शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ३ तासांसाठी मुंबईला 'रेड अलर्ट'; विजांच्या कडकडाट अन् जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा
2
Pooja Khedkar Mother: नवी मुंबईतून ट्रक चालकाचं अपहरण, पुण्यातील घरात ठेवले डांबून; पूजा खेडकरच्या आईचा प्रताप
3
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
4
Stock Markets Today: आठवड्याची सुस्त सुरुवात, ६० अंकांनी वधारला सेन्सेक्स; रियल्टी, मेटल शेअर्समध्ये खरेदी
5
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात केलेली ती चूक भोवणार? टीम इंडियावर कारवाई होणार?
6
PPF Investment: पती पत्नीसाठी डबल नफ्याची ट्रिक! टॅक्सही शून्य, व्याजही जास्त; कसा घ्याल फायदा?
7
युद्ध स्फोटक वळणावर, रशियन ड्रोन्स रोमानियात; युक्रेनचा रशियातील सर्वात मोठ्या तेल प्रकल्पावर भीषण हल्ला
8
राहुल गांधींवर आरोप करण्याऐवजी त्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करा
9
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
10
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
11
ट्रम्प अन् निर्बंधांमुळे रशियन तेल मिळवण्यात भारताला अडचणी; जहाज कंपन्यांनी दिला नकार
12
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
13
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
14
‘एआय सायकोसिस’ ही स्थिती नेमकी काय आहे? Ai विचारांवर किंवा भावनांवर नियंत्रण ठेवत
15
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
16
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
17
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
18
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
19
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
20
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला

सरसकट कर्जमाफीची काँग्रेसची मागणी

By admin | Updated: June 25, 2017 02:21 IST

दीड लाख रुपये मर्यादेपर्यंतचे कर्ज माफ करण्याऐवजी सर्वच शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय सरकारने घ्यावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

विशेष प्रतिनिधी लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : दीड लाख रुपये मर्यादेपर्यंतचे कर्ज माफ करण्याऐवजी सर्वच शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय सरकारने घ्यावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मात्र दीड लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीसह पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या सूचनांचा अंतर्भाव कर्जमाफीमध्ये सरकारने केल्याचे सांगत समाधान व्यक्त केले आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मात्र, सरकारने मन मोठे करून सरसकट कर्जमाफी दिली असती तर आणखी समाधान झाले असते, असे सांगितले. सरकारच्या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी होते की नाही, यावर पक्षाचे लक्ष असेल, असेही तटकरे म्हणाले. दीड लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीचा निर्णय हा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आग्रही भूमिकेमुळे झाला, असे परिवहनमंत्री आणि शिवसेनेचे नेते दिवाकर रावते यांनी पत्रकारांना सांगितले. तथापि, तटकरे यांनी काढलेल्या प्रसिद्धिपत्रकात हा निर्णय म्हणजे शुक्रवारी शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात दिल्लीमध्ये झालेल्या चर्चेचे फलित असल्याचा दावा केला. शनिवारच्या घोषणेतून काही गोष्टी जर सुटल्या असतील तर सरकारसमोर पुन्हा एकदा भूमिका मांडण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे केला जाईल, असे ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानसभा, विधान परिषद, लोकसभा आणि राज्यसभा सदस्य आपले एक महिन्याचे वेतन शेतकऱ्यांसाठी देणार असल्याचे मी जाहीर करतो, असे पत्रकात म्हटले आहे.संघर्ष यात्रा अन्  संपाचे यशकाँग्रेसच्या तीनही बड्या नेत्यांनी मात्र, आधी सरसकट कर्जमाफी करण्याच्या सरकारच्या घोषणेचे काय झाले, असा सवाल केला आहे. कर्जमाफीची घोषणा हे काँग्रेस-राष्ट्रवादीसह अन्य विरोधी पक्षांनी काढलेल्या संघर्ष यात्रेचे आणि त्यानंतर झालेल्या शेतकरी संपाचे फलित असल्याचे अशोक चव्हाण म्हणाले. दीड लाखाची मर्यादा न ठेवता सरसकट माफी द्या, असे त्यांनी तसेच पृथ्वीराज चव्हाण, विखे पाटील यांनी म्हटले आहे. कर्जमाफीच्या अंमलबजावणीवर आमची नजर असेल, असे ते म्हणाले. ऐतिहासिक निर्णय - खा. दानवेभाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे म्हणाले की, हा ऐतिहासिक निर्णय आहे. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सरकारचे अभिनंदन करतो. सर्व प्रकारच्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची योग्य भूमिका सरकारने घेतली आहे. राज्य सरकारवर आर्थिक बोजा आला तरी सरकार शेतीमधील भांडवली गुंतवणूक करतच राहील हे मुख्यमंत्र्यांचे आश्वासनही महत्त्वाचे आहे.पाने पुसली - रघुनाथदादाकर्जमाफीच्या निर्णयाने आम्ही समाधानी नाही. शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, असे आश्वासन या सरकारने दिले होते. सर्वच कर्जाची जबाबदारी सरकारने घेतली पाहिजे. ही कर्जमाफी म्हणजे गाजर दाखविण्याचा प्रकार आहे, अशी प्रतिक्रिया शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांनी दिली.