेळी पठारे यांना ‘ज्ञानपिठ पुरस्कारा’ने सन्मानित करावे अशी इच्छा व्यक्त केली. इतकेच नव्हे तर तांम्रपटच्या ताकदीच्या कादंबरीला ‘नोबेल पुरस्कार’ मिळावा असे ही सांगितले. यामध्ये कोणत्याही मराठी साहित्यिकाने खोडा घालूनये असे बोलून कानही टोचले.नातीला प्रवेश नाकारला४ज्येष्ठ साहित्यिक प्रा.रंगनाथ पठारे यांच्या नातील भगवत गीतेतील अध्याय येत नसल्याने ज्ञानप्रबोधीनी शाळेने प्रवेश नाकारल्याची जाहीर खंत आज पठारे यांनी बोलून दाखवली. ते म्हणाले, जो अध्याय आज्याला येत नाही, बापाला येत नाही तो चार वर्षाच्या पोरीला कसा येणार अशीही टिपणी त्यांनी यावेळी केली.