शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

दुष्काळावरून काँग्रेसचा हल्लाबोल!

By admin | Updated: December 1, 2014 02:06 IST

राज्यातील शेतकरी दुष्काळामुळे अडचणीत सापडला असताना सरकारला मात्र दुष्काळ दिसत नाही.

औरंगाबाद : राज्यातील शेतकरी दुष्काळामुळे अडचणीत सापडला असताना सरकारला मात्र दुष्काळ दिसत नाही. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी नागपुरात ८ डिसेंबरला हिवाळी अधिवेशनावर पहिल्याच दिवशी लाखो शेतकऱ्यांचा मोर्चा काढणार आहे, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी येथे दुष्काळ परिषदेत दिली.राज्यभरात १ व २ डिसेंबरला तालुका पातळीवर काँगे्रसचे कार्यकर्ते निदर्शने करतील, तर ४ डिसेंबरला जिल्हा पातळीवर रास्ता रोको केला जाईल. यंदा मान्सूनमध्ये अपुरा पाऊस तर नोव्हेंबरमध्ये अवकाळी पाऊस तसेच वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीनचे पीकच आले नाही. कापसाचेही उत्पादन अत्यल्प आहे. त्यालाही योग्य भाव मिळत नाही. विदर्भ आणि मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळात होरपळतो आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र पाण्याचा दुष्काळ जाणवत नसल्याचे औरंगाबादमध्ये म्हणाले. शिवाय सरकार म्हणे उपग्रहाच्या माध्यमातून माहिती घेत आहे. मग प्रशासन कशासाठी आहे, असा प्रश्न ठाकरे यांनी केला. काँग्रेस सरकारने तीन वर्षांमध्ये शेतकऱ्यांना दहा हजार कोटी रुपयांच्या मदतीचे पॅकेज दिले होते. शेतकरी होरपळून निघालेला असताना केंद्र सरकारचे पाहणी पथक सुद्धा अद्याप आलेले नाही, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)