शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

सशस्त्र पोलीस शिपाई भरतीमध्ये गोंधळ

By admin | Updated: May 13, 2015 01:49 IST

सर्वांत जलदगतीने भरती प्रक्रिया राबवण्याची ख्याती असलेल्या राज्य राखीव पोलीस बलाचा संथगती कारभार प्रथमच समोर आला आहे.

चेतन ननावरे, मुंबई सर्वांत जलदगतीने भरती प्रक्रिया राबवण्याची ख्याती असलेल्या राज्य राखीव पोलीस बलाचा संथगती कारभार प्रथमच समोर आला आहे. केवळ महिन्याभरात भरती प्रक्रिया संपवणाऱ्या बलाने २०१४ साली सशस्त्र पोलीस शिपाई पदासाठी घेतलेल्या भरतीमधील ७० उमेदवारांना अद्याप नोकरी मिळाली नसल्याची माहिती ‘लोकमत’च्या हाती लागली आहे.राज्य राखीव पोलीस बलाच्या गोरेगाव येथील गट क्रमांक ८मधील २२० जागा भरण्यासाठी २०१४ साली जाहिरात काढण्यात आली होती. ५ मे २०१४ ही आॅनलाइन फॉर्म भरण्याची अंतिम तारीख होती. सुमारे १३ हजार तरुणांनी त्यासाठी अर्ज केले. त्यातून पात्र उमेदवारांना ३ ते ८ जूनदरम्यान मैदानी चाचणी आणि कागदपत्र तपासणीसाठी बोलावण्यात आले. यामध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांनी १२ जूनला लेखी परीक्षाही दिली. त्यातून उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची वैद्यकीय चाचणी ७ आॅगस्टला झाली. अशा प्रकारे २२० उमेदवारांनी भरती प्रक्रिया यशस्वीरीत्या पार केली. यानंतर पात्र झालेल्या उमेदवारांना प्रथम ९ महिन्यांचे प्रशिक्षण आणि नंतर मुंबईमध्ये नियुक्ती देण्याची अपेक्षा होती. मात्र भरती प्रक्रिया उलटून ९ महिने झाल्यानंतरही ७० उमेदवारांना अद्याप कामावर हजरच करून घेतले नसल्याचा धक्कादायक प्रकार गोरेगाव येथील गट क्रमांक ८मध्ये घडला आहे.निवड झालेल्या २२० उमेदवारांपैकी केवळ ८३ उमेदवारांनाच २५ आॅगस्ट २०१४ रोजी प्रशिक्षणासाठी हजर करून घेऊन दौंड येथे धाडण्यात आले. त्यानंतर महिन्याभराने आणखी ४३ उमेदवारांना प्रशिक्षणासाठी पुणे येथील रामटेकडीला पाठवण्यात आले. अशा प्रकारे गेल्या ९ महिन्यांमध्ये टप्प्याटप्प्याने केवळ १५० उमेदवारांनाच हजर करून प्रशिक्षणासाठी धाडले आहे. त्यामुळे इतर उमेदवारांना प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष नियुक्ती कधी मिळणार याबाबत संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.काही उमेदवारांनी ‘लोकमत’शी संपर्क साधत या प्रकरणाला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला आहे. राज्य राखीव पोलीस बलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली असता भरती झालेल्या प्रत्येक उमेदवाराला लवकरच प्रशिक्षणासाठी पाठवण्यात येईल, असे पठडीतले उत्तर मिळत आहे. मात्र नियुक्ती नेमकी मिळणार तरी कधी, याबाबत निश्चित तारीख सांगण्यास प्रशासन टाळाटाळ करीत आहे.