शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

विकासाला विरोध ही काँग्रेसची विकृतता

By admin | Updated: May 24, 2015 22:50 IST

नितीन गडकरी यांची टीका : भाजपच्या राज्य कार्यकारिणी बैठकीची सांगता; ‘जाणता राजा’ंच्या काळात शेती विकास दर कमी कसा?

कोल्हापूर : देशातील सामान्य माणसाचा आर्थिक विकास होण्यासाठी केंद्र सरकारने विकासाचे मॉडेल तयार केले आहे; पण विकृत मानसिकतेतून कॉँग्रेस भूमी अधिग्रहण कायद्याला विरोध करीत असल्याची टीका केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी केली. स्वत:ला ‘जाणता राजा’ म्हणवणाऱ्यांच्या काळात महाराष्ट्राचा शेती विकास दर घसरला कसा, कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या सरकारने काय केले? अशी विचारणाही त्यांनी यावेळी केली. भाजपच्या तीनदिवसीय प्रदेश कार्यकारिणी व राज्य परिषदेच्या सांगता समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे होते. गडकरी म्हणाले, कॉँग्रेसच्या ६५ वर्षांच्या राजवटीत काय मिळाले? भूकबळी, भ्रष्टाचार बोकाळला. शेतकऱ्यांनी आत्महत्या सुरू केल्या. भांडी-धुण्याच्या पावडरीचा दर गहू व ज्वारीला मिळू लागला, हे कॉँग्रेस सरकारचे धोरण होते. या सर्वांना कंटाळून जनतेने मोठ्या विश्वासाने सत्ता दिली आहे. ही सत्ता सर्वसामान्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्र्य निर्माण करण्यासाठी आहे. काहीजणांना खासदार, आमदार, मंत्री करण्यासाठीच ही सत्ता आहे, असे वाटते; पण आपली सत्ता सामाजिक व आर्थिक परिस्थिती बदलण्यासाठी आहे. हे जरी आव्हान असले तरी भाजपने ते स्वीकारले आहे. राष्ट्रवाद, राष्ट्रभक्ती व राष्ट्राचा सर्वांगीण विकास ही पक्षाची वैशिष्ट्ये असून सुशासन, विकास व डिजिटल इंडिया हे आपले भविष्य असल्याचे त्यांनी सांगितले. शरद पवार कृषिमंत्री असताना गुजरातचा कृषी विकास दर १४ टक्के, तर मध्यप्रदेशचा २३ टक्के होता, त्यावेळी महाराष्ट्राचा दर ऋण (उणे) होता असे सांगून गडकरी म्हणाले, ‘जाणत्या राजा’चे सरकार होते तर विकासदर ऋण कसा? सिंचन प्रकल्पात भ्रष्टाचार करून धरणांची कामे बंद पडल्याने महाराष्ट्राची ही अवस्था झाली; पण फडणवीस सरकारने ‘जलशिवार योजना’ सुरू केली आहे, तिची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे आवाहनही त्यांनी केले.ग्रामीण भागात राहणाऱ्यांची संख्या कमी होत आहे. लोकांच्या हाताला रोजगार नसल्याने ते गावे सोडत आहेत. यासाठी रस्ते, रोजगार उपलब्ध झाले पाहिजेत; तरच ग्रामीण चेहरा बदलणार आहे. यासाठी भूमी अधिग्रहण कायद्यात थोडे बदल केले; पण विकृत मानसिकतेतून कॉँग्रेस विरोध करीत आहे. ज्यांना खाणवाटप केले ते काय अल्पभूधारक होते का, असा सवाल करीत गरिबी दूर करणे व विकासासाठी भूमी अधिग्रहण कायदा आणला असताना आता आडकाठी का आणता? अशी विचारणाही गडकरी यांनी केली.जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश हाळवणकर यांनी प्रास्ताविक केले. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी मनोगत व्यक्त केले. पी. सतीश, शाम जाजू, मंत्री विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे, विद्या ठाकूर, चंद्रकांतदादा पाटील, गिरीश बापट, केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर, भाऊसाहेब फुंडकर यांच्यासह राज्यमंत्री, खासदार, आमदार, प्रदेश पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी) महिन्याभरात महामंडळांवरील नियुक्त्या असंख्य कार्यकर्त्यांच्या अखंड मेहनतीमुळे भाजप सरकार सत्तेत आले आहे. आपल्या सरकारकडून जनतेच्या खूप अपेक्षा आहे. ते लक्षात घेऊन कार्यकर्त्यांनो, काम करा. कार्यकर्त्यांचा योग्य सन्मान राखला जाईल. त्या दृष्टीने पक्षाची कार्यवाही सुरू असून महिन्याभरात विविध समित्या, महामंडळांवरील नियुक्त्यांची पूर्तता होईल, असे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे दिले.रावसाहेब दानवे यांनी प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारलीभारतीय जनता पक्षाचे सरकार केंद्र व राज्यात आहे. या सरकारने अनेक जनताभिमुख निर्णय घेतले असून, आपल्या पदाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांशी संवाद साधून हे निर्णय तळागाळात पोहोचविणार, अशी ग्वाही प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी येथे केले.गडकरी म्हणाले...एक वर्षात एक लाख कोटींचे महामार्ग बांधणार रस्ते बांधकामाचा वेग दिवसाला १४ किलोमीटर अटल पेन्शन योजना, सुरक्षा विमा, जीवन ज्योती विमा योजना प्रभावी राबवा. वर्षात केवळ रस्ते विकासातून दोन टक्के जीडीपी वाढणार रोजगार व व्यवसायाभिमुख शिक्षणावर राज्याने भर द्यावा.शेतकऱ्यांनी उसाचे क्षेत्र कमी करून तेलबियांचे उत्पादन घ्यावे.ज्ञान-विज्ञान, तंत्रविज्ञानातून विकासावर भर.