शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
3
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
4
त्याच पाकिस्तानने सणसणीत वाजवली! इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला दिला पाठिंबा, अमेरिका...
5
NSDL IPO Allotment Status: NSDL आयपीओला तुफान प्रतिसाद; लेटेस्ट GMP सह जाणून घ्या कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
6
२० मिनिटांत ८.८ लाख रुपये लंपास, 'या' ४ चुकांमुळे बँक खाते रिकामे! तुम्ही तर करत नाहीयेत ना?
7
विराट कोहलीसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर तमन्नानं अखेर सत्य सांगितलं, म्हणाली...
8
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; किडनीच्या आजाराने होते त्रस्त
9
"इंडस्ट्रीत माझी एकच चांगली मैत्रीण आहे...", शशांक केतकरने घेतलं 'या' अभिनेत्रीचं नाव
10
संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, सीआरपीएफच्या जवानानं पत्नीचं मुंडकं छाटलं! वृत्त वाहिनीच्या ऑफिसमध्ये गेला अन्...
11
हातखंबा येथे पुन्हा अपघात, गॅसवाहू टँकर वडापावच्या टपरीवर आदळला; ग्रामस्थांनी महामार्ग अडवला
12
भारताबाबत ट्रम्प यांनी मोठी चूक केली, दिग्गज अर्थतज्ज्ञानं साधला निशाणा; म्हणाले, "हे म्हणणं एकदम..."
13
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
14
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex १६६ आणि निफ्टी ३१ अंकांच्या तेजीसह खुला, 'हे' शेअर्स वधारले
15
समृद्धीने सुसाट निघाल तर पकडले जाल, तुमच्यावर लक्ष ठेवणार एक हजार ‘डोळे’
16
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
17
‘महादेवी’ हत्तीण प्रकरणात शासनाचा आदेश नाही, उद्या मुंबईत बैठक : मुख्यमंत्री
18
Video : ६०० वर्षांनंतर पहिल्यांदाच! भूकंपानंतर ज्वालामुखीचा उद्रेक; रशियाच्या कामचटकाचा धोका अजूनही टळेना
19
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
20
पुत्रदा एकादशी-बुध प्रदोष: ८ राशींना सर्वोत्तम काळ, शुभ-लाभ; हाती पैसा राहील, कल्याण होईल!

विकासाला विरोध ही काँग्रेसची विकृतता

By admin | Updated: May 24, 2015 22:50 IST

नितीन गडकरी यांची टीका : भाजपच्या राज्य कार्यकारिणी बैठकीची सांगता; ‘जाणता राजा’ंच्या काळात शेती विकास दर कमी कसा?

