शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
4
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
5
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
6
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
7
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
8
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
9
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
10
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
11
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
12
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
13
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
14
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
15
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
17
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
18
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
19
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
20
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...

काँग्रेसला आदिवासींचा विसर - नरेंद्र मोदी

By admin | Updated: October 13, 2014 13:03 IST

स्वातंत्र्याच्या लढाईत महत्वाची भूमिका बजावणा-या आदिवासी समाजाचा काँग्रेसला विसर पडल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली.

ऑनलाइन लोकमत
पालघर, दि. १३ - स्वातंत्र्याच्या लढाईत महत्वाची भूमिका बजावणा-या आदिवासी समाजाचा काँग्रेसला विसर पडला असून इतक्या वर्षांत त्यांनी आदिवासी समाजाच्या हितासाठी एकही काम केले नाही, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला. विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस असून पालघरमधील सभेत बोलताना पंतप्रधानांनी काँग्रेसवर कडाडून टीका करत आपल्या आत्तापर्यंतच्या कामाचा जनतेला लेखाजोगाही दिला. 
स्वातंत्र्य मिळाल्यापासून देशात काँग्रेसचे सरकार आहे, मात्र त्यांनी कधीच आदिवासी समाजाच्या हिताचा, कल्याणाचा विचार केला नाही. इतक्या वर्षांत त्यांना आदिवासींसाठी एक मंत्रालय बनवता आले नाही, काँग्रेसला आदिवासींचा विसर पडला आहे अशी टीका त्यांनी केली. वाजपेयींच्या काळात आदिवासींसाठी वेगळे मंत्रालय झाले, आदिवासींना मंत्री बनवण्यात आले. आमच्या सरकारने या बजेटमध्येही आदिवासींसाठी अनेक योजना आणल्या आहेत, असे ते म्हणाले. 
महाराष्ट्र व गुजरातमधील मच्छिमार एकमेकांच्या सुखदु:खातील साथीदार असल्याचा उल्लेखही त्यांनी या सभेत केला. अनेक मच्छिमार शेजारील देशातील तुरुंगात कैद असल्याचे सांगत मच्छिमारांच्या हिताबद्दल विचार करणे हे माझे काम असल्याचे ते म्हणाले. तसेच पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यावर सर्वात पहिल्यांदा मी पाकिस्तानचे अध्यक्ष नवाझ शरीफ यांच्याशी याच मुद्यावर चर्चा केली, असे त्यांनी सांगितले. पाकिस्तानमधील २०० मच्छिमारांची सुटका झाली, इराकमध्ये अडकलेल्या नर्सेसचीही सुटका झाल्याचेही त्यांनी नमूद केले. 
नुकत्याच निर्माण झालेल्या पालघर जिल्ह्याबद्दल बोलताना त्यांनी ज्याप्रमाणे नवजात बाळाची पालक, नातेवाईक काळजी घेतात, त्याचप्रमाणे नवीन जिल्ह्याची काळजी घेणे हे सरकारचे काम असते. त्यामुळे केंद्राप्रमाणे महाराष्ट्रातही भाजपाला पूर्ण बहुमत द्या आणि तुमच्या जिल्ह्याच्या विकास करण्याची संधी द्या, असे आवाहन त्यांनी केले.