शहरं
Join us  
Trending Stories
1
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशूंशी संवाद
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
3
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
4
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
5
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
6
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
9
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
10
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
11
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
12
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
13
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
14
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
15
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
19
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
20
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 

निवडणुकांमध्ये काँग्रेसलाच यश मिळेल

By admin | Updated: September 22, 2016 04:59 IST

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाला निर्भेळ यश मिळेल, असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला.

मुंबई : राज्यातील भाजप-शिवसेना सरकारचे अपयश उघडे झाले असून राज्यातल्या जनतेचा तीव्र असंतोष पाहता आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाला निर्भेळ यश मिळेल, असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला.राज्यातील २६ जिल्ह्यातील २१४ नगरपालिका, नगरपंचायतींच्या निवडणुका येत्या डिसेंबरमध्ये होणार आहेत. या निवडणुकांच्या नियोजनासंदर्भात काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या टिळक भवनात आयोजित करण्यात आली होती. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना चव्हाण म्हणाले, राज्य सरकार या निवडणुकांमध्ये राजकीय हस्तक्षेप करत असून जाणीवपूर्वक संभ्रमावस्था ठेवण्याचा प्रयत्न सुरु आहे. नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडण्याचा निर्णय घेऊनही याबाबत सरकारकडून निवडणुक आयोगाला अंधारात ठेवण्याचे काम होत आहे. पंरतु काँग्रेस पक्ष एकदिलाने या निवडणुका लढेल आणि काँग्रेस पक्षाचे सर्व नेते जोमाने निवडणुकीला सामोरे जातील, असा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला.मराठा आणि मुस्लीम आरक्षणा संदर्भात राज्य सरकार जाणीवपूर्वक चालढकल करीत आहे. त्याचबरोबर दलित समाजात गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. एट्रोसिटी कायदा रद्द करण्यासंदर्भात काँग्रेसचा तीव्र विरोध राहील, असे सांगताना चव्हाण यांनी या कायद्याची अंमलबजावणी करताना शासनातर्फे त्याचा दुरुपयोग होऊ नये याकरिता उपाययोजना कराव्यात असे म्हटले आहे. याबरोबरच राज्याचे माजी मुख्यमंत्री सहकारमहर्षी कै. वसंतदादा पाटील यांचे जन्मशताब्दी वर्ष १३ नोव्हेंबरपासून काँग्रेस पक्षाकडून राज्यभरात साजरे करण्यात येणार आहे, असे चव्हाण म्हणाले.बैठकीत निवडणुकांसंदर्भात कार्यकर्त्यांचे मेळावे, बैठका, निवडणुकांच्या नियोजनाच्या संदर्भात समग्र चर्चा झाली. बैठकीला विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे आदी उपस्थित होते. (विशेष जाहप)