शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस करणार सरकारवर हल्लाबोल

By admin | Updated: August 29, 2015 01:37 IST

महाराष्ट्र दुष्काळात भरडला जात असताना सत्ताधाऱ्यांची भूमिका बेजबाबदार आहे. ललित मोदी तसेच मध्य प्रदेशातील व्यापमं घोटाळ्यात अडकलेल्या नेत्यांना सरकारकडून पाठीशी

अहमदनगर : महाराष्ट्र दुष्काळात भरडला जात असताना सत्ताधाऱ्यांची भूमिका बेजबाबदार आहे. ललित मोदी तसेच मध्य प्रदेशातील व्यापमं घोटाळ्यात अडकलेल्या नेत्यांना सरकारकडून पाठीशी घातले जात आहे. सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या धोरणांवर काँग्रेस हल्लाबोल करणार असून, प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन करून जनतेच्या वस्तुस्थिती लक्षात आणून दिली जाईल, अशी माहिती विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शुक्रवारी येथे दिली.केंद्र व राज्य सरकारवर टीका करताना काँग्रेसच्या आंदोलनाची दिशा त्यांनी स्पष्ट केली. ते म्हणाले, की ललित मोदी प्रकरणात केंद्रीय विदेश मंत्री सुषमा स्वराज, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे; तर मध्य प्रदेशातील व्यापमं घोटाळ्यात तेथील मुख्यमंत्री शिवराजसिंह चव्हाण यांचा सहभाग स्पष्ट झाला आहे. काँग्रेसने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. यावरूनच संसदेचे कामकाज बंद पडले होते. मात्र आता उलट काँग्रेसलाच बदनाम करण्याचे काम सुरू आहे. पंतप्रधान मोदींनी यावर सोयीस्कर मौन धारण केले आहे. हा एकप्रकारे संसदीय परंपरेचा अवमान आहे. जीएसटी व भूमिसंपादन प्रकरणी जनतेची दिशाभूल केली जात आहे. या कायद्यातील त्रुटी दूर केल्यास विधेयक मंजुरीसाठी काँग्रेस तयार होती. मात्र यासाठी सत्ताधारी तयार नाहीत. त्यामुळे आम्ही ही वस्तुस्थिती जनतेसमोर मांडणार आहोत.दुष्काळाचा प्रश्नही राज्य सरकार चुकीच्या पद्धतीने हाताळत आहे. सरकारला त्याचे गांभीर्य नाही. जनावरांसाठी चारा-पाणी नाही, पिण्याचे पाणी नाही. परंतु महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी पशुग्रामची केवळ घोषणाच केली. वाटल्यास त्यांनी योजनेस ‘खडसेग्राम’ नाव द्यावे, पण जनावरे वाचविण्यासाठी तत्काळ पावले उचलावीत, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)दुष्काळी परिस्थितीचे राजकारण कोणीही करणार नाही. मात्र सरकारला प्रश्नाचे गांभीर्यच नाही. सर्व पक्षांनी एकत्र येऊन दुष्काळाशी लढा देण्याची गरज आहे. सत्ताधाऱ्यांविरोधात विरोधी पक्ष मात्र एकवटले आहेत, अशा शब्दांमध्ये विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मत व्यक्त केले आहे.