शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राफेलमधून सफर; २० मिनिटे पाहिली, भारताच्या नव्या योद्ध्याची ताकद...
2
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
3
स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी
4
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
5
माणुसकीला काळिमा! पत्नीनेच ५५ वर्षीय पतीच्या प्रायव्हेट पार्टवर केला वार; कारण ऐकून बसेल धक्का
6
दाऊद इब्राहिमचा विश्वासू दानिश ‘चिकना’ला गोव्यातून अटक; ड्रग्स सिंडिकेटवर NCBची मोठी कारवाई
7
रतन टाटांची 'टाटा' राहिली का? त्यांच्या 'या' पहिल्या खास व्यक्तीला बाहेरचा रस्ता दाखविला; कोण आहेत मिस्त्री?
8
"आता कर्ज घ्यावं लागेल..."; पाकिस्तानमध्ये एका टोमॅटोची किंमत ७५ रुपये, का वाढली महागाई?
9
"श्रेयस अय्यरची सर्जरी झालीच नाही," BCCIनी दिली वेगळीच माहिती, ताज्या अपडेटमध्ये नेमकं काय?
10
Bigg Boss 19: ये बात! महाराष्ट्रीयन भाऊने करुन दाखवलंच, प्रणित मोरे बनला 'बिग बॉस'च्या घरातील नवा कॅप्टन
11
मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...
12
Lenskart IPO: 'व्हॅल्युएशन'चा आकडा एवढा मोठा की वाचायला 'लेन्स'ची गरजच नाही; पण गुंतवणूकदारांना ते झेपेल का?
13
'त्या' भारतीय नागरिकाला आता होऊ शकते १० वर्षांची कैद अन् २.५ लाख डॉलर्सचा दंड! नेमकं प्रकरण काय?
14
निवडणुकांचा पत्ता नाही अन् शरद पवार गटाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर; जयंत पाटील मैदानात
15
विवाह मुहूर्त: २०२५-२६ मध्ये ४९ दिवस विवाह मुहूर्त; खरोखरच करावी लागणार लगीन 'घाई'
16
कॅनडात भारतीय वंशाच्या उद्योगपतीची गोळ्या झाडून हत्या; लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली जबाबदारी
17
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
18
आधी सिनेमातून काढलं अन् आता...; 'कल्कि'च्या मेकर्सची दीपिकाविरोधात पुन्हा खेळी; चाहते संतापले
19
सगळं संपलं असं वाटतंय? हातातून सर्व निसटून जातंय? स्वामींचे ‘हे’ शब्द नक्कीच प्रेरणा देतील!
20
प्रकट दिन २०२५: स्वामी अन् शंकर महाराजांची भेट कशी झाली? ब्रह्मांडनायक गुरुचा अद्भूत शिष्य

निवडणुकांमध्ये काँग्रेसलाच यश मिळेल

By admin | Updated: September 22, 2016 04:59 IST

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाला निर्भेळ यश मिळेल, असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला.

मुंबई : राज्यातील भाजप-शिवसेना सरकारचे अपयश उघडे झाले असून राज्यातल्या जनतेचा तीव्र असंतोष पाहता आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाला निर्भेळ यश मिळेल, असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला.राज्यातील २६ जिल्ह्यातील २१४ नगरपालिका, नगरपंचायतींच्या निवडणुका येत्या डिसेंबरमध्ये होणार आहेत. या निवडणुकांच्या नियोजनासंदर्भात काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या टिळक भवनात आयोजित करण्यात आली होती. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना चव्हाण म्हणाले, राज्य सरकार या निवडणुकांमध्ये राजकीय हस्तक्षेप करत असून जाणीवपूर्वक संभ्रमावस्था ठेवण्याचा प्रयत्न सुरु आहे. नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडण्याचा निर्णय घेऊनही याबाबत सरकारकडून निवडणुक आयोगाला अंधारात ठेवण्याचे काम होत आहे. पंरतु काँग्रेस पक्ष एकदिलाने या निवडणुका लढेल आणि काँग्रेस पक्षाचे सर्व नेते जोमाने निवडणुकीला सामोरे जातील, असा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला.मराठा आणि मुस्लीम आरक्षणा संदर्भात राज्य सरकार जाणीवपूर्वक चालढकल करीत आहे. त्याचबरोबर दलित समाजात गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. एट्रोसिटी कायदा रद्द करण्यासंदर्भात काँग्रेसचा तीव्र विरोध राहील, असे सांगताना चव्हाण यांनी या कायद्याची अंमलबजावणी करताना शासनातर्फे त्याचा दुरुपयोग होऊ नये याकरिता उपाययोजना कराव्यात असे म्हटले आहे. याबरोबरच राज्याचे माजी मुख्यमंत्री सहकारमहर्षी कै. वसंतदादा पाटील यांचे जन्मशताब्दी वर्ष १३ नोव्हेंबरपासून काँग्रेस पक्षाकडून राज्यभरात साजरे करण्यात येणार आहे, असे चव्हाण म्हणाले.बैठकीत निवडणुकांसंदर्भात कार्यकर्त्यांचे मेळावे, बैठका, निवडणुकांच्या नियोजनाच्या संदर्भात समग्र चर्चा झाली. बैठकीला विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे आदी उपस्थित होते. (विशेष जाहप)