शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
2
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
3
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
4
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
5
व्हायरल होण्याचं भूत, मिठी मारुन कपलची कालव्यात उडी; Video पाहून वाढेल हृदयाची धडधड
6
"भावांनो, असं आयुष्य कोण जगेल..."; कौटुंबिक वादातून पतीनं संपवलं जीवन, मृत्यूपूर्वी दीड मिनिटांचा Video
7
खऱ्याखुऱ्या विराट कोहलीने पान टपरीवाल्याला केला कॉल, नंतर पोलीस त्याच्या घरी पोहचले अन्...
8
ट्रम्प यांच्या ५०% टॅरिफनं मुकेश अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर घसरला? ₹१७ वर आला भाव!
9
Janmashtami 2025: बाळाला कृष्णाचे नाव ठेवायचंय? ही घ्या १०८ नावांची यादी; अगदी मुलींचीह!
10
HDFC-ICICI बँकेच्या शेअर्समुळे बाजार गडगडला! पण, 'या' क्षेत्राने दिली साथ; कशात झाली वाढ?
11
माझा काही संबंध नाही, काँग्रेसने परवानगीशिवाय 'तो' व्हिडिओ वापरला; केके मेननचे स्पष्टीकरण
12
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
13
शाओमी YU7 च्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड, अवघ्या दोन मिनिटांत ३ लाख बुकींग!
14
१९ वर्षे असते शनि महादशा, ‘या’ राशींना मिळतो अपार पैसा, भाग्योदय; भरभराट, भरघोस लाभच लाभ!
15
धक्कादायक! लोकोपायलटच्या जाग्यावर तिसराच व्यक्ती बसला, मोठा गोंधळ उडाला, अनेकांचा जीव धोक्यात; व्हिडीओ व्हायरल
16
"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; घोषणा करणाऱ्या खासदाराचं पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक!
17
प्रेमविवाहानंतर अवघ्या १० दिवसांत पत्नीचा काटा काढला; पोलीस शिपाई का बनला गुन्हेगार?
18
पैशांचा पाऊस! अदानींच्या संपत्तीत एका दिवसात ५० हजार कोटींची वाढ, टॉप-२० श्रीमंतांच्या यादीत पुन्हा स्थान!
19
Video: एकाच महिलेचं ६ वेळा मतदार यादीत नाव, EPIC क्रमांक वेगळे...; महाराष्ट्रातील प्रकार व्हायरल
20
एका झटक्यात ₹४००० नं घसरला शेअरचा भाव; शेअर विकण्यासाठी गुंतवणुकदारांच्या रांगा, पाहा कोणता आहे स्टॉक?

काँग्रेस करणार सरकारवर हल्लाबोल

By admin | Updated: August 29, 2015 01:37 IST

महाराष्ट्र दुष्काळात भरडला जात असताना सत्ताधाऱ्यांची भूमिका बेजबाबदार आहे. ललित मोदी तसेच मध्य प्रदेशातील व्यापमं घोटाळ्यात अडकलेल्या नेत्यांना सरकारकडून पाठीशी

अहमदनगर : महाराष्ट्र दुष्काळात भरडला जात असताना सत्ताधाऱ्यांची भूमिका बेजबाबदार आहे. ललित मोदी तसेच मध्य प्रदेशातील व्यापमं घोटाळ्यात अडकलेल्या नेत्यांना सरकारकडून पाठीशी घातले जात आहे. सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या धोरणांवर काँग्रेस हल्लाबोल करणार असून, प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन करून जनतेच्या वस्तुस्थिती लक्षात आणून दिली जाईल, अशी माहिती विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शुक्रवारी येथे दिली.केंद्र व राज्य सरकारवर टीका करताना काँग्रेसच्या आंदोलनाची दिशा त्यांनी स्पष्ट केली. ते म्हणाले, की ललित मोदी प्रकरणात केंद्रीय विदेश मंत्री सुषमा स्वराज, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे; तर मध्य प्रदेशातील व्यापमं घोटाळ्यात तेथील मुख्यमंत्री शिवराजसिंह चव्हाण यांचा सहभाग स्पष्ट झाला आहे. काँग्रेसने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. यावरूनच संसदेचे कामकाज बंद पडले होते. मात्र आता उलट काँग्रेसलाच बदनाम करण्याचे काम सुरू आहे. पंतप्रधान मोदींनी यावर सोयीस्कर मौन धारण केले आहे. हा एकप्रकारे संसदीय परंपरेचा अवमान आहे. जीएसटी व भूमिसंपादन प्रकरणी जनतेची दिशाभूल केली जात आहे. या कायद्यातील त्रुटी दूर केल्यास विधेयक मंजुरीसाठी काँग्रेस तयार होती. मात्र यासाठी सत्ताधारी तयार नाहीत. त्यामुळे आम्ही ही वस्तुस्थिती जनतेसमोर मांडणार आहोत.दुष्काळाचा प्रश्नही राज्य सरकार चुकीच्या पद्धतीने हाताळत आहे. सरकारला त्याचे गांभीर्य नाही. जनावरांसाठी चारा-पाणी नाही, पिण्याचे पाणी नाही. परंतु महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी पशुग्रामची केवळ घोषणाच केली. वाटल्यास त्यांनी योजनेस ‘खडसेग्राम’ नाव द्यावे, पण जनावरे वाचविण्यासाठी तत्काळ पावले उचलावीत, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)दुष्काळी परिस्थितीचे राजकारण कोणीही करणार नाही. मात्र सरकारला प्रश्नाचे गांभीर्यच नाही. सर्व पक्षांनी एकत्र येऊन दुष्काळाशी लढा देण्याची गरज आहे. सत्ताधाऱ्यांविरोधात विरोधी पक्ष मात्र एकवटले आहेत, अशा शब्दांमध्ये विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मत व्यक्त केले आहे.