शहरं
Join us  
Trending Stories
1
त्रिभाषा सूत्र १०० टक्के आम्ही महाराष्ट्रात लागू करणारच; CM देवेंद्र फडणवीसांची ठाम भूमिका
2
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
3
Viral Video : चोरी करायला जिममध्ये गेला, मिळाली अशी शिक्षा की आयुष्यभर लक्षात राहील!
4
Video: "जर मी मेले तर..." प्रसिद्ध अभिनेत्याचा ४ बायकांसोबत संसार; तिसरीला छळलं? Ex वाईफचा गंभीर आरोप
5
एक इंजिन फेल झाले, इंडिगोचे विमान मुंबईच्या दिशेने वळवले; दिल्ली-गोवा फ्लाईटचे आपत्कालीन लँडिंग
6
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
7
‘शार्क’शिवाय ‘सार्क’? अशक्य!
8
एअर इंडियाला इंधन नियंत्रण स्विचमध्ये कोणताही दोष आढळला नाही, बोईंग 787 विमानाची तपासणी पूर्ण
9
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
10
आत्ता फक्त बिहार, नंतर तुमच्याही मानेवर तलवार! मतदार यादी व्हेरिफिकेशनचे वास्तव भयानकच...
11
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
12
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
13
राज्य कामगार विमा योजनेत नोंदणी नसलेल्यांनी लक्ष द्या...
14
अकबर ‘सहिष्णू’ तर औरंगजेब ‘मंदिर पाडणारा...’; आठवीच्या पाठ्यपुस्तकात एनसीईआरटीकडून उल्लेख
15
बंपर लॉटरी लागली! भारतात सापडले कच्चे तेल, छाेटे राज्य हाेणार मालामाल
16
इस्रायली उद्योजकापासून दोन मुली; पतीला न सांगता महिला गोव्यातून गेली गुहेत राहायला
17
अधिवेशन गाजणार? विरोधक करणार कोंडी; काँग्रेससह विरोधी पक्षांकडून मुद्द्यांची जुळवाजुळव सुरू
18
जुनी शस्त्रे वापरून भारताला आधुनिक युद्धे जिंकणे अवघड; सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे परखड मत
19
इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत २१ पट वाढ; चार्जिंग स्टेशनही तीन वर्षांत ५ पट वाढले
20
रस्ते अपघातांच्या मुळाशी पोलिस का जात नाहीत? वाहनचालकच का ठरतात गुन्हेगार?

काँग्रेसला राज्यातील सरकार अस्थिर करायचंय - नितीन गडकरी

By admin | Updated: February 25, 2017 16:14 IST

काँग्रेसला राज्यातील सरकार अस्थिर करायचे आहे. यामुळेच काँग्रेस शिवसेनेला समर्थन देण्याची भाषा करत आहे, असे टीकास्त्र नितीन गडकरी यांनी सोडले आहे.

 ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 25 - मुंबई महानगरपालिकेतील सत्तेपासून भाजपाला दूर ठेवण्यासाठी शिवसेना-काँग्रेसच्या संभाव्य युतीची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. यावरुन भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल चढवला आहे. 
'काँग्रेसला राज्यातील सरकार अस्थिर करायचे आहे. यामुळेच काँग्रेसमधील काही नेतेमंडळी शिवसेनेला समर्थन देण्याची भाषा करत आहे', असे टीकास्त्र नितीन गडकरी यांनी सोडले आहे. 
(...तर जनता काँग्रेसला माफ करणार नाही - गुरुदास कामत)
 
मुंबई महापालिका निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने शिवसेनेनं आपले पर्याय खुले ठेवल्याचे म्हटले जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महापौर पदासाठी शिवसेना काँग्रेसचा पाठिंबा घेऊ शकते. तसंच शिवसेनेकडून काँग्रेसला उप-महापौर पदाची ऑफरही देण्यात आली आहे. शिवाय, शिवसेना फडणवीस सरकारसोबतचे नाते संपुष्टात आणून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊन सत्तेसाठी नवे समिकरण बनवू शकते, अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. 
 
या सर्व चर्चांनुसार,  नितीन गडकरी यांनी संभाव्य युतीचे संकेतावर आपला रोष व्यक्त करत काँग्रेसवर निशाणा साधला आहे. तर दुसरीकडे, शिवसेना-भाजपाने एकत्र येणे गरजेचं आहे, असेही यावेळी ते म्हणाले आहेत. यापूर्वी गडकरींनी 'शिवसेना-भाजपाला एकत्र येण्याशिवाय दुसरा पर्याय नाही', असे वक्तव्य केले होते.  दरम्यान, शिवसेना कोणासोबत युती करणार हे पाहणं आता औत्सुक्याचे ठरले आहे.