शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
2
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
3
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
4
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
5
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
6
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
7
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
8
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
9
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
10
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
11
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
12
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
13
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
14
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
15
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
16
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
17
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
18
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?
19
'चांगल्यापैकी पोटगी मिळतेय'; मासिक १० लाख मिळवण्यासाठी हसीन जहाँ सुप्रीम कोर्टात, मोहम्मद शमीला नोटीस
20
'तुमच्या मुलाचा दोष नाही', एअर इंडिया विमान अपघातातील पायलटच्या वडिलांची सर्वोच्च न्यायालयात धाव

पाण्याची गरज लक्षात घेत उल्हासच्या उपखो-यातील पाण्याचा एकात्मिक जल आराखडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 19:36 IST

या उल्हास खो-यामधून ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, भिवंडी, कल्याण, मुरबाड, शहापूर, ठाणे, उल्हासनगर, पालघरच्या वसई तालुक्यास पाणी पुरवठा होत आहे. याशिवाय रायगड जिल्ह्यातील कर्जत, खालापूर, पनवेल. तर पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, जुन्नर, खेड, मावळ तालका. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी आणि अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात या उल्हास नदीच्या खो-यातील पाण्याचा वापर केला जात आहे.

ठळक मुद्दे भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन उल्हास उपखा-यातील पाण्याचा एकात्मिक जल आराखडा ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, भिवंडी, कल्याण, मुरबाड, शहापूर, ठाणे, उल्हासनगर, पालघरच्या वसई तालुक्यास पाणी पुरवठा होत आहे रायगड जिल्ह्यातील कर्जत, खालापूर, पनवेल. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, जुन्नर, खेड, मावळ तालकानाशिक जिल्ह्यातील इगतपुरी आणि अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात या उल्हास नदीच्या खो-यातील पाण्याचा वापर

ठाणे : भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन उल्हास उपखा-यातील पाण्याचा एकात्मिक जल आराखडा तयार करण्यात येत आहे. या त्याला अंतिम मान्यता मिळण्यापूर्वी २३ जानेवारी रोजी येथील कोपरी कॉलनीतील सिंचन भवन येथे सकाळी ११ ते ५ या वेळेत जन सुनावणीसह कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.उल्हासनदीच्या या खोºयातून ठाणे जिल्ह्यातील बहुतांशी शहराना देखील पाणी पुरवठा होत आहे. याशिवाय रायगड, पुणे, नाशिक, अहमदनगर या जिल्ह्यातील तालुक्यांचा पाणी पुरवठा देखील या उपखोºयातून होत आहे. भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन येथील पाण्याचा एकात्मिक जल आराखडा तयार करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.  जलसंधारण, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, कृषी, महाराष्ट्र जीवन, प्राधिकरण उद्योग, महाराष्ट्र प्रदूषण मंडळ आदींकडून सद्य:स्थितीतील व भविष्यकालीन म्हणजे २०३०पर्यंतची पाण्याची गरज विचारात घेवून हा एकात्मिक जल आराखडा तयार करण्यात आला आहे.या उल्हास खो-यामधून ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, भिवंडी, कल्याण, मुरबाड, शहापूर, ठाणे, उल्हासनगर, पालघरच्या वसई तालुक्यास पाणी पुरवठा होत आहे. याशिवाय रायगड जिल्ह्यातील कर्जत, खालापूर, पनवेल. तर पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, जुन्नर, खेड, मावळ तालका. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी आणि अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात या उल्हास नदीच्या खो-यातील पाण्याचा वापर केला जात आहे. यासाठी पश्चिम वाहिनी नद्या खो-याची विभागणी सव्वीस उपखो-यामध्ये करण्यात आली असून या प्रत्येक उपखो-याचा प्रारु प जल आराखडा तयार करण्यात आला आहे.उपखोºयातील भूपृष्ठावरील व भूगर्भातील पाण्याचा एकात्मिक जल आराखडा तयार करणे, जलसंपत्ती संरक्षण व त्यामध्ये निरंतर सुधारणा करणे ही या जल आराखड्याची प्रमुख उद्दीष्टे आहेत. त्यानुसार कोकणातील उल्हास खो-याचा प्रारूप जल आराखडा तयार करण्यात आलेला आहे. यासाठी जनसुनावणी व कार्यशाळेसाठी संबंधितानी उपस्थित राहून आपली मते नोंदवण्याचे आवाहन येथील ठाणे पाटबंधारे मंडळाने केले आहे.

टॅग्स :thaneठाणेcollectorतहसीलदार