शहरं
Join us  
Trending Stories
1
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
2
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
3
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
4
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
5
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
6
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
7
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
8
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
9
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
10
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
11
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
12
Mallikarjun Kharge : "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
13
'कुणबी प्रमाणपत्र,व्हॅलिडिटीचा प्रश्न सोडवा'; धाराशिवमध्ये सरनाईकांना मराठा तरुणांचा घेराव!
14
“राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो संपेल, तेच मराठीचा अनादर करतात”; आणखी एका भाजपा खासदाराची टीका
15
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...
16
“दिवस निवड, वेळ अन् जागा तुझी, कुठे येऊ ते फक्त सांग”; मनसे नेत्यांचे निशिकांत दुबेंना आव्हान
17
२ सख्ख्या भावांनी एकाच मुलीसोबत केले लग्न, कारण...; अजब लग्नाची ही गजब गोष्ट काय आहे?
18
बजाजची साथ सोडून अंबांनींसोबत आली ही दिग्गज जर्मन विमा कंपनी, लाखो कोटींच्या व्यवसायावर नजर
19
“विधानभवनातील मारामारीला CM फडणवीसच जबाबदार, हनीट्रॅपचे धागेदारे...”: हर्षवर्धन सपकाळ
20
IND vs ENG: आमची बरोबरी करायची असेल तर तुमची खरी ताकद दाखवा; इंग्लंडच्या दिग्गजाचा टीम इंडियाला सल्ला

‘नीट’ परीक्षेमध्ये गोंधळ!

By admin | Updated: May 2, 2016 01:01 IST

वैद्यकीय प्रवेशाच्या राष्ट्रीय प्रवेश पात्रता परीक्षा अर्थात ‘नीट’मधील गोंधळात रविवारी आणखी भर पडली आहे. नवी मुंबईतील ऐरोलीमधील डीएव्ही पब्लिक स्कूलमध्ये परीक्षेसाठी गेलेल्या

मुंबई : वैद्यकीय प्रवेशाच्या राष्ट्रीय प्रवेश पात्रता परीक्षा अर्थात ‘नीट’मधील गोंधळात रविवारी आणखी भर पडली आहे. नवी मुंबईतील ऐरोलीमधील डीएव्ही पब्लिक स्कूलमध्ये परीक्षेसाठी गेलेल्या १२ विद्यार्थ्यांना उशिरा पोहोचल्याच्या कारणास्तव परीक्षेला मुकावे लागले. मात्र शाळा प्रशासनाने परीक्षा सुरू होण्याच्या तीन मिनिटांआधीच गेट बंद केल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.ऐरोलीतील डीएव्ही पब्लिक स्कूलमध्ये १२ विद्यार्थी परीक्षेला मुकल्याचे समोर आले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे परीक्षेला मुकलेल्या या मुलांना पुढील दुसऱ्या सत्रात होणाऱ्या २४ जुलैची संधीही मिळणे अशक्य होणार आहे. सकाळी १० वाजता सुरू होणाऱ्या या परीक्षेला विद्यार्थ्यांनी ९.३० वाजण्याआधी परीक्षा केंद्रात उपस्थित राहण्याची सूचना मंडळाने आधीच केलेली आहे. मात्र परीक्षेला मुकलेल्या विद्यार्थ्यांनी केलेल्या आरोपानुसारशाळा प्रशासनाने सकाळी ९ वाजून २८ मिनिटांनाच प्रवेशद्वार बंद केले. वेळेआधीच गेट बंद केल्याचे शाळा प्रशासनाला लक्षात आणून दिल्यानंतरही प्रशासनाच्या घडाळ््याप्रमाणेच गेट बंद केल्याचे स्पष्टीकरण शाळा प्रशासनाने दिल्याचा आरोप संबंधित विद्यार्थ्यांनी केला आहे.एका मिनिटामुळे वर्ष वाया!अहमदनगरहून परीक्षेसाठी आलेल्या स्वप्नाली जाधव या विद्यार्थिनीला केवळ एका मिनिटाच्या विलंबामुळे परीक्षेला मुकावे लागले. सकाळी ८ वाजताच परीक्षा केंद्रावर येऊन थांबलेल्या स्वप्नालीने परीक्षा ओळखपत्रावर फोटो लावलेला नव्हता. तोच मिळवण्यासाठी ती सकाळी परिसरात फोटो स्टुडिओ शोधत होती. मात्र फोटो मिळवून परीक्षा केंद्रावर पोहोचायला तिला केवळ एका मिनिटाचा उशीर झाला. या प्रकाराबाबत शाळा प्रशासनाला माहिती देऊन विनंती केल्यानंतरही परीक्षेला बसता आले नसल्याचे स्वप्नालीने सांगितले. (प्रतिनिधी)परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी विविध उपायपरीक्षा सुरळीत पार पडावी म्हणून मंडळाने विविध उपाययोजना केल्या. त्यात परीक्षा केंद्रांवर मोबाइल जॅमर लावणे, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी मेटल डिटेक्टरची मदत घेण्यात आली. दरम्यान, कॉपीमुक्त परीक्षेसाठी काही केंद्रांवर सीसीटीव्हीची उपाययोजनाही करण्यात आली होती. आजच्या निर्णयाकडे विद्यार्थ्यांचे डोळेराज्यातील सर्व विद्यार्थ्यांचे लक्ष सोमवारी राज्य सरकारकडून सादर होणाऱ्या फेरविचार याचिकेकडे लागले आहे. याआधी अनेकांची फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे नीटच्या निकालाआधी फेरविचार याचिकेच्या निर्णयाचे टेन्शन विद्यार्थ्यांना आहे.