शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
3
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
4
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
5
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
6
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
7
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
8
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
9
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
10
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
11
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
12
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
13
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
14
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
15
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
16
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
17
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
18
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
19
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
20
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी

काँग्रेसचा अखेर शिवसेनेला ‘हात’

By admin | Updated: March 21, 2017 03:38 IST

एकहाती सत्ता संपादित केल्यानंतरही आता काँग्रेसच्या हाताला टाळी देऊन शिवसेना स्थायी समितीच्या चाव्यादेखील आपल्याकडे ठेवणार

ठाणे : एकहाती सत्ता संपादित केल्यानंतरही आता काँग्रेसच्या हाताला टाळी देऊन शिवसेना स्थायी समितीच्या चाव्यादेखील आपल्याकडे ठेवणार असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले होते. त्यावर मंगळवारअखेर शिक्कामोर्तब होणार असून, काँग्रेसला या बदल्यात स्थायी समितीचे सदस्यपद मिळणार असल्याचेही स्पष्ट होत आहे. यातून पारदर्शकतेचा डिंगोरा पिटणाऱ्या भाजपाला बाहेर ठेवण्यात शिवसेना अखेर यशस्वी झाली आहे.ठाणे महापालिकेची सत्ता प्रथमच एकहाती संपादित करून शिवसेनेने एक नवा इतिहास रचला. परंतु, तरीदेखील स्थायीच्या चाव्या आपल्याकडे ठेवण्यासाठी किंबहुना स्थायीची समीकरणे जुळवून घेण्यासाठी शिवसेनेकडून नवी राजकीय समीकरणे जुळवण्याच्या हालचालींना मागील काही दिवसांपासून वेग आला होता. स्थायी समितीमध्ये १६ सदस्य निवडून जाणार आहेत. परंतु, आठ सदस्य शिवसेनेचे गेल्यास विरोधी बाकावर असलेले राष्ट्रवादी व भाजपा हे अपक्ष, एमआयएम आणि काँग्रेसला हाताशी घेऊन शिवसेनेच्या हातातोंडातील घास काढून घेण्याच्या तयारीला लागले होते. परंतु, शिवसेनेने ही चाल ओखळली आणि काँग्रेसबरोबर चर्चा सुरू केली होती. तसेच एक अपक्ष आणि एमआयएमलादेखील बरोबर घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानुसार, आता शिवसेनेचे आठ आणि काँग्रेसचा एक अशी समीकरणे जुळवून स्थायी समितीदेखील एकहाती आपल्याकडे ठेवण्यात शिवसेनेला यश आल्याचे बोलले जात आहे. काँग्रेसला या बदल्यात स्थायी समितीत स्थान तर मिळणार आहेच, शिवाय एक स्वीकृतदेखील त्यांच्या पदरात पडण्याची शक्यता आहे. एकूणच मागील कित्येक दिवस काँग्रेस कोणाबरोबर जाणार, या चर्चेला अखेर मंगळवारी पूर्णविराम मिळणार आहे. ते शिवसेनेबरोबर जाणार असल्याचे पत्र कोकण विभागीय आयुक्तांना देणार असल्याची माहिती पक्षाच्या सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)तीन जागा तरीही काँगे्रसला लॉटरी-ठाण्यात काँग्रेस नुकत्याच झालेल्या महापालिकेत राष्ट्रवादीबरोबर आघाडी करून लढली होती. मात्र, त्यांना अपेक्षित असे यश मिळवता आलेच नाही. त्यांच्या अवघ्या तीनच जागा निवडून आल्या. त्यामुळे पालिकेत त्यांना कोणत्याही ठिकाणी स्थान मिळणार नाही, अशी शक्यताही निर्माण झाली होती. परंतु, आता स्थायी समितीच्या चाव्या आपल्याकडे ठेवण्यासाठी शिवसेनेने काँग्रेसला गळ घातली आहे. २०१२ मध्येदेखील त्यांनी अशाच प्रकारे काँग्रेसला राष्ट्रवादीपासून वेगळे करून स्वतंत्र गटाची निर्मिती करण्यास भाग पाडले होते. च्तीच खेळी शिवसेनेने या निवडणुकीतही खेळल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीबरोबर आघाडी करणाऱ्या काँग्रेसने निवडणुकीनंतर राष्ट्रवादीशी घरोबा करण्यास टाळाटाळ केली. त्याचाच फायदा आता त्यांना होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.२३ जागा जिंकूनही भाजपाच्या हाती कटोरा स्थायीची समीकरणे जुळवण्यासाठी शिवसेना आपल्याला टाळी मागेल, अशी आशा २३ जागा जिंकणाऱ्या भाजपाला होती. परंतु, पारदर्शकतेच्या या पहारेकऱ्याला सत्तेत कोणताच वाटा न देण्याची भूमिका एकहाती सत्ता आल्यापासून शिवसेनेने घेतली होती. त्यामुळेच भाजपाबरोबर युती करण्याऐवजी त्यांनी आता काँग्रेस आणि अपक्षांना हाताशी घेऊन सत्तेच्या चाव्या आपल्याकडे खेचल्या आहेत. त्यामुळे भाजपाची स्थायीसाठी शिवसेनेसोबत युती होण्याच्या आशादेखील मावळल्या आहेत. एकूणच आता त्यांना पहारेकरीच्याच भूमिकेत पुढील पाच वर्षे काम करावे लागणार आहेत.