शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

पराभवासाठी काँग्रेसच जबाबदार - नारायण राणेंचा 'प्रहार'

By admin | Updated: April 16, 2015 10:16 IST

वांद्रे पूर्व पोटनिवडणुकीतील पराभवासाठी काँग्रेसच जबाबदार असल्याचे सांगत नारायण राणेंनी स्वपक्षावरच 'प्रहार' केला आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. १६ - वांद्रे पूर्व पोटनिवडणुकीतील पराभवासाठी काँग्रेसच जबाबदार असल्याचे सांगत नारायण राणेंनी स्वपक्षावरच 'प्रहार' केला आहे. काँग्रेसचे अनेक नेते हे फक्त चेहरे दाखवपण्यापुरते समोर होते. काळोख पडल्यावर अनेकांनी अनेक उद्योग केले व त्यामुळे राणे लढले, काँग्रेस हरली अशी स्थिती झाली असा आरोपही नारायण राणेंनी केला आहे. 

वांद्रे पूर्व निवडणुकीतील पराभवासंदर्भात गुरुवारी नारायण राणेंच्या प्रहार या दैनिकाने पराभवाचा विश्लेषण करणारा अग्रलेख लिहीला आहे. या लेखातून नारायण राणेंनी पराभवासाठी काँग्रेसच्या नेत्यांनाच जबाबदार ठरवले. राणेंसारखा आक्रमक व खंदा नेता विधानसभेत पोहोचू नये असे विरोधकांना वाटणे साहजिक आहे. पण यात स्वपक्षातील अनेक नेत्यांनाही हेच वाटते होते. प्रचारफेरीच्या जीपमध्ये काँग्रेस एकत्र दिसत होता. पण काळोखात अनेकांनी अनेक उद्योग केले असे नारायण राणेंनी म्हटले आहे. वांद्य्रातील पराभव हा नारायण राणेंचा नसून काँग्रेसचा आहे असेही यात नमूद करण्यात आले आहे. या लेखाच्या माध्यमातून नारायण राणेंचा रोख काँग्रेसच्या कोणत्या नेत्यांवर होता याविषयी चर्चा रंगू लागली आहे.