कोल्हापूर : देशातील सामान्य माणसाचा आर्थिक विकास होण्यासाठी केंद्र सरकारने विकासाचे मॉडेल तयार केले आहे; पण विकृत मानसिकतेतून कॉँग्रेस भूमी अधिग्रहण कायद्याला विरोध करीत असल्याची टीका केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी केली. स्वत:ला ‘जाणता राजा’ म्हणवणाऱ्यांच्या काळात महाराष्ट्राचा शेती विकास दर घसरला कसा, कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या सरकारने काय केले? अशी विचारणाही त्यांनी यावेळी केली. भाजपच्या तीनदिवसीय प्रदेश कार्यकारिणी व राज्य परिषदेच्या सांगता समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे होते. गडकरी म्हणाले, कॉँग्रेसच्या ६५ वर्षांच्या राजवटीत काय मिळाले? भूकबळी, भ्रष्टाचार बोकाळला. शेतकऱ्यांनी आत्महत्या सुरू केल्या. भांडी-धुण्याच्या पावडरीचा दर गहू व ज्वारीला मिळू लागला, हे कॉँग्रेस सरकारचे धोरण होते. या सर्वांना कंटाळून जनतेने मोठ्या विश्वासाने सत्ता दिली आहे. ही सत्ता सर्वसामान्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्र्य निर्माण करण्यासाठी आहे. काहीजणांना खासदार, आमदार, मंत्री करण्यासाठीच ही सत्ता आहे, असे वाटते; पण आपली सत्ता सामाजिक व आर्थिक परिस्थिती बदलण्यासाठी आहे. हे जरी आव्हान असले तरी भाजपने ते स्वीकारले आहे. राष्ट्रवाद, राष्ट्रभक्ती व राष्ट्राचा सर्वांगीण विकास ही पक्षाची वैशिष्ट्ये असून सुशासन, विकास व डिजिटल इंडिया हे आपले भविष्य असल्याचे त्यांनी सांगितले. शरद पवार कृषिमंत्री असताना गुजरातचा कृषी विकास दर १४ टक्के, तर मध्यप्रदेशचा २३ टक्के होता, त्यावेळी महाराष्ट्राचा दर ऋण (उणे) होता असे सांगून गडकरी म्हणाले, ‘जाणत्या राजा’चे सरकार होते तर विकासदर ऋण कसा? सिंचन प्रकल्पात भ्रष्टाचार करून धरणांची कामे बंद पडल्याने महाराष्ट्राची ही अवस्था झाली; पण फडणवीस सरकारने ‘जलशिवार योजना’ सुरू केली आहे, तिची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे आवाहनही त्यांनी केले.ग्रामीण भागात राहणाऱ्यांची संख्या कमी होत आहे. लोकांच्या हाताला रोजगार नसल्याने ते गावे सोडत आहेत. यासाठी रस्ते, रोजगार उपलब्ध झाले पाहिजेत; तरच ग्रामीण चेहरा बदलणार आहे. यासाठी भूमी अधिग्रहण कायद्यात थोडे बदल केले; पण विकृत मानसिकतेतून कॉँग्रेस विरोध करीत आहे. ज्यांना खाणवाटप केले ते काय अल्पभूधारक होते का, असा सवाल करीत गरिबी दूर करणे व विकासासाठी भूमी अधिग्रहण कायदा आणला असताना आता आडकाठी का आणता? अशी विचारणाही गडकरी यांनी केली.जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश हाळवणकर यांनी प्रास्ताविक केले. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी मनोगत व्यक्त केले. पी. सतीश, शाम जाजू, मंत्री विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे, विद्या ठाकूर, चंद्रकांतदादा पाटील, गिरीश बापट, केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर, भाऊसाहेब फुंडकर यांच्यासह राज्यमंत्री, खासदार, आमदार, प्रदेश पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी) महिन्याभरात महामंडळांवरील नियुक्त्या असंख्य कार्यकर्त्यांच्या अखंड मेहनतीमुळे भाजप सरकार सत्तेत आले आहे. आपल्या सरकारकडून जनतेच्या खूप अपेक्षा आहे. ते लक्षात घेऊन कार्यकर्त्यांनो, काम करा. कार्यकर्त्यांचा योग्य सन्मान राखला जाईल. त्या दृष्टीने पक्षाची कार्यवाही सुरू असून महिन्याभरात विविध समित्या, महामंडळांवरील नियुक्त्यांची पूर्तता होईल, असे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे दिले.रावसाहेब दानवे यांनी प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारलीभारतीय जनता पक्षाचे सरकार केंद्र व राज्यात आहे. या सरकारने अनेक जनताभिमुख निर्णय घेतले असून, आपल्या पदाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांशी संवाद साधून हे निर्णय तळागाळात पोहोचविणार, अशी ग्वाही प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी येथे केले.गडकरी म्हणाले...एक वर्षात एक लाख कोटींचे महामार्ग बांधणार रस्ते बांधकामाचा वेग दिवसाला १४ किलोमीटर अटल पेन्शन योजना, सुरक्षा विमा, जीवन ज्योती विमा योजना प्रभावी राबवा. वर्षात केवळ रस्ते विकासातून दोन टक्के जीडीपी वाढणार रोजगार व व्यवसायाभिमुख शिक्षणावर राज्याने भर द्यावा.शेतकऱ्यांनी उसाचे क्षेत्र कमी करून तेलबियांचे उत्पादन घ्यावे.ज्ञान-विज्ञान, तंत्रविज्ञानातून विकासावर भर.