शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

‘अवकाळी’वरील गोंधळ अर्धा तासच टिकला

By admin | Updated: March 11, 2015 01:51 IST

राज्यात पडलेल्या अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची चर्चा बाकीचे कामकाज बाजूला सारून आधी घ्या, अशी मागणी करीत काँग्रेस

मुंबई : राज्यात पडलेल्या अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची चर्चा बाकीचे कामकाज बाजूला सारून आधी घ्या, अशी मागणी करीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मंगळवारी विधानसभेत आक्रमक झाले खरे पण या मुद्यावरून त्यांचा गोंधळ केवळ अर्धा तास टिकला. विरोधकांनी सभात्याग केला. सरकारने आपल्या इच्छेनुसार कामकाज पूर्ण केले. सभागृहाचे कामकाज सुरू होताच अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला. मात्र, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आधी अवकाळी पावसाच्या नुकसानीची चर्चा करा, अशी मागणी केली. विरोधीपक्षनेते विखे पाटील, राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनी चर्चेची मागणी कायम ठेवली. विरोधी सदस्यांनी सरकार आणि अध्यक्षांविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. अध्यक्षांचा धिक्कार करणे हा सभागृहाचा अवमान असल्याचे सांगून, ‘माफी मागा नाही तर यांना निलंबित करा’, असे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी म्हणताच गोंधळ अधिक वाढला. विरोधकांना केवळ राजकारण करायचे आहे, असे सांगत शिवसेनेचे गुलाबराव पाटील सरकारच्या बचावासाठी धावले. या गदारोळात अध्यक्षांनी कामकाज १५ मिनिटांसाठी तहकूब केले. ते पुन्हा सुरू झाल्यानंतरही गोंधळ सुरूच राहिला. विरोधक बाहेर पडल्यानंतर कामकाज सुरूच राहिले. अशाप्रकारे बाकीचे कामकाज थांबवून अवकाळीवर चर्चा घडवून आणण्यात विरोधकांना यश आले नाही. शेवटी सत्तापक्षाने या विषयावर नियम २९३ नुसार आणलेल्या प्रस्तावावर चर्चेला सुरुवात झाली. (विशेष प्रतिनिधी)