शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसला आदिवासींचा विसर - नरेंद्र मोदी

By admin | Updated: October 13, 2014 13:03 IST

स्वातंत्र्याच्या लढाईत महत्वाची भूमिका बजावणा-या आदिवासी समाजाचा काँग्रेसला विसर पडल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली.

ऑनलाइन लोकमत
पालघर, दि. १३ - स्वातंत्र्याच्या लढाईत महत्वाची भूमिका बजावणा-या आदिवासी समाजाचा काँग्रेसला विसर पडला असून इतक्या वर्षांत त्यांनी आदिवासी समाजाच्या हितासाठी एकही काम केले नाही, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला. विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस असून पालघरमधील सभेत बोलताना पंतप्रधानांनी काँग्रेसवर कडाडून टीका करत आपल्या आत्तापर्यंतच्या कामाचा जनतेला लेखाजोगाही दिला. 
स्वातंत्र्य मिळाल्यापासून देशात काँग्रेसचे सरकार आहे, मात्र त्यांनी कधीच आदिवासी समाजाच्या हिताचा, कल्याणाचा विचार केला नाही. इतक्या वर्षांत त्यांना आदिवासींसाठी एक मंत्रालय बनवता आले नाही, काँग्रेसला आदिवासींचा विसर पडला आहे अशी टीका त्यांनी केली. वाजपेयींच्या काळात आदिवासींसाठी वेगळे मंत्रालय झाले, आदिवासींना मंत्री बनवण्यात आले. आमच्या सरकारने या बजेटमध्येही आदिवासींसाठी अनेक योजना आणल्या आहेत, असे ते म्हणाले. 
महाराष्ट्र व गुजरातमधील मच्छिमार एकमेकांच्या सुखदु:खातील साथीदार असल्याचा उल्लेखही त्यांनी या सभेत केला. अनेक मच्छिमार शेजारील देशातील तुरुंगात कैद असल्याचे सांगत मच्छिमारांच्या हिताबद्दल विचार करणे हे माझे काम असल्याचे ते म्हणाले. तसेच पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यावर सर्वात पहिल्यांदा मी पाकिस्तानचे अध्यक्ष नवाझ शरीफ यांच्याशी याच मुद्यावर चर्चा केली, असे त्यांनी सांगितले. पाकिस्तानमधील २०० मच्छिमारांची सुटका झाली, इराकमध्ये अडकलेल्या नर्सेसचीही सुटका झाल्याचेही त्यांनी नमूद केले. 
नुकत्याच निर्माण झालेल्या पालघर जिल्ह्याबद्दल बोलताना त्यांनी ज्याप्रमाणे नवजात बाळाची पालक, नातेवाईक काळजी घेतात, त्याचप्रमाणे नवीन जिल्ह्याची काळजी घेणे हे सरकारचे काम असते. त्यामुळे केंद्राप्रमाणे महाराष्ट्रातही भाजपाला पूर्ण बहुमत द्या आणि तुमच्या जिल्ह्याच्या विकास करण्याची संधी द्या, असे आवाहन त्यांनी केले.