शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
2
गेमचेंजर! भारतात सापडला 'व्हाइट गोल्ड'चा खजिना; चीनवरील निर्भरता संपणार, नवी क्रांती घडणार
3
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
4
Asia Cup 2025: मोहसिन नक्वींच्या हकालपट्टीची मागणी; पाकिस्तानातच जोर धरू लागली...
5
TCS Layoffs: 'स्वतःहून राजीनामा द्या किंवा टर्मिनेट व्हा'; टीसीएसमध्ये ३० हजार कर्मचाऱ्यांची कपात? TATA समूहाच्या आयटी कंपनीत भीतीचं वातावारण
6
सूत जुळलं! १२वीच्या विद्यार्थिनीचं शिक्षकावर प्रेम जडलं, लग्न केलं अन् आता पतीसाठी मागतेय सुरक्षा
7
दीपिकाला अनफॉलो केलं? चर्चांवर अखेर फराह खानने सोडलं मौन, म्हणाली, "आम्ही दोघींनी..."
8
टाटाच्या शेअरनं घेतलाय रॉकेट स्पीड, आता होणार स्प्लीट; १०००% हून अधिक परतावा देत लोकांना केलंय मालामाल!
9
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही! कंपन्या फसवणूक करत असल्याच्या ३००० हून अधिक तक्रारी दाखल
10
Video: भारताविरोधातील पराभव सहन झाला नाही; पाकिस्तानी खेळाडूने रडत रडत बनवला व्हिडिओ अन्...
11
इंजिनियरचं धक्कादायक कृत्य, आधी पत्नीची हत्या केली, त्यानंतर मित्राला केला व्हिडीओ कॉल आणि ...
12
IndiGo Bomb Threat: इंडिगोच्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, दिल्ली विमानतळावर 'इमर्जन्सी'!
13
जेव्हा पाकिस्तान सरकारनं आपल्याच क्रिकेटर्सना चुना लावला; दिलेले चेकच बाऊन्स झाले; किती होती रक्कम? 
14
१ ऑक्टोबरपासून बदलणार इंट्राडे ट्रेडिंगचे नियम, गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
15
जीएसटी: २.२९ लाख रुपयांना लाँच झालेली ही बाईक, आता मिळतेय १.५५ लाख रुपयांना...
16
प्रेम विवाह: लग्नानंतर तुमची जोडी यशस्वी ठरेल की नाही? कुंडलीतील 'या' योगावरून मिळते उत्तर!
17
"आम्ही १५ वर्षांपासून वेगळे राहतोय...", गोविंदाच्या पत्नीचा मोठा खुलासा, सुनिता अहुजा म्हणाली...
18
संरक्षण, इन्फ्रा ते फायनान्स! 'हे' ५ शेअर्स करणार श्रीमंत! तुमच्या पोर्टफोलिओसाठी उत्तम पर्याय, टार्गेट प्राईस जाहीर
19
टीम इंडियाविरुद्ध लढवय्या वृत्ती दाखवली; पण एक धाव वाचवण्याच्या नादात करिअर संपलं हे एक अर्ध सत्य
20
नेपाळनंतर आता 'या' देशात Gen Z आंदोलनाचा झंझावात; सरकार कोसळले, राष्ट्रपतींची घोषणा...

संभ्रमावस्थेतच पार पडली एमएचटी-सीईटी परीक्षा

By admin | Updated: May 6, 2016 02:30 IST

अभियांत्रिकी, औषधनिर्माण शास्त्र आणि वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम प्रथम वर्ष प्रवेशासाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (एमएचटी-सीईटी) गुरूवारी राज्यभरात सुरळीत पार पडली.

