शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

गुजरातमध्ये काँग्रेसचा मुडदा का उठला? उद्धव ठाकरे

By admin | Updated: December 4, 2015 11:39 IST

मोदींचा गुजरात १०० टक्के भाजपाच्या पाठीशी उभा नाही, हाच गुजरातच्या निकालाचा अर्थ आहे, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि.४  - भाजपवर कुरघोडी करण्याची एकही संधी न सोडणा-या शिवसेनेने गुजरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालावरुन भाजपला टोले लगावले आहेत. मोदींचा गुजरात १०० टक्के भाजपाच्या पाठीशी उभा नाही, हाच गुजरातच्या निकालाचा अर्थ आहे, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.  काँग्रेसमुक्त हिंदुस्थानचा नारा पंतप्रधान मोदी यांनी दिला होता, पण बिहारनंतर मोदी-शहा यांच्या गुजरातमध्येच शवपेटीतून काँग्रेसचा ‘मुडदा’ उठून उभा राहिला, हे चित्र देशासाठी चांगले नाही, असा टोला त्यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'च्या अग्रलेखातून लगावला आहे. 
गुजरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत भाजपचा जय झाला असे सांगितले जात असले तरीही या निवडणुकांत काँग्रेसचा पराभव झाला असे म्हणता येणार नाही, असेही उद्धव यांनी म्हटले आहे. गुजरातमध्ये काँग्रेस हरूनही जिंकली आहे. निवडणुकीच्या या निकालामुळे पंतप्रधानांच्या ‘होम पिच’वर भाजपसाठी धोक्याची घंटा वाजली असल्याचे सांगत, असे का घडले, यावर त्या मंडळींनी मंथन व चिंतन करावे, असा सल्लाही उद्धव यांनी दिला आहे. 
 
काय म्हटले आहे अग्रलेखात :
- बिहार विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सपाटून मार खाल्ला. त्यामुळे गुजरातच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काय होतेय, याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले होते. हार्दिक पटेलचे ‘पाटीदार’ आंदोलन व मोदी सरकारची घसरत चाललेली लोकप्रियता यामुळे गुजरातच्या या निवडणुकांचा निकाल बिहारप्रमाणेच लागेल असे वातावरण होते. आता निकाल लागले आहेत व ग्रामीण विरुद्ध शहरी अशी सरळ विभागणी झालेली दिसते. महानगरपालिकांवर भाजपचा झेंडा फडकला तर जिल्हा परिषदांत काँग्रेसचा हात मजबूत झाला. निकालाचा अर्थ इतकाच की, मोदींचा गुजरात शंभर टक्के भाजपच्या मागे उभा राहिलेला दिसत नाही. गुजरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत भाजपचा जय झाला असे सांगितले जाते. म्हणजे अहमदाबाद, जामनगर, सुरत, वडोदरा, राजकोट, भावनगर या महानगरपालिका भाजपने जिंकल्या, पण या निवडणुकांत काँग्रेसचा पराभव झाला असे म्हणता येणार नाही. 
- या निवडणुकीत कोण जिंकले आणि कोण हरले या चिवडाचिवडीत कोणी पडू नये. बिहारात काँग्रेसला संजीवनी मिळाली हे ठीक, पण गुजरातसारख्या राज्यात काँग्रेसला जीवदान मिळणे चिंताजनक आहे. गुजरातमध्ये काँग्रेस हरूनही जिंकली आहे. पंतप्रधानांच्या ‘होम पिच’वर भाजपसाठी धोक्याची घंटा वाजली असेल तर हे असे का घडले, यावर मंथन व चिंतन त्या मंडळींनी करायचे आहे. 
- ज्या बिहारने लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना जबरदस्त यश दिले त्याच बिहारने विधानसभा निवडणुकीत मोदी व अमित शहा यांचे काहीएक ऐकले नाही. पण बिहार व गुजरातमध्ये फरक आहे. मोदी यांनी गुजरात पॅटर्नचा प्रचार करून देश जिंकला व दिल्ली काबीज केली. मोदी हे सध्या पंडित नेहरूंप्रमाणे जागतिक स्तरावर चमकत आहेत, पण देशाचे प्रश्‍न वेगळे आहेत व अनेक आघाड्यांवर चिंतेचे वातावरण आहे. महागाईवर नियंत्रण येत नाही व भडकलेला वणवा थंड होत नाही. महाराष्ट्रासारख्या राज्यात भाजपचे मुख्यमंत्री व सरकार असले तरी तूरडाळीसह अनेक जीवनावश्यक वस्तूंचे भाव वणव्यासारखे भडकले आहेत. हीच परिस्थिती कमीअधिक प्रमाणात सर्वच राज्यांत आहे. 
- पाकिस्तानच्या हल्ल्यात रोज जवान जखमी होत आहेत किंवा शहीद होत आहेत. गुजरात राज्यातले लोक सैन्यात नसले तरी इतर राज्यांत सैनिकांचे ‘ताबूत’ म्हणजे शवपेट्या जातात तेव्हा त्या माता-पित्यांचे, मुलाबाळांचे सरकारला शापच लागत असतात, पण गुजरातसारख्या व्यापारी व कृषिप्रधान राज्यातही भाजपला नाराजीचा सामना करावा लागत आहे. विकासाच्या बाबतीत गुजरात अव्वल हे चित्र खरे असेल तर ग्रामीण भाग भाजपच्या विरोधात का गेला, हा अभ्यासाचा विषय आहे.
- राष्ट्रीय स्वयंसेवक संघातदेखील गुजरातमध्ये अवघ्या दीड वर्षात परिस्थिती एवढी कशी बदलली याविषयी चिंता व्यक्त होत आहे आणि ती साहजिकच आहे. जो काँग्रेस पक्ष मागील १५ वर्षांत त्या राज्यात केवळ नाममात्र शिल्लक होता तो अचानक भाजपला टक्कर देण्याच्या स्थितीत कसा आला हा संघासाठी चिंतेचा आणि चिंतनाचाच विषय आहे.