शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
3
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
4
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
5
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
6
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
7
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
8
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
9
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
10
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
11
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
12
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
13
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
14
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
15
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
16
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
17
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
18
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
19
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
20
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...

काँग्रेसने अल्पसंख्याकांची केवळ ठेकेदारी केली!

By admin | Updated: September 12, 2016 02:32 IST

स्वबळावर लढण्याचे खा. प्रफुल्ल पटेल यांचे संकेत.

अकोला, दि. ११ : काँग्रेसने अल्पसंख्याकांची केवळ ठेकेदारी केली आहे. काँग्रेसशिवाय दलित आणि अल्पसंख्याकांना दुसरा पर्याय नाही असा या पक्षाचा गैरसमज आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र तसे नाही. कॉग्रेसचनेच राष्ट्रवादीचे सर्वार्धिक नुकसान केले काँग्रेस पक्षाचा आतापयर्ंतचा हा कटू अनुभव लक्षात घेता आगामी स्थानिक स्वराज्य संस्था तसेच विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यानी आतापासूनच कामाला लागावे, असे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खा. प्रफुल्ल पटेल यांनी रविवारी येथे केले. यावेळी त्यांनी काँग्रेससह सत्ताधारी भाजपवर सडकून टीका केली.महेश भवनात खा. पटेल यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बोलताना खा. पटेल पुढे म्हणाले की, काँग्रेस पक्ष आपणच अल्यसंख्याकाचे कैवारी असल्याच्या अविर्भावात आहे. काँग्रेसशिवाय दलित आणि अल्पसंख्याकांना दुसरा पर्याय नाही असा या पक्षाचा गैरसमज आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र तसे नाही. अल्पसंख्याकाच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेसने वेळप्रसंगी संघर्षही केला आहे. ही बाब सलत असल्यामुळे काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेहमीच पाय ओढले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तोंडावर असून कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावे.राट्रवादी कॉग्रेसला विदर्भात भरपूर वाव आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार हे सतत विदर्भातील शेतकर्‍यांच्या पाठीशी उभे राहतात.कर्जमाफीपासून ते कमी व्याजदराने कर्ज मिळावे म्हणून पवारांनी वेळोवेळी प्रयत्न केले आहेत. पवारांसारखे दुरदृष्टी असणारे नेतृत्व ही पक्षाची खरी ताकद असून कार्यकर्त्यांनी यामधून ऊर्जा घेऊन काम केल्यास त्यांना कुणीही रोखू शकणार नाही, असा विश्‍वास त्यांनी कार्यकर्त्यांना यावेळी दिला. सत्ताधारी भाजपवर टीका करताना खा. पटेल म्हणाले की, भाजपने केवळ मतदारांना भूलथापा देऊन सत्ता मिळविली. कोट्यवधींच्या रस्त्यांच्या कामांचे उद्घाटन केले. प्रत्यक्षात कुठेच रस्ते नाही. विरोधी पक्षात असताना शेतमालासाठी अनेक आंदोलन करणारे देवेंद्र फडणवीस आता शेतमालांचे भाव वाढविण्यास तयार नाहीत. ह्यचाय पे चर्चाह्ण, ह्यमन की बातह्ण करण्यापलीकडे भाजप पोहोचले नाहीत. शेतकरी, कष्टकरी, सामान्य नागरिकांपासून स्वतंत्र विदर्भापर्यंत दिलेली भाजपची आश्‍वासने फोल ठरली आहेत. विदर्भाचे प्रश्न सोडविण्यासाठी आता नागपुरात राष्ट्रवादीचे कार्यालय उघडले जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय नेते नितीन गडकरी विदर्भाचे असतानाही यांनी काय विकास केला, याचे उत्तर द्यावे, असा प्रश्नही त्यांनी केला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक महानगर अध्यक्ष अजय तापडिया आणि जिल्हाध्यक्ष विजय देशमुख केले. जिल्हय़ाची माहिती त्यांनी येथे सांगितली. याप्रसंगी राष्ट्रवादीचे शिरीष धोत्रे, डॉ. आशाताई मिरगे, पद्माताई अहेरकर, प्रा. विश्‍वनाथ कांबळे, चंद्रकांत ठाकरे, अतुल लोंढे, श्रीकांत पिसे, सचिन वाकोडे, नितीन झापर्डे, राजू मूलचंदानी, सरफराज खान, बुडन गाडेकर, दिलीप देशमुख, अनिल मालगे, अली सर आदी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार राष्ट्रवादी महिला आघाडीच्या मंदाताई देशमुख यांनी मानले.*वीज बिलात ग्राहकांची लूट !वीजेचे दर २.६४ रुपये युनिट असताना ग्राहकांना दहा रुपये युनिटप्रमाणे विक्री सुरू आहे. आंतरराष्ट्रीय पेट्रोलच्या किमती शंभर डॉलरने कमी झालेल्या असतानाही ग्राहकांसाठी दर कमी झालेले नाही. आघाडी शासनाने २ लाख कोटींचा तोटा सहन केला; मात्र सामान्य जनतेवर भुर्दंड येऊ दिला नाही; मात्र हे सरकार नागरिकांच्या खिशातून २ लाख कोटींचा नफा कमावित आहे.*पृथ्वीराज चव्हाणांनी राकाँची बदनामी केली!राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेवढे नुकसान काँग्रेसने केले, तेवढे कोणीही केले नाही. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीच राष्ट्रवादीची बदनामी करण्याची कोणतीच कसर सोडली नाही. ह्यखुद तो डुबे सनम, हमको भी ले डुबेह्ण अशा पद्धतीची काँग्रेसची राकाँसोबत खेळी राहीली, अशा शब्दात खा. प्रफुल्ल पटेल यांनी काँग्रेसवर शरसंधान साधवले.