मुंबई : अभियांत्रिकी, औषधनिर्माण शास्त्र आणि वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम प्रथम वर्ष प्रवेशासाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (एमएचटी-सीईटी) गुरूवारी राज्यभरात सुरळीत पार पडली. सर्वोच्च न्यायालयात ‘नीट’ परीक्षेचे प्रकरण प्रलंबित असल्याने सीईटी परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर संभ्रम दिसून येत होता.नीट परीक्षेबाबत राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात केलेल्या फेरयाचिकेवरील सुनावणी गुरुवारीही पुर्ण होऊ शकली नाही. सकाळी सीईटीची धाकधूक आणि दुपारी नीटचा निकाल या संभ्रमावस्थेतच सीईटीसाठी नोंदणी केलेले विद्यार्थी पालकांसह परीक्षा केंद्रावर पोहचले होते. त्यातील बहुतेक पालकांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याबाबत नाराजी व्यक्त केली. सरकारच्या चुकीच्या निर्णयाचा फटका विद्यार्थ्यांना बसत असल्याचे मत नयना दाने या पालकाने व्यक्त केली. मंत्री विद्यार्थ्यांना खुल्या मनाने परिक्षेला सामोरे जाण्याचे आवाहन करत आहेत. मात्र विद्यार्थी म्हणजे मशिन नसून सीईटी रद्द होण्याची भीती मुलांसह पालकांच्या मनात असल्याची त्यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)भौतिकशास्त्राने रडवलेदरवर्षीप्रमाणे यंदाही भौतिकशास्त्र पेपर कठीण गेल्याची प्रतिक्रिया बहुतेक विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्नांमुळे नेमके पेपरमध्ये काय लिहावे, हेच सुचले नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. काही विद्यार्थ्यांनी तर अवघड गेलेल्या भौतिकशास्त्रामुळे गणिताचा पेपर देण्याचा विचारच रद्द केला होता. मात्र निकालावर नापास येईल, या भीतीने संपूर्ण परीक्षा दिल्याचे विद्यार्थ्यांनी स्पष्ट केले.ठाण्यात रिक्षा पकडण्यासाठी गोंधळसकाळी रिक्षांची कमतरता आणि सीईटीच्या परीक्षेसाठी वेळेत जाण्यासाठी उतावीळ झालेले विद्यार्थी यामुळे ठाणे रेल्वे स्थानकात विद्यार्थ्यांचा एकच गोंधळ उडाला. परीक्षेला वेळेत पोहोचावे म्हणून हजारो विद्यार्थी गुरूवारी रिक्षा पकडण्यासाठी सैरभैर धावत होते. यंदा ठाणे जिल्हयामध्ये २५ हजार ३८९ विद्यार्थी आरोग्य विज्ञान अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्र मासाठी एमएचटी-सीईटी परीक्षेला बसले होते.गुरूवारी सकाळी ११.३० ही पेपरची वेळ होती. या परीक्षेला जाण्यासाठी सकाळी ८ वा. या विद्यार्थ्यांनी ठाणे रेल्वे स्टेशन परिसरातील रिक्षा स्टॅण्डवर गर्दी केली होती. उशीरा पोहोचल्यास परीक्षा हॉलमध्ये प्रवेश मिळणार नाही, अशी भीती त्यांना होती. एकीकडे चाकरमान्यांची असलेली गर्दी आणि दुसरीकडे परीक्षेसाठी आलेले हजारो विद्यार्थी यामुळे ठाणे स्टेशन परिसरात गोंधळच गोंधळ सुरू होता. जांभळी नाक्याच्या दिशेने स्टेशनकडे येणाऱ्या रिक्षा रस्त्यावरील खोदकामामुळे वाहतूककोंडीत अडकल्याने स्टँडपर्यंत येईपर्यंत त्यांना वेळ लागत होता. वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद कांबळे यांनी विद्यार्थ्यांचा गोंधळ सावरण्याचा प्रयत्न केला. सकाळी ८ ते ९.३० वाजेपर्यंत हा गोंधळ सुरू होता. ११,५०८ विद्यार्थ्यांची दांडीराज्यातील ३६ जिल्ह्यांमधील १ हजार ५४ परीक्षा केंद्रांवर पार पडलेल्या परीक्षेस एकूण ४ लाख ९ हजार २६० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. मात्र प्रत्यक्षात परीक्षेला ३ लाख ९७ हजार ७६८ विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. तर २.८ टक्के म्हणजेच ११ हजार ५०८ विद्यार्थ्यांनी परीक्षेला दांडी मारल्याची माहिती परीक्षा कक्षाने दिली.मुंबई शहरातून परीक्षेसाठी एकूण २५ हजार २४५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील केवळ २३ हजार ३९४ विद्यार्थी परीक्षेला हजर होत. मुंबई उपनगरातून २० हजार ९८० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील २० हजार ५५८ विद्यार्थी परीक्षेला उपस्थित होते.