शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
3
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
4
Sharvari Shende: महाराष्ट्राच्या शर्वरी शेंडेनं रचला इतिहास; तिरंदाजी स्पर्धेत देशासाठी सुवर्णपदक जिंकले!
5
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?
6
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्या नावाने केली शिष्यवृत्तीची घोषणा
7
"माझी हत्या होऊ शकते..." हकालपट्टी झालेल्या सपाच्या आमदार पूजा पाल यांचा धक्कादायक दावा
8
नीरज चोप्रा डायमंड लीग २०२५च्या अंतिम फेरीत; अँडरसन पीटर्स, ज्युलियन वेबरशी लढत!
9
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
10
सरकार उलथून टाकायला 'सलाईन वीर' जरांगेंकडे किती आमदार? लक्ष्मण हाकेंचा खोचक सवाल
11
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
12
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?
13
Ganesh Chaturthi 2025:अपरिहार्य कारणाने गणपती आणता आला नाही, तर शास्त्रात काय असतो पर्याय?
14
४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, सासरच्यांनी शोधून घरी आणलं; त्यानंतर असं काय घडलं, पतीने FB Live केले, मग...
15
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
16
सपा आमदाराच्या कारला अपघात, अचानक गाडीचे स्टेअरिंग तुटले अन्...
17
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
18
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
19
"तिला घेऊ नको, ती काळी आहे...", मराठी अभिनेत्रीला करावा लागलेला वर्णभेदाचा सामना
20
सनातन धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी शीख गुरूंनी बलिदान दिलं -CM योगी आदित्यनाथ 

काँग्रेस-राष्ट्रवादीला धाकधूक

By admin | Updated: October 16, 2014 04:31 IST

राज्याच्या सत्तासोपानासाठी महत्त्वाच्या ठरणा-या २४ जागा असलेल्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत यंदा विक्रमी मतदान झाले

राज्याच्या सत्तासोपानासाठी महत्त्वाच्या ठरणा-या २४ जागा असलेल्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत यंदा विक्रमी मतदान झाले आहे़ सर्व पक्ष स्वतंत्र लढल्याने मताचा टक्का वाढला. १८ जागा असलेल्या ठाणे जिल्ह्यात ५३, तर पालघर जिल्ह्यात ६४ टक्के मतदान झाल्याचा अंदाज दोन्ही जिल्ह्यांच्या प्रशासनाने व्यक्त केला आहे़ मतदानाची वाढलेली टक्केवारी राज्यातील सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीचे ठोके चुकविणारी ठरू शकते़ दोन्ही जिल्ह्यांत शिवसेना-भाजपाच्या जागा वाढतील, असे वाढलेल्या मतदानावरून दिसते़ ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गणेश नाईक यांच्या नवी मुंबईत ५० टक्क्यांच्या वर मतदान झाल्याने राष्ट्रवादीच्या पायाखालची वाळू सरकली आहे़ ठाणे शहर आणि कल्याण-डोंबिवलीसह अंबरनाथमध्ये मराठी मतदार एकवटल्याने शिवसेनेचा बोलबाला राहील, असे दिसते़ डोंबिवली, मुरबाड, विक्रमगड, भिवंडी ग्रामीण येथे पुन्हा कमळ खुलू शकते़मतदान वाढल्याने वसई-नालासोपाऱ्यात बहुजन विकास आघाडीची शिटी कितपत वाजते, यात शंका आहे़ कळवा-मुंब्य्रात एकूण उमेदवारांत ९ मुस्लीम असल्याने त्याचा फायदा माजी वैद्यकीय शिक्षणमंत्री जितेंद्र आव्हाड यांना होण्याची शक्यता आहे़ कल्याण ग्रामीणमध्ये शिवसेनेतील मतभेदांमुळे व भाजपाच्या सहकार्यामुळे मनसेचे इंजिन धावू शकते़ पालघरमध्ये माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित यांना मोठी कसरत करावी लागली.मावळत्या विधानसभेत दोन्ही जिल्हे मिळून शिवसेना (६ + १) ७, भाजपा ४, राष्ट्रवादी (५ +१) ६, बहुजन विकास आघाडी - २, मनसे- २ आणि समाजवादी, सीपीएम आणि काँगे्रस प्रत्येकी १ असे २४ आमदार होते़