शहरं
Join us  
Trending Stories
1
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
2
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
3
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
4
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
5
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
6
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
7
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?
8
Electric Car: एका चार्जवर ३ देश फिरले, 'या' इलेक्ट्रिक कारची गिनीज बूकमध्ये नोंद होणार!
9
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
10
"सैफ रुग्णालयात असताना करीना कपूरच्या कारवरही हल्ला झाला", रोनित रॉयचा धक्कादायक खुलासा
11
Tarot Card: या सप्ताहात परिस्थितीचा करा स्वीकार, भावनेत न गुंतता करा सारासार विचार!
12
Air India Plane Crash: टेकऑफ ते क्रॅश होईपर्यंत 'त्या' ९८ सेकंदात काय झालं?; AAIB चा रिपोर्ट, धक्कादायक खुलासे
13
अमृता सुभाषची झाली फसवणूक? ठळक अक्षरात लिहिलं CHEATED; "ह्याबद्दल बोलूच पण..."
14
अन्न-पाणीही मिळेना, लोकांची होतेय तडफड! गाझामध्ये मदत केंद्राजवळच ७९८ लोकांचा मृत्यू
15
चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय वेळ काय? बाप्पा होईल प्रसन्न, ‘असे’ करा पूजन
16
Maharashtra Co-op Bank case: आमदार रोहित पवार यांच्याविरोधात ईडीने दाखल केले पुरवणी आरोपपत्र
17
Radhika Yadav : "इथे खूप बंधनं, मला जीवनाचा आनंद घ्यायचाय..."; राधिकाचं कोचसोबतचं WhatsApp चॅट समोर
18
'स्क्विड गेम'मधला गी ह्युन हिंदी सिनेमात दिसणार? अभिनेता ली जुंगने दिली प्रतिक्रिया
19
भारत रशियाच्या मैत्रीमुळे अमेरिकेला पोटदुखी; ५००% टॅरिफसाठी विधेयक सादर, काय होणार आपल्यावर परिणाम?
20
दिल्लीत ४ मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अडकले अनेक लोक, बचावकार्य सुरू

केंद्र बदलल्याने गोंधळ

By admin | Updated: March 2, 2017 02:18 IST

मंगळवारपासून सुरू झालेल्या बारावीच्या परीक्षांची केंद्रे अचानक बदलल्याने अनेक परीक्षार्थींवर आयत्या वेळी धावाधाव करण्याची वेळ आली

मनोहर कुंभेजकर,मुंबई- मंगळवारपासून सुरू झालेल्या बारावीच्या परीक्षांची केंद्रे अचानक बदलल्याने अनेक परीक्षार्थींवर आयत्या वेळी धावाधाव करण्याची वेळ आली. अनेक विद्यार्थ्यांना केंद्र शोधण्यासाठी प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या भोंगळ कारभाराचा फटका मुंबईतील अनेक विद्यार्थ्यांना बसला. आधीच प्रचंड वाहतूककोंडीने जेरीस आलेले असताना केंद्र बदलाने मनस्ताप सहन करावा लागला. विशेष म्हणजे यात अध्ययन अक्षम आणि अपंग विद्यार्थ्यांची संख्या मोठी होती. निशिल घोडके या वाणिज्य शाखेतील सेरेब्रल पाल्सीग्रस्त, व्हीलचेअरवर असणाऱ्या व लेखनिकाच्या मदतीने पेपर सोडविणाऱ्या विद्यार्थ्याचेही हाल झाले. या विद्यार्थ्याचे एम. के. संघवी कनिष्ठ महाविद्यालय हे परीक्षा केंद्र आयत्यावेळी बदलून त्याला जुहू येथील कै. अनंत जनार्दन म्हात्रे कनिष्ठ महाविद्यालय येथे पाठवण्यात आले. त्या महाविद्यालयात लिफ्टची सोय नसल्याने व निशिल जिने चढण्यास असमर्थ असल्याने त्याचे पालक कोंडीत सापडले. पालकांनी महाविद्यालय प्रशासनाकडे त्याच्यासाठी आणि त्याच्यासारख्या अन्य विशेष विद्यार्थ्यांची तळमजल्यावर परीक्षा घेण्याची सोय करा, अशी विनंती केली. परंतु, किरकोळ कारणे सांगत ही विनंती अमान्य करण्यात आली. त्यानंतर प्रचंड कष्ट घेऊन निशिलला चार जिने चढवून दुसऱ्या मजल्यावरील वर्गात जावे लागले. महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ आणि व सदर महाविद्यालय प्रशासनाच्या अपंग विद्यार्थ्यांप्रती असलेली अनास्था व असहिष्णुता लाजिरवाणी असल्याचे पालकांनी या वेळी बोलून दाखविले. शासनाच्या अपंगाना समान व सन्मानजनक वागणूक देण्याच्या व त्यांना मूळ प्रवाहात सामावून घेण्याच्या धोरणाला हा प्रकार हरताळ फासणारा असल्याचे काही शिक्षकांनी सांगितले. >इतरांनाही त्रासनिशिलचे पालक जागरूक असल्याने हा प्रकार समोर आला. अनेक परीक्षार्थींचे असे हाल होत आहेत, पण ते समोर येत नाहीत, असे मतही काही शिक्षकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. अपंग विद्यार्थ्यांप्रती असलेली अनास्था व असहिष्णुता लाजिरवाणी असल्याचे पालकांनी या वेळी बोलून दाखविले.