शहरं
Join us  
Trending Stories
1
एक व्यक्ती इथे नाही, त्याची उणीव...; धनंजय मुंडेंना परळीतील सभेत वाल्मिक कराडची आठवण
2
“आता गृह मंत्रालय घेतले, पुढे भाजपावाले नितीश कुमारांचे CM पद काढून घेतील”; कुणाचा दावा?
3
सोन्याच्या खाणीत गुंतवणूक करा, 5 वर्षांची कर सूट मिळवा; अफगाणिस्तानची भारताला मोठी ऑफर
4
७०० कोटींचा खर्च केला, पण वंदे भारत ट्रेनची सेवा नाहीच; प्रवाशांची गैरसोय, नाराजी वाढली?
5
Dharmendra : "ते मला नेहमी म्हणायचे की...", धर्मेंद्रजींच्या निधनानंतर सचिनसह विराटही झाला भावूक
6
आता मुंबईतही बिबट्याची दहशत! दिंडोशी म्हाडाच्या बंगल्यात बिबट्याचा संचार
7
“भावनिक वातावरण तयार करून मते मिळवण्याचा प्रयत्न”; राज ठाकरेंच्या विधानावर भाजपाचे उत्तर
8
जुना, वापरलेला फोन खरेदी करताय? थांबा! एका चुकीमुळे होऊ शकते हजारोंचे नुकसान, आताच जाणून घ्या..
9
रिलायन्स जिओला ग्राहक वैतागले! कॉलवेळी ऐकायलाच येत नाहीय..., प्रचंड समस्या, बीएसएनएल परवडले...
10
मोठा पेच...! धर्मेंद्र यांच्या ४५० कोटींच्या संपत्तीचे वारसदार कोण? दोन पत्नी, ६ मुले... 
11
Dharmendra Last Rites: देओल कुटुंबीयांचा आधार हरपला; अभिनेते धर्मेंद्र अनंतात विलीन, सनी देओलने दिला मुखाग्नी
12
"सरकारनं माझं ऐकलं नाही तर संसदेच्या छतावरून उडी मारेन"; जेव्हा राजकारणात दिसली धर्मेंद्र यांची 'शोले स्टाईल'
13
Women’s Kabaddi World Cup 2025: कबड्डीतही भारताच्या लेकी जगात भारी! सलग दुसऱ्यांदा जिंकली वर्ल्ड कप स्पर्धा
14
आधी कारने धडक, मग १९ सेकंदात १९ कुऱ्हाडीचे घाव; गुरुग्राममध्ये डिलिव्हरी बॉयवर जीवघेणा हल्ला!
15
आधुनिक तंत्रज्ञान, पूर्णपणे मेड इन इंडिया; भारतीय नौदलात ‘INS माहे’ची धमाकेदार एन्ट्री...
16
प्रेमात धोका! मिस कॉलने जोडले नाते, प्रियकराने तोडले! गर्भवती प्रेयसीचा गर्भपात करून स्टेशनवर सोडून पळाला
17
डॉ. गौरी गर्जे यांचा मृत्यू अनैसर्गिक; डॉक्टरांच्या खुलाशाने खळबळ, शवविच्छेदन अहवालात कोणत्या नोंदी?
18
"विश्वास ठेवा, दुसरा कुठलाही हेतू नाही" माओवाद्यांनी आत्मसमर्पणासाठी मागितली १५ फेब्रुवारीपर्यंतची वेळ
19
IND vs SA: टीम इंडियाच्या फलंदाजांची घसरगुंडी, दुसरीकडे करूण नायरची सूचक पोस्ट, म्हणाला...
20
गौरी पालवे मृत्यू प्रकरण: पती अनंत गर्जेंना २७ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी, काल झालेली अटक
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा सरकारच्या फसव्या व खोटारडेपणाच्या विरोधात कॉग्रेसची संघर्षयात्रा

By admin | Updated: August 25, 2016 09:58 IST

नतेला खोटी व फसवी आश्वासने देऊन केंद्रात व राज्यात सत्तेत आलेल्या भाजपा सरकारच्या खोटारडेपणाचा बुरखा फाडण्यासाठी पुणे जिल्हा कॉग्रेस कमिटीच्या जनसंघर्ष यात्रा सुरु करण्यात आली

