शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
2
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
3
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
4
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
5
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
6
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
7
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
8
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
9
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
10
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
11
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
12
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
13
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
14
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
15
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
16
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
17
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
18
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?
19
'चांगल्यापैकी पोटगी मिळतेय'; मासिक १० लाख मिळवण्यासाठी हसीन जहाँ सुप्रीम कोर्टात, मोहम्मद शमीला नोटीस
20
'तुमच्या मुलाचा दोष नाही', एअर इंडिया विमान अपघातातील पायलटच्या वडिलांची सर्वोच्च न्यायालयात धाव

काँग्रेसचे प्रमुख नेतेही दौऱ्यावर

By admin | Updated: April 23, 2016 04:00 IST

काँग्रेसचे राज्यातील प्रमुख नेते ५ ते ७ मे या काळात मराठवाड्याचा दौरा करणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी दिली.

मुंबई : काँग्रेसचे राज्यातील प्रमुख नेते ५ ते ७ मे या काळात मराठवाड्याचा दौरा करणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी दिली.यासंदर्भात गांधी भवन येथे पत्रकारांना माहिती देताना खा. चव्हाण म्हणाले की, काँग्रेसचे नेते सातत्याने दुष्काळी भागात फिरून लोकांच्या अपेक्षा सरकारच्या निदर्शनास आणून देत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आपल्यासह विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणे, हर्षवर्धन पाटील, पतंगराव कदम, बाळासाहेब थोरात, शिवाजीराव मोघे, माणिकराव ठाकरे, नितीन राऊत, सतेज पाटील आदी नेते राज्यातील दुष्काळी जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत.प्रत्येक जिल्ह्यात जाऊन दुष्काळग्रस्त जनता, काँग्रेस कार्यकर्ते आणि अधिकाऱ्यांच्या ते भेटी घेतील. तसेच दुष्काळी उपाययोजनांचा आढावा घेतील. गेल्या महिन्यात राज्य मंत्रिमंडळाची बैठक लातूरमध्ये झाली होती व त्यामध्ये अनेक निर्णयांची घोषणा झाली होती. त्या निर्णयांची अंमलबजावणी झाली की नाही, याची या दौऱ्यात समीक्षा केली जाईल, असेही ते म्हणाले.दुष्काळ निवारणातील सरकारच्या अपयशावर त्यांनी टीका केली. या सरकारच्या कार्यकाळात २०१५मध्ये सर्वाधिक ३२२४ शेतकरी आत्महत्या झाल्या. या गंभीर परिस्थितीची दखल न्यायालयानेसुद्धा घेतली. परंतु, सरकार त्याबाबत गंभीर दिसत नाही. नियोजनानुसार पाणीपुरवठा न करताच टँकरमाफिया पैसा लाटत आहेत. सरकार पाठीशी उभे राहत नसल्याने अधिकारी ठोस निर्णय घेण्यास तयार नाहीत.रोजगार हमीची पुरेशी कामे उपलब्ध नाहीत. लोकांचे स्थलांतर वाढले आहे. या परिस्थितीत काही मंत्री हेलिकॉप्टरने फिरत आहेततर काही मंत्री सेल्फी काढण्यातगुंग आहेत. त्याऐवजी मंत्र्यांनी लोकांशी संवाद वाढवला तर त्यांना चार-दोन चांगली कामे करता येतील, असा टोला खा. चव्हाण यांनी लगावला.पुणे येथील स्वस्त घरकूल प्रकरणी त्यांनी भाजपा सरकारवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, या प्रकरणातील संशयित आरोपीची पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्यासोबतची छायाचित्रे समोर आली आहेत. मंत्र्यांच्या समक्षच हा आरोपी पळून जातो. तरीही त्याच्याशी आपला संबंध नसल्याचा दावा मंत्री करतात, हे हास्यास्पद आहे. संघाशी जवळीक असलेला वर्धा जिल्ह्यातील कापूस व्यापारी सुनील टालाटुले याने अद्याप शेतकऱ्यांचे ८ कोटी रुपये दिलेले नसून त्याच्या संपत्तीचा लिलाव करून चुकारे करण्याची सरकारची घोषणा हवेतच आहे, असा आरोप त्यांनी केला. (विशेष प्रतिनिधी)