शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! ३७ जणांना अटक
2
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
3
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
4
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
5
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
6
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
7
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
8
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
9
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
10
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
11
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
12
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
13
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
14
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
15
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
16
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
17
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
18
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
19
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
20
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...

विधिमंडळातील डावपेचांवर काँग्रेस, राष्ट्रवादीची बैठक

By admin | Updated: July 1, 2015 01:24 IST

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मंत्र्यांचे घोटाळे, बनावट पदव्या, राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची दुरवस्था या मुद्द्यांवरून सरकारला घेरण्याचा निर्णय काँग्रेस

मुंबई : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मंत्र्यांचे घोटाळे, बनावट पदव्या, राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची दुरवस्था या मुद्द्यांवरून सरकारला घेरण्याचा निर्णय काँग्रेस व राष्ट्रवादी नेत्यांच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेतेपदावरील दाव्यावरून तर अर्थसंकल्पीय अधिवेशनात माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांच्यावरील अविश्वास प्रस्तावामुळे विरोधकांमधील फुटीचे दर्शन घडले होते. मात्र दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांच्या बैठकीत सरकारला धारेवर धरण्याचा निर्णय झाला. महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे, शिक्षणमंत्री विनोद तावडे, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर अशा एकेका मंत्र्यांचे प्रकरण सध्या गाजत आहे. यावरून सरकारला लक्ष्य करण्याचे बैठकीत ठरले. कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या तपासात प्रगती झालेली नाही. राज्याच्या अनेक भागात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी आयपीएलचे वादग्रस्त माजी कमिशनर ललित मोदी यांची भेट घेतल्याचे प्रकरण ताजे आहे. अशा मुद्द्यांवरून सरकारला कोंडीत पकडण्याचे ठरले. त्याचबरोबर सरकार विरोधी पक्षाच्या नेत्यांना हेतूत: चौकशीच्या प्रकरणात अडकवत असून त्याचाही ठाम विरोध करण्याचे यावेळी ठरले.काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, अजित पवार, जयंत पाटील, माणिकराव ठाकरे आदी नेते बैठकीस हजर होते. (विशेष प्रतिनिधी)