शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
2
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
3
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
4
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
5
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
6
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
7
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
8
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
9
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
10
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
11
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
12
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
13
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
14
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
15
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
16
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
17
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
18
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
19
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
20
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."

काँग्रेसमुळेच युरिया उत्पादन प्रकल्प बंद

By admin | Updated: February 14, 2016 00:24 IST

युरिया उत्पादन करणारे देशात ३२ प्रकल्प आहेत. काँग्रेस सरकारच्या काळात त्यापैकी आठ प्रकल्प बंद पडले. स्वदेशात खतनिर्मिती करण्याऐवजी युरियाची परदेशातून आयात करण्याचा

अहमदनगर : युरिया उत्पादन करणारे देशात ३२ प्रकल्प आहेत. काँग्रेस सरकारच्या काळात त्यापैकी आठ प्रकल्प बंद पडले. स्वदेशात खतनिर्मिती करण्याऐवजी युरियाची परदेशातून आयात करण्याचा काँग्रेसला जास्त पुळका होता. त्यामुळे युरियाच्या किमती वाढल्या होत्या, असा आरोप केंद्रीय खाते व रसायने राज्यमंत्री हंसराज अहेर यांनी केला.अहमदनगर येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, देशात वर्षभरात २२० लाख टन युरिया उत्पादन केले जाते, तर २० हजार टन युरिया बाहेरच्या देशातून आणला जातो. यामध्ये टनामागे साडेपाच हजार अनुदान दिले जाते. आतापर्यंत ७५ हजार कोटीचे अनुदान वाटप केलेले आहे. सध्या युरियाचा कोणत्याही ठिकाणी तुडवडा नाही. निंबोळीचे तेल वापरून त्याचे आवरण देऊन आता युरिया तयार केला जात आहे. यामुळे युरियाची उपयुक्तता वाढली असून, दूधभेसळीसारखे दुरुपयोग कमी झाले आहेत. अशा आवरणामुळे युरियाचे विरघळणे किंवा हवेत उडण्याचे प्रमाण कमी झाले आहे. आतापर्यंत गॅसचा वापर करून युरियाचे उत्पादन केले जात होते. आता कोळशाचा वापर केला जाणार असून, युरियानिर्मितीचे नवे प्रकल्प विदर्भात उभारले जाणार आहेत. चीनमध्ये ८० टक्के युरियाचे उत्पादन कोळशावर केले जाते, भारतात मात्र हे प्रमाण शून्य टक्के आहे. सामान्य जनतेसाठी प्रत्येक आरोग्य केंद्रावर जेनेरिक औषधांचा स्टॉल लावण्याबाबत नियोजन सुरू आहे. स्वतंत्र विदर्भनिर्मितीला सरकार अनुकूलछोट्या राज्यांची निर्मिती हे केंद्र सरकारचे धोरण असून, चर्चेमधूनच स्वतंत्र विदर्भाची निर्मिती व्हावी. छोट्या राज्यांची निर्मिती म्हणजे ही काही देशाची फाळणी नाही, असे सांगत स्वतंत्र विदर्भ करण्याबाबत केंद्र सरकार अनुकूल असल्याचे संकेत अहेर यांनी दिले.