शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसला आदिवासींचा विसर - नरेंद्र मोदी

By admin | Updated: October 13, 2014 13:03 IST

स्वातंत्र्याच्या लढाईत महत्वाची भूमिका बजावणा-या आदिवासी समाजाचा काँग्रेसला विसर पडल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली.

ऑनलाइन लोकमत
पालघर, दि. १३ - स्वातंत्र्याच्या लढाईत महत्वाची भूमिका बजावणा-या आदिवासी समाजाचा काँग्रेसला विसर पडला असून इतक्या वर्षांत त्यांनी आदिवासी समाजाच्या हितासाठी एकही काम केले नाही, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला. विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस असून पालघरमधील सभेत बोलताना पंतप्रधानांनी काँग्रेसवर कडाडून टीका करत आपल्या आत्तापर्यंतच्या कामाचा जनतेला लेखाजोगाही दिला. 
स्वातंत्र्य मिळाल्यापासून देशात काँग्रेसचे सरकार आहे, मात्र त्यांनी कधीच आदिवासी समाजाच्या हिताचा, कल्याणाचा विचार केला नाही. इतक्या वर्षांत त्यांना आदिवासींसाठी एक मंत्रालय बनवता आले नाही, काँग्रेसला आदिवासींचा विसर पडला आहे अशी टीका त्यांनी केली. वाजपेयींच्या काळात आदिवासींसाठी वेगळे मंत्रालय झाले, आदिवासींना मंत्री बनवण्यात आले. आमच्या सरकारने या बजेटमध्येही आदिवासींसाठी अनेक योजना आणल्या आहेत, असे ते म्हणाले. 
महाराष्ट्र व गुजरातमधील मच्छिमार एकमेकांच्या सुखदु:खातील साथीदार असल्याचा उल्लेखही त्यांनी या सभेत केला. अनेक मच्छिमार शेजारील देशातील तुरुंगात कैद असल्याचे सांगत मच्छिमारांच्या हिताबद्दल विचार करणे हे माझे काम असल्याचे ते म्हणाले. तसेच पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यावर सर्वात पहिल्यांदा मी पाकिस्तानचे अध्यक्ष नवाझ शरीफ यांच्याशी याच मुद्यावर चर्चा केली, असे त्यांनी सांगितले. पाकिस्तानमधील २०० मच्छिमारांची सुटका झाली, इराकमध्ये अडकलेल्या नर्सेसचीही सुटका झाल्याचेही त्यांनी नमूद केले. 
नुकत्याच निर्माण झालेल्या पालघर जिल्ह्याबद्दल बोलताना त्यांनी ज्याप्रमाणे नवजात बाळाची पालक, नातेवाईक काळजी घेतात, त्याचप्रमाणे नवीन जिल्ह्याची काळजी घेणे हे सरकारचे काम असते. त्यामुळे केंद्राप्रमाणे महाराष्ट्रातही भाजपाला पूर्ण बहुमत द्या आणि तुमच्या जिल्ह्याच्या विकास करण्याची संधी द्या, असे आवाहन त्यांनी केले.