शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

काँग्रेससोबत आघाडी हवी पण सन्मानजनक !

By admin | Updated: January 24, 2017 15:40 IST

आम्हाला आघाडी हवीच आहे पण सन्माजनक अशी भूमिका राष्टÑवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी मांडली.

अकोला : केंद्रात व राज्यात सत्तेत आलेल्या भारतीय जनता पक्षाचा कारभार हा आराजकतेकडे जाणारा आहे, या पक्षाच्या जातीयवादी विचारधारे विरोधात धर्मनिरपेक्ष विचारांनी एकत्र आले पहिजे; ही राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आहे त्यामुळे आगामी महानगरपालिका तसेच जिल्हा परिषदांच्या निवडणूकांमध्ये काँग्रेस सोबत आघाडी करण्यास आम्ही तयार आहोत. याचा अर्थ काँग्रेस व समविचारी पक्षांनी राष्ट्रवादी कमकुवत आहे असा काढू नये, आम्हाला आघाडी हवीच आहे पण सन्माजनक अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी मांडली. अकोला येथील खुले नाट्यगृहामध्ये माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश सोहळया निमित्त आयोजीत मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी मंचावर आमदार प्रकाश गजभिये, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते वसंतराव धोत्रे, माजी आमदार तुकाराम बिरकड, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय देशमुख, अकोला महानगर अध्यक्ष अजय तापडीया, वाशीम जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, विदर्भ संघटक रामेश्वर पवळ, संतोष कोरपे आदी उपस्थित होते. तटकरे म्हणाले की, भाजपा-सेनेच्या सत्तेने सामान्यांचा भ्रमनिरास केला आहे. अच्छे दिन, बॅक खात्यामध्ये १५ लाख असे स्वप्न सर्वसामान्य जनतेला दाखविले, हे स्वप्न प्रत्यक्षात येऊ शकत नाही हे याच पक्षाचे ज्येष्ठ मंत्री आता खुले आम सांगत आहे. तर दूसरीकडे शेतकरी उध्वस्त करण्याचे धोरण या सरकारचे आहे. काँग्रेसमुक्त भारत अशी घोषणा करणारे आता मुसलमान मुक्त भारत अशी वल्गना करून लागले आहेत. यावरून त्यांच्यामधील जातीयवादी विचार स्पष्टपणे समोर येतो. हा देश लोकशाही विचारांचा देश असल्याने अशा धर्मांध शक्तींना जागा दाखविण्यासाठी धर्मनिरपेक्ष विचारांच्या पक्षाची मोट बांधणे आवश्यक आहे त्यामुळेच आघाडीसाठी आम्ही सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगीतले. माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांनी शिवसेना सोडण्यामागील कारणे विषद करतांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टिका केली. उद्धवांच्या आजूबाजुला हुजऱ्यांची फौज आहे, त्यांना शेतीमधील काही कळत नाही; शेतकरी हिताचा एखादा प्रस्ताव त्यांच्याकडे घेऊन गेलो तर ते आपला पक्ष व्यापाऱ्यांच्या भरवशावर चालतो अशी भूमिका मांडतात या शब्दात गावंडे यांनी आरोप केले. यावेळी जिल्हाध्यक्ष देशमुख यांचीही भाषण झाले. महानगर अध्यक्ष तापडीया यांनी प्रस्तावना केली. या मेळाव्याला जिल्हाभरातून मोठी उपस्थिती होती. गावंडे यांच्या अनेक समर्थकांनी शिवसेना सोडून राष्ट्रवादीत प्रवेश घेतला.