शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

काँग्रेस-राष्ट्रवादीला धाकधूक

By admin | Updated: October 16, 2014 04:31 IST

राज्याच्या सत्तासोपानासाठी महत्त्वाच्या ठरणा-या २४ जागा असलेल्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत यंदा विक्रमी मतदान झाले

राज्याच्या सत्तासोपानासाठी महत्त्वाच्या ठरणा-या २४ जागा असलेल्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत यंदा विक्रमी मतदान झाले आहे़ सर्व पक्ष स्वतंत्र लढल्याने मताचा टक्का वाढला. १८ जागा असलेल्या ठाणे जिल्ह्यात ५३, तर पालघर जिल्ह्यात ६४ टक्के मतदान झाल्याचा अंदाज दोन्ही जिल्ह्यांच्या प्रशासनाने व्यक्त केला आहे़ मतदानाची वाढलेली टक्केवारी राज्यातील सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीचे ठोके चुकविणारी ठरू शकते़ दोन्ही जिल्ह्यांत शिवसेना-भाजपाच्या जागा वाढतील, असे वाढलेल्या मतदानावरून दिसते़ ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गणेश नाईक यांच्या नवी मुंबईत ५० टक्क्यांच्या वर मतदान झाल्याने राष्ट्रवादीच्या पायाखालची वाळू सरकली आहे़ ठाणे शहर आणि कल्याण-डोंबिवलीसह अंबरनाथमध्ये मराठी मतदार एकवटल्याने शिवसेनेचा बोलबाला राहील, असे दिसते़ डोंबिवली, मुरबाड, विक्रमगड, भिवंडी ग्रामीण येथे पुन्हा कमळ खुलू शकते़मतदान वाढल्याने वसई-नालासोपाऱ्यात बहुजन विकास आघाडीची शिटी कितपत वाजते, यात शंका आहे़ कळवा-मुंब्य्रात एकूण उमेदवारांत ९ मुस्लीम असल्याने त्याचा फायदा माजी वैद्यकीय शिक्षणमंत्री जितेंद्र आव्हाड यांना होण्याची शक्यता आहे़ कल्याण ग्रामीणमध्ये शिवसेनेतील मतभेदांमुळे व भाजपाच्या सहकार्यामुळे मनसेचे इंजिन धावू शकते़ पालघरमध्ये माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित यांना मोठी कसरत करावी लागली.मावळत्या विधानसभेत दोन्ही जिल्हे मिळून शिवसेना (६ + १) ७, भाजपा ४, राष्ट्रवादी (५ +१) ६, बहुजन विकास आघाडी - २, मनसे- २ आणि समाजवादी, सीपीएम आणि काँगे्रस प्रत्येकी १ असे २४ आमदार होते़