शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
2
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
3
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
4
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
5
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
6
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा
7
अमेरिकन लढाऊ विमानाला हवेतच आग लागली, अलास्कामध्ये F-35 विमान कोसळले
8
प्रेमासाठी काय पण! क्वांटम डेटिंग म्हणजे काय, नव्या पिढीमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
9
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
10
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
11
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
12
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा गंभीर आरोप
13
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
14
संतापजनक! मोबाईल दुरुस्ती दुकानातून खाजगी व्हिडीओ लीक, आता येत आहेत वाईट मेसेज
15
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!
16
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
17
AAI Recruitment: एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी, निवड झाल्यास दीड लाख पगार!
18
EV सेक्टरच्या शेअरची कमाल! दिला 8600% परतावा, 59 पैशांचा स्टॉक 51 रुपयांवर पोहोचला; करतोय मालामाल
19
पार्थ पवारांनी पैसे दिले, जॅकलिनने लालबागच्या राजाच्या पेटीत टाकले, पाहा VIDEO
20
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

चुकीच्या सूचनांमुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ

By admin | Updated: February 27, 2017 00:10 IST

विद्यार्थ्यांना चुकीच्या सूचना दिल्याने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला असल्याचा आरोप विद्यार्थ्यांच्या पालकांनी केला

पिंपरी : शिष्यवृत्ती परीक्षेवेळी केंद्र संचालक व पर्यवेक्षकांनी विद्यार्थ्यांना चुकीच्या सूचना दिल्याने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला असल्याचा आरोप विद्यार्थ्यांच्या पालकांनी केला आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार असल्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली. रविवारी घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परिक्षेचे केंद्र निगडी, प्राधिकरणातील एका शाळेत होते. या केंद्रावर केंद्र संचालक व पर्यवेक्षकांनी परीक्षा कालावधीच्या वेळेबाबत विद्यार्थ्यांना चुकीच्या सूचना दिल्याने विद्यार्थी गोंधळले. पेपरची वेळ संपण्यास पंधरा ते वीस मिनिटांचा वेळ शिल्लक असतानाही तेथील पर्यवेक्षकांनी केवळ दोनच मिनिटे शिल्लक असल्याची सूचना विद्यार्थ्यांना केली. यामुळे विद्यार्थ्यांनी उरलेले प्रश्न घाईघाईत सोडविले. वेळ असतानाही विद्यार्थ्यांना प्रश्न सोडविण्यास पुरेसा वेळ मिळाला नाही. या घाईगडबडीत विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याचा आरोप पालकांनी केला आहे. तसेच काही सेमी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना मराठी माध्यमाच्या प्रश्नपत्रिका देण्यात आल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ झाला असून, मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. तरी या प्रकरणाचा गांभीर्याने विचार करून चौकशी व्हावी, अशी मागणी पालकांनी केली आहे.(प्रतिनिधी)