शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचा अखेर शिवसेनेला ‘हात’

By admin | Updated: March 21, 2017 03:38 IST

एकहाती सत्ता संपादित केल्यानंतरही आता काँग्रेसच्या हाताला टाळी देऊन शिवसेना स्थायी समितीच्या चाव्यादेखील आपल्याकडे ठेवणार

ठाणे : एकहाती सत्ता संपादित केल्यानंतरही आता काँग्रेसच्या हाताला टाळी देऊन शिवसेना स्थायी समितीच्या चाव्यादेखील आपल्याकडे ठेवणार असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले होते. त्यावर मंगळवारअखेर शिक्कामोर्तब होणार असून, काँग्रेसला या बदल्यात स्थायी समितीचे सदस्यपद मिळणार असल्याचेही स्पष्ट होत आहे. यातून पारदर्शकतेचा डिंगोरा पिटणाऱ्या भाजपाला बाहेर ठेवण्यात शिवसेना अखेर यशस्वी झाली आहे.ठाणे महापालिकेची सत्ता प्रथमच एकहाती संपादित करून शिवसेनेने एक नवा इतिहास रचला. परंतु, तरीदेखील स्थायीच्या चाव्या आपल्याकडे ठेवण्यासाठी किंबहुना स्थायीची समीकरणे जुळवून घेण्यासाठी शिवसेनेकडून नवी राजकीय समीकरणे जुळवण्याच्या हालचालींना मागील काही दिवसांपासून वेग आला होता. स्थायी समितीमध्ये १६ सदस्य निवडून जाणार आहेत. परंतु, आठ सदस्य शिवसेनेचे गेल्यास विरोधी बाकावर असलेले राष्ट्रवादी व भाजपा हे अपक्ष, एमआयएम आणि काँग्रेसला हाताशी घेऊन शिवसेनेच्या हातातोंडातील घास काढून घेण्याच्या तयारीला लागले होते. परंतु, शिवसेनेने ही चाल ओखळली आणि काँग्रेसबरोबर चर्चा सुरू केली होती. तसेच एक अपक्ष आणि एमआयएमलादेखील बरोबर घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानुसार, आता शिवसेनेचे आठ आणि काँग्रेसचा एक अशी समीकरणे जुळवून स्थायी समितीदेखील एकहाती आपल्याकडे ठेवण्यात शिवसेनेला यश आल्याचे बोलले जात आहे. काँग्रेसला या बदल्यात स्थायी समितीत स्थान तर मिळणार आहेच, शिवाय एक स्वीकृतदेखील त्यांच्या पदरात पडण्याची शक्यता आहे. एकूणच मागील कित्येक दिवस काँग्रेस कोणाबरोबर जाणार, या चर्चेला अखेर मंगळवारी पूर्णविराम मिळणार आहे. ते शिवसेनेबरोबर जाणार असल्याचे पत्र कोकण विभागीय आयुक्तांना देणार असल्याची माहिती पक्षाच्या सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)तीन जागा तरीही काँगे्रसला लॉटरी-ठाण्यात काँग्रेस नुकत्याच झालेल्या महापालिकेत राष्ट्रवादीबरोबर आघाडी करून लढली होती. मात्र, त्यांना अपेक्षित असे यश मिळवता आलेच नाही. त्यांच्या अवघ्या तीनच जागा निवडून आल्या. त्यामुळे पालिकेत त्यांना कोणत्याही ठिकाणी स्थान मिळणार नाही, अशी शक्यताही निर्माण झाली होती. परंतु, आता स्थायी समितीच्या चाव्या आपल्याकडे ठेवण्यासाठी शिवसेनेने काँग्रेसला गळ घातली आहे. २०१२ मध्येदेखील त्यांनी अशाच प्रकारे काँग्रेसला राष्ट्रवादीपासून वेगळे करून स्वतंत्र गटाची निर्मिती करण्यास भाग पाडले होते. च्तीच खेळी शिवसेनेने या निवडणुकीतही खेळल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीबरोबर आघाडी करणाऱ्या काँग्रेसने निवडणुकीनंतर राष्ट्रवादीशी घरोबा करण्यास टाळाटाळ केली. त्याचाच फायदा आता त्यांना होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.२३ जागा जिंकूनही भाजपाच्या हाती कटोरा स्थायीची समीकरणे जुळवण्यासाठी शिवसेना आपल्याला टाळी मागेल, अशी आशा २३ जागा जिंकणाऱ्या भाजपाला होती. परंतु, पारदर्शकतेच्या या पहारेकऱ्याला सत्तेत कोणताच वाटा न देण्याची भूमिका एकहाती सत्ता आल्यापासून शिवसेनेने घेतली होती. त्यामुळेच भाजपाबरोबर युती करण्याऐवजी त्यांनी आता काँग्रेस आणि अपक्षांना हाताशी घेऊन सत्तेच्या चाव्या आपल्याकडे खेचल्या आहेत. त्यामुळे भाजपाची स्थायीसाठी शिवसेनेसोबत युती होण्याच्या आशादेखील मावळल्या आहेत. एकूणच आता त्यांना पहारेकरीच्याच भूमिकेत पुढील पाच वर्षे काम करावे लागणार आहेत.