शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकांमध्ये काँग्रेसलाच यश मिळेल

By admin | Updated: September 22, 2016 04:59 IST

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाला निर्भेळ यश मिळेल, असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला.

मुंबई : राज्यातील भाजप-शिवसेना सरकारचे अपयश उघडे झाले असून राज्यातल्या जनतेचा तीव्र असंतोष पाहता आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाला निर्भेळ यश मिळेल, असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला.राज्यातील २६ जिल्ह्यातील २१४ नगरपालिका, नगरपंचायतींच्या निवडणुका येत्या डिसेंबरमध्ये होणार आहेत. या निवडणुकांच्या नियोजनासंदर्भात काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या टिळक भवनात आयोजित करण्यात आली होती. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना चव्हाण म्हणाले, राज्य सरकार या निवडणुकांमध्ये राजकीय हस्तक्षेप करत असून जाणीवपूर्वक संभ्रमावस्था ठेवण्याचा प्रयत्न सुरु आहे. नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडण्याचा निर्णय घेऊनही याबाबत सरकारकडून निवडणुक आयोगाला अंधारात ठेवण्याचे काम होत आहे. पंरतु काँग्रेस पक्ष एकदिलाने या निवडणुका लढेल आणि काँग्रेस पक्षाचे सर्व नेते जोमाने निवडणुकीला सामोरे जातील, असा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला.मराठा आणि मुस्लीम आरक्षणा संदर्भात राज्य सरकार जाणीवपूर्वक चालढकल करीत आहे. त्याचबरोबर दलित समाजात गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. एट्रोसिटी कायदा रद्द करण्यासंदर्भात काँग्रेसचा तीव्र विरोध राहील, असे सांगताना चव्हाण यांनी या कायद्याची अंमलबजावणी करताना शासनातर्फे त्याचा दुरुपयोग होऊ नये याकरिता उपाययोजना कराव्यात असे म्हटले आहे. याबरोबरच राज्याचे माजी मुख्यमंत्री सहकारमहर्षी कै. वसंतदादा पाटील यांचे जन्मशताब्दी वर्ष १३ नोव्हेंबरपासून काँग्रेस पक्षाकडून राज्यभरात साजरे करण्यात येणार आहे, असे चव्हाण म्हणाले.बैठकीत निवडणुकांसंदर्भात कार्यकर्त्यांचे मेळावे, बैठका, निवडणुकांच्या नियोजनाच्या संदर्भात समग्र चर्चा झाली. बैठकीला विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे आदी उपस्थित होते. (विशेष जाहप)