ऑनलाइन लोकमत

लोणावळा,  दि. २५ -  जनतेला खोटी व फसवी आश्वासने देऊन केंद्रात व राज्यात सत्तेत आलेल्या भाजपा सरकारच्या खोटारडेपणाचा बुरखा फाडण्यासाठी पुणे जिल्हा कॉग्रेस कमिटीच्या जनसंघर्ष यात्रा सुरु करण्यात आली आहे. पुणे कॉग्रेस भवन येऊन सुरु झालेल्या या यात्रेच्या पहिल्या दिवसाची सांगता आज लोणावळयात करण्यात आली. यावेळी पुणे जिल्हा कॉग्रेसचे अध्यक्ष संजय जगताप यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपाच्या खोटारडेपणाच्या विरोधात जनमानसांसाठी कॉग्रेस रस्त्यावर उतरली असल्याचे सांगितले.      यावेळी संग्रामदादा मोहोळ, संजय उभे, महेश ढमढेरे, संजय हरपळे, अॅड. सोमनाथ दौंडकर, हाजीमलंग मारीमत्तू, गोपाळ तंतरपाळे, लोणावळा शहर कॉग्रेसचे अध्यक्ष नारायण आंबेकर, दत्तात्रय गवळी, किरण गायकवाड, निखिल कविश्वर, दीपक सायसर, अमोल पवार, अमोल दौंडकर, वंदना सातपुते, भरत तिखे आदी उपस्थित होते.     यावेळी बोलताना संजय जगताप म्हणाले दोन वर्षापुर्वी भाजपाने लोकसभा व विधानसभेच्या निवडणूकी दरम्यान देशवासीयांना काळा पैसा देशात आणत प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख रुपये जमा करु, महागाई नियंत्रणात ठेऊ, शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखू, दरवर्षी २ कोटी रोजगार देऊ अशा शेकडों रंजित घोषणा व आश्वासने देत सत्ता मिळवली मात्र यापैकी एकही आश्वासन भाजपा पुर्ण करु शकली नाही, असे असताना पुन्हा नवी आश्वसने देऊन भाजपाची नागरिकांची दिशाभूल करत आहे. दोन वर्षापासून शासनाने विदयार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली नाही, सर्वसामान्यांवर करांचा बोजा लादत भांडवलदारांना सुट देण्याचा गोरस धंदा या सरकारने सुरु केला आहे. ज्यांचा आदर्श समाजांने घ्यावा असे अनेक मंत्री बोगस पदव्यांच्या प्रकरणात आडकले आहेत. केंद्रातील भाजपा सरकारला अडीच वर्ष झाली तर राज्य सरकारला दोन वर्ष पुर्ण होणार असताना ही मंडळीं आजही आश्वसने देण्यातच मश्गूल आहेत, त्यांना कामांचे भान राहिलेले नाही, सर्वसामान्य माणूस या आश्वासनाच्या होळीत होरपळ असताना भाजपा सरकार जुलमी कायदे करत सर्वसामान्यांना वेटीस धरु पहात आहे. ज्या प्रमाणे ब्रिटिश सरकारच्या विरोधात असहकार व सविनय कायदेभंगाची चळवळ सुरु करण्यात आली होती त्याचप्रमाणे कॉग्रेस जन संघर्ष यात्रेच्या माध्यमातून भाजपा सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरली आहे. जगताप म्हणाले दोन वर्षात भाजपाने देशाला दहा वर्षे मागे नेहले आहे. 

भारत हा कुठुंबप्रधान देश

भारत हा कुठुंबप्रधान देश असताना भाजपा सरकार या देशात शंभर पेक्षा जास्त लोक एखादया समारंभा निमित्त एकत्र येणार असले तरी पोलीस परवाना घेणे अनिवार्य करण्याचा कायदा करु पहात आहे. भारताच्या अखंडत्वाला तडा देण्याचा हा फतवा असून नागरिकांनी भाजपा सरकारच्या या जाचक कायदयाला विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरावे असे आवाहन जगताप यांनी केले.