शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

काँग्रेस-राष्ट्रवादीला धाकधूक

By admin | Updated: October 16, 2014 04:31 IST

राज्याच्या सत्तासोपानासाठी महत्त्वाच्या ठरणा-या २४ जागा असलेल्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत यंदा विक्रमी मतदान झाले

राज्याच्या सत्तासोपानासाठी महत्त्वाच्या ठरणा-या २४ जागा असलेल्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत यंदा विक्रमी मतदान झाले आहे़ सर्व पक्ष स्वतंत्र लढल्याने मताचा टक्का वाढला. १८ जागा असलेल्या ठाणे जिल्ह्यात ५३, तर पालघर जिल्ह्यात ६४ टक्के मतदान झाल्याचा अंदाज दोन्ही जिल्ह्यांच्या प्रशासनाने व्यक्त केला आहे़ मतदानाची वाढलेली टक्केवारी राज्यातील सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीचे ठोके चुकविणारी ठरू शकते़ दोन्ही जिल्ह्यांत शिवसेना-भाजपाच्या जागा वाढतील, असे वाढलेल्या मतदानावरून दिसते़ ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गणेश नाईक यांच्या नवी मुंबईत ५० टक्क्यांच्या वर मतदान झाल्याने राष्ट्रवादीच्या पायाखालची वाळू सरकली आहे़ ठाणे शहर आणि कल्याण-डोंबिवलीसह अंबरनाथमध्ये मराठी मतदार एकवटल्याने शिवसेनेचा बोलबाला राहील, असे दिसते़ डोंबिवली, मुरबाड, विक्रमगड, भिवंडी ग्रामीण येथे पुन्हा कमळ खुलू शकते़मतदान वाढल्याने वसई-नालासोपाऱ्यात बहुजन विकास आघाडीची शिटी कितपत वाजते, यात शंका आहे़ कळवा-मुंब्य्रात एकूण उमेदवारांत ९ मुस्लीम असल्याने त्याचा फायदा माजी वैद्यकीय शिक्षणमंत्री जितेंद्र आव्हाड यांना होण्याची शक्यता आहे़ कल्याण ग्रामीणमध्ये शिवसेनेतील मतभेदांमुळे व भाजपाच्या सहकार्यामुळे मनसेचे इंजिन धावू शकते़ पालघरमध्ये माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित यांना मोठी कसरत करावी लागली.मावळत्या विधानसभेत दोन्ही जिल्हे मिळून शिवसेना (६ + १) ७, भाजपा ४, राष्ट्रवादी (५ +१) ६, बहुजन विकास आघाडी - २, मनसे- २ आणि समाजवादी, सीपीएम आणि काँगे्रस प्रत्येकी १ असे २४ आमदार होते़