शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
5
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
6
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
7
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
10
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
11
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
12
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
13
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
14
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
15
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
16
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
17
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
18
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
19
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
20
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

गेल्या २३ वर्षांत ठाणे जिल्ह्याचे अतिरेकी कारवायांशी कनेक्शन

By admin | Updated: January 23, 2016 04:02 IST

देशात कोणत्याही ठिकाणी होणाऱ्या दहशतवादी कृत्यात गेल्या २३ वर्षांत नवी मुंबई, ठाणे, कल्याण, भिंवडी, मीरा-भार्इंदर आणि पालघर जिल्ह्यांचा येनकेन संबंध आलेला आहे.

नारायण जाधव,  ठाणेदेशात कोणत्याही ठिकाणी होणाऱ्या दहशतवादी कृत्यात गेल्या २३ वर्षांत नवी मुंबई, ठाणे, कल्याण, भिंवडी, मीरा-भार्इंदर आणि पालघर जिल्ह्यांचा येनकेन संबंध आलेला आहे. जिल्ह्यातील वाढत्या लोकसंख्येसह आयटीपार्कच्या जाळ्यामुळे दशहतवाद्यांच्या कारवायांसाठी या परिसराचा वापर होत आहे. या दोन्ही जिल्ह्यांत सात महापालिका, पाच नगरपालिका आणि ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयासह ठाणे आणि नवी मुंबई ही दोन अति महत्त्वाची पोलीस आयुक्तालये आहेत. १९९३चे मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट, अहमदाबाद येथे पोलीस चकमकीत मारली गेलेली नरेंद्र मोदींच्या हत्येच्या कथित कटातील संशयित मारेकरी असलेली इशरत जहाँ, २००२मध्ये मुंब्यातूनच पकडले हिजबुलचे अतिरेकी असो किंवा इसिसमध्ये सामील होण्यास गेलेले कल्याणचे ते चार तरुण असोत. किंवा आता पुन्हा मुंब्य्रातूनच एटीएस आणि एनआयएने आता पकडलेला इसिसचा अतिरेकी, यामुळे मुंब्य्रासह ठाणे जिल्ह्यातील देशविघातक कारवाया पुन्हा एकदा प्रकाशझोतात आल्या आहेत. पडघा, तलासरी- डहाणूचा समुद्रकिनारा, नवी मुंबईतून पकडलेले अतिरेकी, गेलेले ई मेल या साऱ्या घटना जिल्ह्यातील भविष्यातील धोक्याची नांदी सांगणाऱ्या आहेत.जितक्या गतीने जिल्ह्यात नागरिकीकरण होत आहे, तितक्याच किंंबहुना त्याहून अधिक वेगाने येथील नागरी समस्यांसह सुरक्षेचे प्रश्न वाढत आहेत. संसदेवरील हल्ला, आर्मी आणि आॅइल सेंटरमध्ये आपले जाळे अधिक घट्ट करण्याचे काम करणारे तलासरीतून एटीएसने पकडलेले लष्कर-ए-तोयबाचे दोन हस्तक किंंवा वाराणसीत झालेल्या बॉम्बस्फ ोटांची माहिती देणारा नवी मुंबईतून गेलेला ई-मेल. मुंबईवरील २६/११चा हल्ला करणारा अजमल कसाब आणि त्याच्या साथीदारांनी डहाणू मार्गे केलेला प्रवेश. या साऱ्या गोष्टी देशातील दहशतवाद्यांचे पालघर, कल्याण, ठाणे व नवी मुंबईचे कनेक्शन उघड केले आहे. दहशतवाद्यांचे जिल्ह्यात असलेले जाळे सर्वप्रथम १९९३मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांनंतर उघडकीस आले. या ठिकाणी वापरलेल्या आरडीएक्सपैकी सुमारे २८३० किलो आरडीएक्स मुंब्य्रात सापडले होते. त्यानंतर वाशीच्या एका प्रतिष्ठित हॉटेलातून संशयावरून अहमद अफरोज नावाच्या तरुणास अटक केली होती. त्या वेळी तो निर्दोष की गुन्हेगार यावरून वातावरण चांगलेच तापले होते. नंतरच्या काळात संसदेवरील हल्ल्याच्या कटातील आरोपी अबू हमजा ठाण्यातूनच पकडला गेला. मार्च २००२मध्ये हिजबुलच्या दोन अतिरेक्यांना मुंब्य्रातून अटक केली होती. घाटकोपर, मुलुंड येथील लोकलसह अहमदाबाद, जयपूर येथे झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी ठाण्यातील नागला बंदर, भिवंडीनजीकच्या बोरोली गावातून पोलिसांनी हत्यारे आणि अतिरेक्यांशी संगनमत करणाऱ्या साथीदारास पकडले होते. त्या वेळी हल्ल्यासाठी वापरण्यात आलेल्या मारुती वॅगनार गाड्या नवी मुंबईतून चोरल्याचे निदर्शनास आले होते.अक्षरधाम आणि संसदेवर हल्ला झाला तेव्हा नवी मुंंबईतील टीएस चाणक्य, एनआरआय वसाहतींचा बंदोबस्त वाढविला होता. पाम बीच मार्गावर हवाई दलाचे रडार त्यासाठी तैनात केले होते. गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान पंतप्रधान मुख्यमंत्री यांच्या हत्येच्या कथित कटात सहभागी असलेली संशयित इशरत जहाँ मुंब्रा येथील रहिवासी होती. जंगली पठाण या पाक नागरिकाला ठाण्यातून अटक झाली होती. मागे २००९ मध्ये नवी मुंबईतील घणसोलीतून मुमताज चौधरीसह कळंबोली आणि कोपरखैरणेतून अतिरेक्यांना अटक झाली होती. नवी मुंबईतील पाम बीच मार्गावरील एका इमारतीतून केन हेवूड या विदेशी नागरिकास पोलिसांनी ताब्यात घेतले होते. नंतर अमेरिकेच्या दबावानंतर भारत सरकारने त्यास परत जाण्याची परवानगी दिली होती.अजमल कसाब आणि त्याचे साथीदार डहाणूमार्गेच मुंबईत आले होते. तेव्हा मुंबई एटीएसने रझाक आणि रशीद या दोघा लष्करच्या हस्तकांना अटक केल्यानंतर महाराष्ट्र, गुजरात अन् राजस्थानमधील आर्मीचे तळ आणि आॅईल कंपन्यांत आपल्या पंटरांचे जाळे विणण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. हे उघड झाले होते. हे कमी म्हणून की काय, त्या काळात वाराणसीत झालेल्या बॉम्बस्फोटांची जबाबदारी स्वीकारणारे इंडियन मुजाहिद्दीनचे ई-मेल नवी मुंबईच्या वाशी नोडमधील सेक्टर १७ सारख्या प्रतिष्ठित वस्तीतून गेल्याचे पोलिसांनी उडघकीस आणले होते.नुकतेच कल्याणमधील ४ उच्च शिक्षित तरुण इसिसमध्ये सहभागी होण्यास गेल्याचे उघड झाले आहे. त्यांचा अद्याप शोध लागलेला नाही.