शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

काँग्रेसमुळे थांबली ५७२ कोटींची लूट

By admin | Updated: October 23, 2015 04:02 IST

माहिती अधिकारात माहिती मागवताच ऊर्जा खात्याचे सचिव मुकेश खुल्लर यांनी स्वत: घेतलेला निर्णय बदलल्याने ५७२ कोटींची लूट थांबली, असा दावा प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते

मुंबई : माहिती अधिकारात माहिती मागवताच ऊर्जा खात्याचे सचिव मुकेश खुल्लर यांनी स्वत: घेतलेला निर्णय बदलल्याने ५७२ कोटींची लूट थांबली, असा दावा प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी पत्रकार परिषदेत केला.जे एस डब्लू इस्पात लिमिटेड या कंपनीला जनतेचा खिसा कापून दसरा आणि दिवाळीची भेट देण्याचा घाट राज्याच्या ऊर्जा मंत्रालयाने घातला होता. काँग्रेसच्या चौकीदारीमुळे हा प्रकार उघडकीस आला, असे सावंत यांनी सांगितले. ते म्हणाले, १९९३च्या सामूहिक प्रोत्साहन योजनेअंतर्गत उद्योग विभागातर्फे मोठ्या प्रकल्पांना विक्रीकरामध्ये मुभा देण्यात आलेली होती; तर १९९९ साली मेगा प्रकल्पांना वीज शुल्क माफी देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. मात्र, सदर वीज शुल्क माफीची मुदत आॅगस्ट २०१२मध्ये संपल्यानंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सदर कंपनीकडून वीज शुल्काची वसुली सुरू केली. त्यामुळे या कंपन्यांनी शासनाकडे धाव घेतली. मात्र, या कंपनीला वीज शुल्क माफी देता येत नाही, असे उद्योग आणि वित्त विभागाचे आक्षेप होते. राज्याच्या विधी व न्याय विभागाने तर हा निर्णय घेऊ नये, घेतल्यास तो मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेतला जावा, असे सूचित केले होते. शिवाय, वीज शुल्क माफीचा निर्णय घेण्यापूर्वी महाराष्ट्र इलेक्ट्रीसिटीचा ‘अ‍ॅक्ट ५ अ’नुसार नोटिफिकेशन जारी करणे अभिप्रेत असते. असे असताना ऊर्जा मंत्रालयाचे सचिव मुकेश खुल्लर यांनी ५७२ कोटी रुपयांची वीज शुल्क माफी देण्याचा निर्णय गुपचूप एका पत्राद्वारे १४ आॅक्टोबर रोजी घेतला. हा निर्णय पूर्णपणे बेकायदेशीर, नियम व धोरणांचे उल्लंघन करून घेतला गेल्याची कुणकुण लागताच आपण माहिती अधिकार कायद्यान्वये सदर प्रकरणाची नस्ती मागितली. (विशेष प्रतिनिधी)माहिती अधिकारात केलेल्या अर्जामुळे या प्रकरणाचे बिंग फुटणार असे लक्षात येताच वीज शुल्क माफीच्या निर्णयास सचिवांनी स्थगिती दिली. ऊर्जा सचिवांनी स्वत:चाच निर्णय बदलल्याने राज्याची ५७२ कोटींची लूट थांबली.- सचिन सावंत, प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते