शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

तख्त राखण्याचे काँग्रेसपुढे कडवे आव्हान

By admin | Updated: February 10, 2017 00:51 IST

दुभंगलेला पक्ष : महाडिक गटही यंदा बाजूला; नेत्यांनी कटुता विसरून एकजूट दाखविली तरच यश

काँग्रेसजिल्हा परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी आता चांगलीच तापू लागली आहे. ग्रामीण विकासाचे महत्त्वाचे सत्ताकेंद्र असलेल्या या संस्थेवर पकड मिळविण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी शड्डू ठोकले आहेत. या पक्षाचा गतनिवडणुकीतील ‘परफॉर्मन्स’ कसा होता व या निवडणुकीतील त्यांची ‘अवस्था’ काय राहील याचे पक्षनिहाय विवेचन आजपासून...कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेत गेली पन्नास वर्षे असलेले ‘सत्तेचे तख्त’ राखण्याचे आव्हान या निवडणुकीत काँग्रेसपुढे आहे. गटा-तटांमध्ये व नेत्यांच्या अहंभावामध्ये संघटना दुभंगली आहे. केंद्रात व राज्यातील सत्तेची सावली भाजपने हिरावून घेतली आहे. त्यामुळे नेतृत्वापासून कार्यकर्त्यांपर्यंत सगळेच सैरभैर झाले असताना ही निवडणूक जिंकण्याचे आव्हान या पक्षापुढे आहे. त्यात भाजपने मोठे आव्हान कॉँग्रेससमोर उभे केले आहे. भाजप-जनसुराज्य युतीमुळे प्रथमच या निवडणुकीत शाहूवाडीसारख्या तालुक्यात कॉँग्रेसचा हात चिन्ह दिसणार नाही. कोल्हापूरची ‘विरोधकांचा जिल्हा’ अशी प्रतिमा असली तरी काँग्रेसच्या विचारांचा पायाही घट्ट राहिला आहे. गावातील सेवा सोसायटी, पतसंस्था, दूध संस्था एवढेच काय पिठाची गिरणही काँग्रेसच्या ताब्यात, अशी स्थिती एकेकाळी होती व आजही काही प्रमाणात ते चित्र अनेक गावांतून दिसते. साखर कारखानदारी, ‘गोकुळ’च्या सत्तेचाही काँग्रेसला आधार मिळाला. त्यामुळे काँग्रेसला उखडून काढणे आतापर्यंत कुणाला शक्य झाले नाही. काँग्रेसचा पराभव काँग्रेसच करू शकते; असे आतापर्यंतचे चित्र होते त्यात या निवडणुकीत पहिल्यांदाच भाजपने पक्षीय आव्हान उभे केले आहे.गेल्या निवडणुकीवेळी काँग्रेसचे जिल्ह्यात सतेज पाटील व दिवंगत नेते सा. रे. पाटील हे आमदार होते. लातूरला जयवंतराव आवळे खासदार होते. त्याशिवाय राज्याची सत्ता असल्याने पक्षाची राजकारणांवर, सत्ताकारणावर मांड होती. खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्यासारखा राजकीयदृष्ट्याा धिप्पाड नेताही काँग्रेससोबत होता. त्यांची काँग्रेसला कागल, राधानगरी व चंदगड तालुक्यांत मोठी मदत झाली होती. आता यातल्या बऱ्याच गोष्टी वजा झाल्या आहेत. विधानसभेला पक्षाचा एकही आमदार निवडून आला नाही. सतेज पाटील यांनी विधान परिषद जिंकल्यामुळे कार्यकर्त्यांना किमान सरकारी कामांसाठी आमदारांचे पत्र तरी मिळण्याची सोय झाली आहे. सत्ता नसल्यामुळे संघटनाही विशविशीत झाली आहे. आता ‘गोकुळ’ची कशी-बशी अर्धी सत्ता (अर्धे वाटेकरी महाडिक) सोडली तर पक्षाकडे ग्रामीण माणसांशी जोडणारे कोणतेही जिल्हास्तरीय सत्ताकेंद्र नाही. जिल्हा परिषदेत मागची पाच वर्षे एकहाती सत्ता असली तरी तिथे सांगता येईल, असे उठावदार काम झालेले नाही. जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील व आमदार सतेज पाटील, माजी मंत्री प्रकाश आवाडे व जयवंतराव आवळे यांच्या गटांत पक्षाची विभागणी झाली आहे. एवढे असूनही या निवडणुकीत सर्वांत जास्त ५२ जागा हाच पक्ष लढवीत आहे. नेत्यांनी एकमेकांच्या पायात पाय घातले नाहीत तर लोक अजूनही ‘हाता’ला साथ देऊ शकतात.महाडिक नसल्याचाही फटकागत निवडणुकीत माजी आमदार महादेवराव महाडिक कॉँग्रेससोबत होते. त्यांचा मुलगा अमल महाडिक हा जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा दावेदार असल्याने महाडिक गटाची पूर्ण ताकद कॉँग्रेसच्या मागे होती. मात्र, या निवडणुकीत महाडिक आपल्या ताराराणी आघाडीच्या माध्यमातून भाजपसोबत आहेत. त्यामुळे महाडिकांच्या उपद्रव्यमूल्याचा फटका कॉँग्रेसला बसू शकतो. याची झलक गगनबावड्यातच दिसून आली. कॉँग्रेसच्या छावणीतील एम. जी. पाटील हे भाजपकडून लढत आहेत. असेही होऊ शकते.. यावेळेला काँग्रेस २० जागांपर्यंत गेली तरी शिवसेना व स्वाभिमानीला सोबतीला घेऊन सत्ता टिकविण्याचा प्रयत्न करू शकते. करवीर तालुक्यात अजूनही पक्षाची स्थिती चांगली आहे. गतनिवडणुकीत कागल व चंदगडने काँग्रेसला हात दिला होता. त्यातील चंदगड यावेळेलाही काँग्रेसला पाठबळ देईल. कागलला काँग्रेस अस्तित्वहीन झाली असली तरी विरोधातला गट हा भाजपचाही कट्टर विरोधक आहे. त्यामुळे तिथे भाजप सोडून अन्य कुणाच्याही जागा आल्या तरी त्या सत्ताकारणात काँग्रेससोबतच राहतील. मावळत्या सभागृहातील पक्षाचे तालुकानिहाय बळ : एकूण ३१करवीर : ०८,कागल-०५, चंदगड-०४, हातकणंगले व भुदरगड प्रत्येकी : ०३, राधानगरी व शिरोळ - प्रत्येकी २, आजरा व गगनबावडा, शाहूवाडी प्रत्येकी -०१. गडहिंग्लज व पन्हाळा तालुक्यात एकही जागा नाही.संधी कोणत्या तालुक्यातया निवडणुकीत अडचणी असल्या तरी काँग्रेसला करवीर, चंदगड, पन्हाळा आणि राधानगरीत चांगल्या जागा शक्यहातकणंगलेत कुरघोडीचे राजकारण किती पुढे जाते यावर किती जागा येणार व पडणार हे ठरणार आहे.