शहरं
Join us  
Trending Stories
1
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
2
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
3
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
4
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
5
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
6
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
7
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
8
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
9
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
10
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
11
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
12
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
13
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
14
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
15
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
16
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
17
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
18
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
19
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
20
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?

सरसकट कर्जमाफीची काँग्रेसची मागणी

By admin | Updated: June 25, 2017 02:21 IST

दीड लाख रुपये मर्यादेपर्यंतचे कर्ज माफ करण्याऐवजी सर्वच शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय सरकारने घ्यावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

विशेष प्रतिनिधी लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : दीड लाख रुपये मर्यादेपर्यंतचे कर्ज माफ करण्याऐवजी सर्वच शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय सरकारने घ्यावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मात्र दीड लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीसह पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या सूचनांचा अंतर्भाव कर्जमाफीमध्ये सरकारने केल्याचे सांगत समाधान व्यक्त केले आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मात्र, सरकारने मन मोठे करून सरसकट कर्जमाफी दिली असती तर आणखी समाधान झाले असते, असे सांगितले. सरकारच्या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी होते की नाही, यावर पक्षाचे लक्ष असेल, असेही तटकरे म्हणाले. दीड लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीचा निर्णय हा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आग्रही भूमिकेमुळे झाला, असे परिवहनमंत्री आणि शिवसेनेचे नेते दिवाकर रावते यांनी पत्रकारांना सांगितले. तथापि, तटकरे यांनी काढलेल्या प्रसिद्धिपत्रकात हा निर्णय म्हणजे शुक्रवारी शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात दिल्लीमध्ये झालेल्या चर्चेचे फलित असल्याचा दावा केला. शनिवारच्या घोषणेतून काही गोष्टी जर सुटल्या असतील तर सरकारसमोर पुन्हा एकदा भूमिका मांडण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे केला जाईल, असे ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानसभा, विधान परिषद, लोकसभा आणि राज्यसभा सदस्य आपले एक महिन्याचे वेतन शेतकऱ्यांसाठी देणार असल्याचे मी जाहीर करतो, असे पत्रकात म्हटले आहे.संघर्ष यात्रा अन्  संपाचे यशकाँग्रेसच्या तीनही बड्या नेत्यांनी मात्र, आधी सरसकट कर्जमाफी करण्याच्या सरकारच्या घोषणेचे काय झाले, असा सवाल केला आहे. कर्जमाफीची घोषणा हे काँग्रेस-राष्ट्रवादीसह अन्य विरोधी पक्षांनी काढलेल्या संघर्ष यात्रेचे आणि त्यानंतर झालेल्या शेतकरी संपाचे फलित असल्याचे अशोक चव्हाण म्हणाले. दीड लाखाची मर्यादा न ठेवता सरसकट माफी द्या, असे त्यांनी तसेच पृथ्वीराज चव्हाण, विखे पाटील यांनी म्हटले आहे. कर्जमाफीच्या अंमलबजावणीवर आमची नजर असेल, असे ते म्हणाले. ऐतिहासिक निर्णय - खा. दानवेभाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे म्हणाले की, हा ऐतिहासिक निर्णय आहे. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सरकारचे अभिनंदन करतो. सर्व प्रकारच्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची योग्य भूमिका सरकारने घेतली आहे. राज्य सरकारवर आर्थिक बोजा आला तरी सरकार शेतीमधील भांडवली गुंतवणूक करतच राहील हे मुख्यमंत्र्यांचे आश्वासनही महत्त्वाचे आहे.पाने पुसली - रघुनाथदादाकर्जमाफीच्या निर्णयाने आम्ही समाधानी नाही. शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, असे आश्वासन या सरकारने दिले होते. सर्वच कर्जाची जबाबदारी सरकारने घेतली पाहिजे. ही कर्जमाफी म्हणजे गाजर दाखविण्याचा प्रकार आहे, अशी प्रतिक्रिया शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांनी दिली.