शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
2
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
3
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
4
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
5
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
6
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
7
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
8
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
9
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
10
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
11
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
12
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
13
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
14
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
15
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
16
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
17
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
18
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
19
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
20
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...

काँग्रेस जागावाटपावर ठाम

By admin | Updated: September 1, 2014 01:57 IST

आघाडीमध्ये विधानसभेची एकही जास्त जागा सोडू नये, असे आपले मत आहे आणि आपण ते श्रेष्ठींना कळविले असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी रविवारी ‘लोकमत’ला दिली

यदु जोशी, मुंबईराष्ट्रवादी काँग्रेसला आघाडीमध्ये विधानसभेची एकही जास्त जागा सोडू नये, असे आपले मत आहे आणि आपण ते श्रेष्ठींना कळविले असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी रविवारी ‘लोकमत’ला दिली. राष्ट्रवादीला जागा वाढवून मागण्याचा अधिकार काय, असा सवालही त्यांनी केला.२००९ च्या निवडणुकीत आम्ही १७४ आणि राष्ट्रवादीने ११४ जागा लढविल्या होत्या. तेच सूत्र यावेळीही कायम राहिले पाहिजे. हे सूत्र बदलण्याचा कोणता तर्क त्यांच्याकडे आहे, असा सवाल ठाकरे यांनी केला. जागा वाढवून मागायच्या असतील तर काही आधार त्यासाठी असला पाहिजे.२००९ च्या विधानसभा निवडणुकीत आम्ही त्यांच्यापेक्षा २० जागा जास्त जिंकल्या होत्या. ते ६२ तर आम्ही ८२ जागा जिंकलेल्या होत्या. तो आधार आम्ही २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपात घेतला असता तर आम्हाला जागा वाढवून मिळाल्या असत्या पण त्यावेळी राष्ट्रवादीने ठाम नकार दिला होता. आता त्यांना जागा वाढवून मागण्याचा अधिकार नाही, असे माणिकराव म्हणाले. राष्ट्रवादीला जागा वाढवून देऊ नयेत, ही प्रदेश काँग्रेसची मानसिकता आहे. अर्थात जागा वाटपाचा चेंडू आता श्रेष्ठींच्या कोर्टात आहे. निर्णय दोन्ही पक्षांच्या श्रेष्ठींना घ्यायचा आहे. पण आम्ही आमच्या भूमिकेवर कायम आहोत, असे ते म्हणाले. काँग्रेसने राष्ट्रवादीला १२० जागा देवू केल्या आहेत, या वृत्ताकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, दोन्ही पक्षांच्या श्रेष्ठींनी दिल्लीत केलेल्या चर्चेत असे काही झाल्याचे ऐकिवात आहे. काँग्रेस श्रेष्ठींनी आम्हाला तसे अधिकृतपणे काहीही कळविलेले नाही. जागा वाटपाचा सन्मानजनक तोडगा निघाला पाहिजे, अशी भूमिका आपण आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतली होती. आता एकही जागा वाढवून देवू नये, अशी भूमिका आपण घेत आहात याकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, सन्मानजनक तोडग्याची समोरच्यांची तयारीच नसेल तर मी मांडतोय ती भूमिका योग्यच आहे.