शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
3
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
4
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
5
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
6
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
7
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
8
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
9
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
10
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
11
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
12
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
13
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
14
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
15
Health Tips: 'ही' जपानी टेक्निक ठेवेल तुम्हाला मधुमेह, रक्तदाब, हृदयविकारापासून दूर!
16
जळगाव: 13 वर्षाच्या तेजसचा कुणी चिरला गळा, का केला खून? 'त्या' दोघांनी काय सांगितले?
17
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
18
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
19
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
20
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?

जिल्ह्यात कॉँग्रेसला हवाय ‘चार्जर’

By admin | Updated: July 12, 2017 01:19 IST

राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या स्थापनेनंतर सैरभैर झालेल्या कॉँग्रेसला गावोगावी असलेल्या कॉँग्रेस कार्यकर्त्यांच्या ताकदीने टिकवून ठेवले.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या स्थापनेनंतर सैरभैर झालेल्या कॉँग्रेसला गावोगावी असलेल्या कॉँग्रेस कार्यकर्त्यांच्या ताकदीने टिकवून ठेवले. अनेक तालुक्यांत कॉँग्रेसने समर्थ पर्यायही उभे करण्याचा प्रयत्न केला. पण हर्षवर्धन पाटील, अनंतराव थोपटे यांच्यासारखे दिग्गज माजी मंत्री असतानाही जिल्हा पातळीवर कॉँग्रेसला बांधून ठेवणारे नेतृत्व मिळाले नाही. जिंकण्याच्या उमेदीने ‘चार्ज’ करणारा नेताच मिळाला नसल्याने पुणे जिल्ह्यात कॉँग्रेसला घरघर लागली आहे.१९९९ मध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेसची स्थापना झाली. या वेळी तत्कालिन कॉँग्रेसमधील सगळी दिग्गज मंडळी राष्ट्रवादीत दाखल झाली. खुद्द शरद पवारांचा जिल्हा असूनही त्यानंतरच्या निवडणुकांत कॉँग्रेसने राष्ट्रवादीला चांगली टक्कर दिली. मात्र, नंतरच्या काळात नेत्यांनी स्वत:च्या पायापुरते पाहत संपूर्ण जिल्ह्याचा विचार केला नाही. इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील, भोरमध्ये अनंतराव थोपटे आणि पुरंदरमध्ये चंदुकाका जगताप यांनी आपापली ‘पॉकटेस’ सांभाळण्याकडेच लक्ष दिले. त्यामुळे इतर तालुक्यातील कॉँग्रेसला वालीच राहिला नाही.जिल्हा पातळीवरीलच नव्हे तर राज्य पातळीवरील नेतृत्वानेही पुणे जिल्ह्याकडे दुर्लक्षच केले. त्यामुळे आघाडी सरकारच्या तब्बल १५ वर्षांच्या काळात जिल्ह्यात कॉँग्रेस वाढलीच नाही. नाही म्हणायला विलासराव देशमुख, नारायण राणे यांनी काहीसे प्रयत्न केले. दौंडमध्ये रमेश थोरात यांच्यासारख्या नेत्यासाठी विलासराव देशमुख यांची सभा झाली होती. या वेळी कॉँग्रेस कार्यकर्त्यांवर होणाऱ्या अन्यायावर त्यांनी ‘दौंड पोलीस ठाण्याचा लिलाव झाला आहे का?’ असा सवाल त्यांनी केला होता. नारायण राणे यांनीही मध्यंतरीच्या काळात अनेक ठिकाणी सभा घेतल्या. हर्षवर्धन पाटील अधून-मधून अचानक जिल्हा कॉाग्रेसमध्ये सक्रीय होत होते. परंतु, पुणे जिल्हा राष्ट्रवादीसाठी प्रतिष्ठेचा असल्याने राज्य पातळीवरील समीकरणात कॉग्रेस नेत्यांकडूनच पुणे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचे बळी दिले गेले. त्यामुळे अनेक कार्यकर्त्यांना शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची संगत केल्याशिवाय पर्याय राहिला नाही. शिरूरमध्ये बाबूराव पाचर्णे यांच्या रुपाने पक्षाची चांगली ताकद असताना त्यांना शेवटी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करावा लागला. दुसऱ्या बाजुला स्थानिक पातळीवरच्या निवडणुकांत कॉँग्रेस चांगली कामगिरी करत असताना विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपात मात्र कार्यकर्त्यांना डावलण्यात आले. केवळ भोर आणि पुरंदर या दोन जागाच कॉँग्रेसच्या वाट्याला आली. साहजिकच इतर तालुक्यांत पक्षाच्या वाढीला मर्यादा आल्या. त्यामुळेच २०१४ च्या विधानसभा निवडणुकांत अचानक स्वबळावर लढण्याची वेळ आल्यावर अनेक ठिकाणी कॉँग्रेसला उमेदवारही मिळाले नाहीत.राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी वरिष्ठ नेतेच जवळीक साधत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये नेहमीच संभ्रमाचे वातावरण राहिले. त्यामुळे पवारविरोधाची ‘स्पेस’ शिवसेना- भाजपाने भरून काढली. बहुतांश तालुक्यात शिवसेना-भाजपामध्ये आज दिसणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये ‘पवारविरो’’ हे समान सूत्र आहे. पण,यातून कॉँग्रेसच्या हाताशी काहीच लागले नाही. उलट पक्षाचे कार्यकर्ते पक्ष सोडून गेले. काही जहागिऱ्या केवळ टिकून राहिल्या. त्यांनीही आपल्या सोईचे राजकारण करताना इतर तालुक्यांना वाऱ्यावर सोडले.युवक कॉँग्रेसच्या एका कार्यकर्त्याने आपली खंत व्यक्त करताना नेमके यावरच बोट ठेवले. त्याच्या म्हणण्यानुसार, भाजपाने व्यक्तिगत संबंध बाजूला ठेवून पक्षाला ताकद देण्याचा प्रयत्न केला; तसे काँग्रेसच्या नेत्यांनी केले नाही. पदाधिकाऱ्यांना आर्थिक ताकद तोकडी पडते.बारामतीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र निंबाळकर म्हणाले, कार्यकारिणीच्या निवडी आता होणार आहेत. वीरधवल गाडे युवक अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.>तालुक्याचे नेतृत्व देण्यात कमी : संजय जगतापकाँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप म्हणाले, ‘‘निवडणुकांत टिकून राहणे म्हणजेच पक्ष जिवंत राहणे असे नव्हे. बारामती व आंबेगाव या तालुक्यांत आम्ही कमी आहोत. तरी आमचे ग्रामीण भागात संघटन मजबूत आहे. १८ ब्लॉक असून आमचे ३८ हजार क्रियाशील सभासद आहेत. प्रश्न आहे तो तालुक्याच्या सक्षम नेतृत्वाचा. लोकांना आश्वासक वाटावे, असे तालुक्याचे नेतृत्व देण्यात कमी पडलो आहोत. हर्षवर्धन पाटील, संग्राम थोपटे व इतर पदाधिकाऱ्यांबरोबर नुकतीच एक बैैठक होऊन याबाबतचे धोरण ठरविण्यात आले आहे.