शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
4
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
5
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
6
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
7
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
8
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
9
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
10
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
11
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
12
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
13
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
14
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
15
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
16
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
17
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
18
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
19
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
20
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!

नगर जिल्ह्यात काँग्रेसचा वरचष्मा

By admin | Updated: February 26, 2017 01:25 IST

नगर जिल्ह्यात मतदारांनी संमिश्र कौल देत सर्वच पक्षांना भानावर आणले आहे. दोन्ही काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या, पण गतवेळीपेक्षा त्यांच्या जागा घटल्या.

- सुधीर लंके,  अहमदनगर

नगर जिल्ह्यात मतदारांनी संमिश्र कौल देत सर्वच पक्षांना भानावर आणले आहे. दोन्ही काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या, पण गतवेळीपेक्षा त्यांच्या जागा घटल्या. भाजपाला मतदारांनी एका हाताने दिले व दुसऱ्या हाताने काढले. कारण त्यांची ताकद वाढवली पण आमदारांच्या बालेकिल्यांतच त्यांना धक्का दिला. शिवसेनेच्या नेतृत्वाला तर नगरसारख्या राजकारणातील बलाढ्य जिल्ह्याचे काहीही सोयरसूतक दिसत नाही. त्यामुळे मतदारांनी त्यांच्या पदरात तसेच माप टाकले आहे. नगर जिल्ह्यात ७२पैकी काँग्रेसने सर्वाधिक २३, तर राष्ट्रवादी १८, भाजपा १४ व शिवसेनेने ७ जागा मिळविल्या आहेत. या जिल्हा परिषदेवर आजवर सातत्याने दोन्ही काँग्रेसचा झेंडा राहिला आहे. याहीवेळी याच पक्षांना सर्वाधिक जागा असल्याने ते आघाडी करून सत्तेत येऊ शकतात.माजी आमदार शंकरराव गडाख बाहेर पडल्याने राष्ट्रवादीला नेवासात पाच जागांचा फटका बसला. ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांच्या अकोले मतदारसंघातही भाजपाचा उदय झाला आहे. पंचायत समितीची सत्ता पिचडांना गमवावी लागणार आहे. श्रीगोंद्यात राष्ट्रवादीचा आमदार आहे. मात्र, तेथेही पंचायत समितीत भाजपाचे बबनराव पाचपुते यांनी कमळ फुलविले. काँग्रेसचीही हीच अवस्था आहे. विखे-थोरात हे मात्तबर नेते पक्षाकडे असतानाही काँग्रेस २८वरून २३ जागांवर आली. या दोघांतील भांडणेच यास कारणीभूत आहेत. थोरात यांनी संगमनेर व विखे यांनी राहाता हे आपापले गड तेवढे राखले. जिल्ह्यात १४पैकी ६ तालुके असे आहेत जेथे जिल्हा परिषद, पंचायत समितीत काँग्रेसला भोपळाही फोडता आलेला नाही. श्रीरामपूरचे काँग्रेस आमदार भाऊसाहेब कांबळे यांनीच या वेळी पक्षाविरोधात काम केले. श्रीगोंदा, भाजपा आमदार मोनिका राजळे यांचा पाथर्डी, राम शिंदे यांचा कर्जत-जामखेड व अकोले या मतदारसंघांत भाजपा वाढली. मात्र, भाजपा आमदार शिवाजी कर्डिले व स्नेहलता कोल्हे यांच्या नगर व कोपरगाव या तालुक्यांतच पक्ष भुईसपाट झाला. नेवाशातही आमदार असताना तेथे या पक्षाला केवळ एक जागा मिळाली. ‘मिशन फोर्टी’ बासनात भाजपाकडून पालकमंत्री राम शिंदे यांनी ‘मिशन फोर्टी’ म्हणजे ४० जागा आणण्याचा नारा दिला होता. पण, त्यांचे हे मिशन ‘फोर्टीन’ म्हणजे चौदा जागांवर अडकले. अर्थात गतवेळी भाजपा सहा जागांवर होता. या वेळी त्यांच्या जागा दुपटीने वाढल्या. जिल्ह्यात एकमेव या पक्षाला वाढ मिळाली. राष्ट्रवादीच्या जागा घटवून ती जागा भाजपाने घेतली.दोन्ही काँग्रेसला एकत्रित येऊन सत्ता स्थापन करणे सोपे आहे. पण नेत्यांच्या महत्त्वाकांक्षा बघता काहीही समीकरणे आकाराला येऊ शकतात. या वेळी थोरात हे विखे यांना साथ करतील, अशी शक्यता नाही. थोरात गट अध्यक्षपदाचा दावेदार आहे. राष्ट्रवादीही गडाखांच्या आघाडीला सोबत घेऊन अध्यक्षपदासाठी दावा ठोकण्याच्या तयारीत आहे.