शहरं
Join us  
Trending Stories
1
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
2
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
3
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
4
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
5
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
6
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
7
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
8
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
9
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
10
Surya Gochar 2025: सूर्य होणार अधिक प्रखर, मात्र 'या' राशींसाठी ठरणार सुखकर; कसा ते पहा!
11
'तुझा मुलगा जिन्न आहे' मांत्रिकाचं ऐकून १२ वर्षांनी झालेल्या मुलाला कालव्यात फेकलं!
12
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट
13
ICC Test Rankings : 'तलवारबाज' जड्डूचा मोठा पराक्रम! टेस्टमध्ये अव्वलस्थान कायम राखत सेट केला नवा विक्रम
14
३६ युद्धनौका, ७ विनाशिका, फ्रिगेट आणि पाणबुड्या..., त्या रात्री नौदलाने केली होती कराची बेचिराख करण्याची तयारी   
15
Mumbai: मुंबईतील महिलेची सातव्या मजल्यावरून उडी, सुसाईड नोटमध्ये लिहिले मृत्युचे कारण
16
दहशतवादी मसूद अजहरला पाकिस्तानी सरकार १४ कोटी रुपये देणार? कारण ऐकून व्हाल हैराण!
17
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
18
'आली रे आली चीनची बारी आली'; आता मोदी सरकार चीनची नांगी ठेचण्याच्या तयारीत, प्रकरण काय?
19
भारताविरोधातील कट उधळला! शोपियान चकमकीत ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
20
प्रसिद्ध सेलिब्रिटीचा व्हिसा रिजेक्ट, कान्सला जाण्याचं स्वप्न भंगलं; पोस्ट शेअर करत म्हणाली...

कृषिमंत्र्यांच्या मान्यतेनेच कर्मचारी जलसंधारणमध्ये

By admin | Updated: May 14, 2017 05:12 IST

कृषिखात्याचे अधिकारी व कर्मचारी मृद व जलसंधारण खात्यात वर्ग करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत घेण्यात आला

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : कृषिखात्याचे अधिकारी व कर्मचारी मृद व जलसंधारण खात्यात वर्ग करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत घेण्यात आला व त्याच्या इतिवृत्ताला मान्यता देण्यात आली. कृषिमंत्र्यांसह सर्वच मंत्री तेव्हा उपस्थित होते, असे स्पष्टीकरण जलसंधारण व राजशिष्टाचारमंत्री राम शिंदे यांनी दिले.संबंधित निर्णयाला कोणाचा विरोध नाही, उलट मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी होतच असते असे सांगून शिंदे यांनी कृषिखात्याचे कर्मचारी वर्ग करण्याच्या निर्णयावर ठाम राहण्याचे संकेत दिले. जलयुक्त शिवार योजनेच्या आढावा बैठकीनंतर शिंदे म्हणाले, २५ एप्रिलला मंत्रिमंडळासमोर कृषी खात्याचे अधिकारी, कर्मचाऱ्यांचे वर्गीकरण करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला व त्याला मान्यता देण्यात आली. त्यानंतर २ मे रोजी झालेल्या बैठकीत इतिवृत्ताला मान्यता देण्यात आली. १६ हजार ४६९ अधिकारी कर्मचारी वर्ग करण्यात आले. त्याचबरोबर जलसंधारण हे नाव बदलून मृद व जलसंधारण खाते असे करण्यात आले.औरंगाबाद येथील वाल्मी इन्स्टिट्यूट या खात्याला जोडण्यात आले असून, ६०० हेक्टरपर्यंत सिंचनाची मर्यादा ठेवणारे तलाव, बंधाऱ्याची मर्यादा जलसंधारण खात्याकडे वर्ग करण्यात आली. औरंगाबाद येथे त्यासाठी आयुक्तालय मंजूर करण्यात आले. रत्नागिरी जिल्ह्यात जलयुक्त शिवार कामात आर्थिक घोटाळा झाल्याचे व त्यात शिवसेनेचे मंत्री रामदास कदम यांच्या पुत्राचा सहभाग असल्याच्या आरोपाबाबत बोलताना शिंदे यांनी या सर्व कामांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून, जलयुक्त शिवार योजना लोकप्रिय ठरलेली असताना अशा योजनेत कोणी खोडा घालण्याचा प्रयत्न केल्यास त्यास वठणीवर आणण्यासाठी कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले.