शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

लातुरात काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी

By admin | Updated: January 29, 2017 21:34 IST

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी झाली

ऑनलाइन लोकमतलातूर, दि. 29 - जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी झाली असून, औसा विधानसभा मतदारसंघातील गट व गणातील जागांची बोलणी सुरू आहे. उर्वरित ४ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीला जि़पच्या १० तर पंचायत समितीसाठी ११ जागा सोडण्यात आल्या असल्याची माहिती आमदार दिलीपराव देशमुख यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत रविवारी पत्रकार भवन येथे दिली.जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीची गेल्या पंधरा दिवसांपासून बोलणी सुरू होती. दोन्हीही पक्षांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीही घेतल्या असताना आघाडीचे संकेत दिले जात होते. दरम्यान, रविवारी संयुक्त पत्रकार परिषद आमदार दिलीपराव देशमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष माजी आ. बाबासाहेब पाटील यांनी आघाडी झाल्याचे जाहीर केले. लातूर जिल्हा परिषदेत एकूण ५८ जागा आहेत. त्यापैकी औसा विधानसभा मतदारसंघातील जागांची बोलणी सुरूच आहेत. लातूर ग्रामीण, अहमदपूर, उदगीर आणि निलंगा विधानसभा मतदारसंघातील गट व गणाच्या जागांची बोलणी पूर्ण झाली असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील मुरूड, अहमदपूर विधानसभा मतदार संघातील शिरूरताजबंद, रोकडा सावरगाव, खंडाळी, नळेगाव, जानवळ, चापोली, उदगीर विधानसभा मतदारसंघातील तोगरी, लोहारा आणि निलंगा विधानसभा मतदारसंघातील हलगरा जि़प गट सोडण्यात आला आहे, याच गटातील प्रत्येकी १ पं. स. गणाची जागा राष्ट्रवादीला सोडण्यात आली आहे. लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील २ पंचायत समितीच्या जागा राष्ट्रवादीला देण्यात आल्या आहेत. जि़पच्या १० आणि पंचायत समितीच्या ११ जागा राष्ट्रवादीला सोडण्यात आल्या असून, उर्वरित ३९ गट आणि ८७ गण काँग्रेसकडे असल्याची माहिती आमदार दिलीपराव देशमुख, माजी आ. बाबासाहेब पाटील यांनी दिली.औसा विधानसभा मतदारसंघात जि़पचे ९ गट आणि पं.स.चे १८ गण आहेत़ या जागा वाटपांची बोलणी सुरू असून पुढील दोन दिवसात यासंदर्भात हा निर्णय होणार असल्याचे आ. दिलीपराव देशमुख यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला आमदार अमित देशमुख, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. व्यंकट बेद्रे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संजय बनसोडे, बबन भोसले, काँग्रेसचे आबासाहेब पाटील, विजयकुमार पाटील, मोईज शेख, प्रा. बी़व्ही़ मोतीपवळे, सुनीता आरळीकर आदींची उपस्थिती होती. जिल्ह्यात सहमतीचे राजकारणजिल्ह्यात काँग्रेसने नेहमीच सहमतीचे राजकारण केले आहे. तेवढीच साथ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राहिलेली आहे. बाबासाहेब पाटील राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांचा आणि आमचा गेल्या ३० वर्षांचा संबंध आहे. जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था सक्षमपणे चालविण्यासाठी मतांचे विभाजन टाळण्यासाठी ही आघाडी करण्यात आली आहे. यापूर्वी काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढले परंतु स्थानिक पातळीवर स्वतंत्र लढलो होतो. पहिल्यांदाच जि़प, पं.स. साठी ही आघाडी झाली आहे, असेही आ. देशमुख म्हणाले.हल्ली निवडणुका विकास व कार्यक्रमांपेक्षा धर्म, संस्कृती आणि जाती-पातीवर होत आहेत. ही चिंताजनक बाब आहे़ जाती-पातीच्या आणि धर्माच्या नावावर निवडणुका होत असल्याने दरी निर्माण होण्याची शक्यता आहे़ ही चुकीची प्रथा रोखण्याची जबाबदारी निधर्मी पक्षांवर आहे. सर्वाधिक जबाबदारी काँग्रेस पक्षाची आहे, म्हणून आघाडी केली असल्याचेही आ. देशमुख म्हणाले.