शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

तख्त राखण्याचे काँग्रेसपुढे कडवे आव्हान

By admin | Updated: February 10, 2017 00:51 IST

दुभंगलेला पक्ष : महाडिक गटही यंदा बाजूला; नेत्यांनी कटुता विसरून एकजूट दाखविली तरच यश

काँग्रेसजिल्हा परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी आता चांगलीच तापू लागली आहे. ग्रामीण विकासाचे महत्त्वाचे सत्ताकेंद्र असलेल्या या संस्थेवर पकड मिळविण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी शड्डू ठोकले आहेत. या पक्षाचा गतनिवडणुकीतील ‘परफॉर्मन्स’ कसा होता व या निवडणुकीतील त्यांची ‘अवस्था’ काय राहील याचे पक्षनिहाय विवेचन आजपासून...कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेत गेली पन्नास वर्षे असलेले ‘सत्तेचे तख्त’ राखण्याचे आव्हान या निवडणुकीत काँग्रेसपुढे आहे. गटा-तटांमध्ये व नेत्यांच्या अहंभावामध्ये संघटना दुभंगली आहे. केंद्रात व राज्यातील सत्तेची सावली भाजपने हिरावून घेतली आहे. त्यामुळे नेतृत्वापासून कार्यकर्त्यांपर्यंत सगळेच सैरभैर झाले असताना ही निवडणूक जिंकण्याचे आव्हान या पक्षापुढे आहे. त्यात भाजपने मोठे आव्हान कॉँग्रेससमोर उभे केले आहे. भाजप-जनसुराज्य युतीमुळे प्रथमच या निवडणुकीत शाहूवाडीसारख्या तालुक्यात कॉँग्रेसचा हात चिन्ह दिसणार नाही. कोल्हापूरची ‘विरोधकांचा जिल्हा’ अशी प्रतिमा असली तरी काँग्रेसच्या विचारांचा पायाही घट्ट राहिला आहे. गावातील सेवा सोसायटी, पतसंस्था, दूध संस्था एवढेच काय पिठाची गिरणही काँग्रेसच्या ताब्यात, अशी स्थिती एकेकाळी होती व आजही काही प्रमाणात ते चित्र अनेक गावांतून दिसते. साखर कारखानदारी, ‘गोकुळ’च्या सत्तेचाही काँग्रेसला आधार मिळाला. त्यामुळे काँग्रेसला उखडून काढणे आतापर्यंत कुणाला शक्य झाले नाही. काँग्रेसचा पराभव काँग्रेसच करू शकते; असे आतापर्यंतचे चित्र होते त्यात या निवडणुकीत पहिल्यांदाच भाजपने पक्षीय आव्हान उभे केले आहे.गेल्या निवडणुकीवेळी काँग्रेसचे जिल्ह्यात सतेज पाटील व दिवंगत नेते सा. रे. पाटील हे आमदार होते. लातूरला जयवंतराव आवळे खासदार होते. त्याशिवाय राज्याची सत्ता असल्याने पक्षाची राजकारणांवर, सत्ताकारणावर मांड होती. खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्यासारखा राजकीयदृष्ट्याा धिप्पाड नेताही काँग्रेससोबत होता. त्यांची काँग्रेसला कागल, राधानगरी व चंदगड तालुक्यांत मोठी मदत झाली होती. आता यातल्या बऱ्याच गोष्टी वजा झाल्या आहेत. विधानसभेला पक्षाचा एकही आमदार निवडून आला नाही. सतेज पाटील यांनी विधान परिषद जिंकल्यामुळे कार्यकर्त्यांना किमान सरकारी कामांसाठी आमदारांचे पत्र तरी मिळण्याची सोय झाली आहे. सत्ता नसल्यामुळे संघटनाही विशविशीत झाली आहे. आता ‘गोकुळ’ची कशी-बशी अर्धी सत्ता (अर्धे वाटेकरी महाडिक) सोडली तर पक्षाकडे ग्रामीण माणसांशी जोडणारे कोणतेही जिल्हास्तरीय सत्ताकेंद्र नाही. जिल्हा परिषदेत मागची पाच वर्षे एकहाती सत्ता असली तरी तिथे सांगता येईल, असे उठावदार काम झालेले नाही. जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील व आमदार सतेज पाटील, माजी मंत्री प्रकाश आवाडे व जयवंतराव आवळे यांच्या गटांत पक्षाची विभागणी झाली आहे. एवढे असूनही या निवडणुकीत सर्वांत जास्त ५२ जागा हाच पक्ष लढवीत आहे. नेत्यांनी एकमेकांच्या पायात पाय घातले नाहीत तर लोक अजूनही ‘हाता’ला साथ देऊ शकतात.महाडिक नसल्याचाही फटकागत निवडणुकीत माजी आमदार महादेवराव महाडिक कॉँग्रेससोबत होते. त्यांचा मुलगा अमल महाडिक हा जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा दावेदार असल्याने महाडिक गटाची पूर्ण ताकद कॉँग्रेसच्या मागे होती. मात्र, या निवडणुकीत महाडिक आपल्या ताराराणी आघाडीच्या माध्यमातून भाजपसोबत आहेत. त्यामुळे महाडिकांच्या उपद्रव्यमूल्याचा फटका कॉँग्रेसला बसू शकतो. याची झलक गगनबावड्यातच दिसून आली. कॉँग्रेसच्या छावणीतील एम. जी. पाटील हे भाजपकडून लढत आहेत. असेही होऊ शकते.. यावेळेला काँग्रेस २० जागांपर्यंत गेली तरी शिवसेना व स्वाभिमानीला सोबतीला घेऊन सत्ता टिकविण्याचा प्रयत्न करू शकते. करवीर तालुक्यात अजूनही पक्षाची स्थिती चांगली आहे. गतनिवडणुकीत कागल व चंदगडने काँग्रेसला हात दिला होता. त्यातील चंदगड यावेळेलाही काँग्रेसला पाठबळ देईल. कागलला काँग्रेस अस्तित्वहीन झाली असली तरी विरोधातला गट हा भाजपचाही कट्टर विरोधक आहे. त्यामुळे तिथे भाजप सोडून अन्य कुणाच्याही जागा आल्या तरी त्या सत्ताकारणात काँग्रेससोबतच राहतील. मावळत्या सभागृहातील पक्षाचे तालुकानिहाय बळ : एकूण ३१करवीर : ०८,कागल-०५, चंदगड-०४, हातकणंगले व भुदरगड प्रत्येकी : ०३, राधानगरी व शिरोळ - प्रत्येकी २, आजरा व गगनबावडा, शाहूवाडी प्रत्येकी -०१. गडहिंग्लज व पन्हाळा तालुक्यात एकही जागा नाही.संधी कोणत्या तालुक्यातया निवडणुकीत अडचणी असल्या तरी काँग्रेसला करवीर, चंदगड, पन्हाळा आणि राधानगरीत चांगल्या जागा शक्यहातकणंगलेत कुरघोडीचे राजकारण किती पुढे जाते यावर किती जागा येणार व पडणार हे ठरणार आहे.