शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच संपवत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
5
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
6
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
7
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
8
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
9
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
10
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
11
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
12
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
13
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
14
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
15
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
16
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
17
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
18
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
19
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
20
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

काँग्रेस करणार सरकारवर हल्लाबोल

By admin | Updated: August 29, 2015 01:37 IST

महाराष्ट्र दुष्काळात भरडला जात असताना सत्ताधाऱ्यांची भूमिका बेजबाबदार आहे. ललित मोदी तसेच मध्य प्रदेशातील व्यापमं घोटाळ्यात अडकलेल्या नेत्यांना सरकारकडून पाठीशी

अहमदनगर : महाराष्ट्र दुष्काळात भरडला जात असताना सत्ताधाऱ्यांची भूमिका बेजबाबदार आहे. ललित मोदी तसेच मध्य प्रदेशातील व्यापमं घोटाळ्यात अडकलेल्या नेत्यांना सरकारकडून पाठीशी घातले जात आहे. सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या धोरणांवर काँग्रेस हल्लाबोल करणार असून, प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन करून जनतेच्या वस्तुस्थिती लक्षात आणून दिली जाईल, अशी माहिती विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शुक्रवारी येथे दिली.केंद्र व राज्य सरकारवर टीका करताना काँग्रेसच्या आंदोलनाची दिशा त्यांनी स्पष्ट केली. ते म्हणाले, की ललित मोदी प्रकरणात केंद्रीय विदेश मंत्री सुषमा स्वराज, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे; तर मध्य प्रदेशातील व्यापमं घोटाळ्यात तेथील मुख्यमंत्री शिवराजसिंह चव्हाण यांचा सहभाग स्पष्ट झाला आहे. काँग्रेसने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. यावरूनच संसदेचे कामकाज बंद पडले होते. मात्र आता उलट काँग्रेसलाच बदनाम करण्याचे काम सुरू आहे. पंतप्रधान मोदींनी यावर सोयीस्कर मौन धारण केले आहे. हा एकप्रकारे संसदीय परंपरेचा अवमान आहे. जीएसटी व भूमिसंपादन प्रकरणी जनतेची दिशाभूल केली जात आहे. या कायद्यातील त्रुटी दूर केल्यास विधेयक मंजुरीसाठी काँग्रेस तयार होती. मात्र यासाठी सत्ताधारी तयार नाहीत. त्यामुळे आम्ही ही वस्तुस्थिती जनतेसमोर मांडणार आहोत.दुष्काळाचा प्रश्नही राज्य सरकार चुकीच्या पद्धतीने हाताळत आहे. सरकारला त्याचे गांभीर्य नाही. जनावरांसाठी चारा-पाणी नाही, पिण्याचे पाणी नाही. परंतु महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी पशुग्रामची केवळ घोषणाच केली. वाटल्यास त्यांनी योजनेस ‘खडसेग्राम’ नाव द्यावे, पण जनावरे वाचविण्यासाठी तत्काळ पावले उचलावीत, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)दुष्काळी परिस्थितीचे राजकारण कोणीही करणार नाही. मात्र सरकारला प्रश्नाचे गांभीर्यच नाही. सर्व पक्षांनी एकत्र येऊन दुष्काळाशी लढा देण्याची गरज आहे. सत्ताधाऱ्यांविरोधात विरोधी पक्ष मात्र एकवटले आहेत, अशा शब्दांमध्ये विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मत व्यक्त केले आहे.