शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

विरोधक काढणार संघर्ष यात्रा

By admin | Updated: March 25, 2017 00:31 IST

१९ आमदारांचे निलंबन मागे घ्यावे, ही विरोधी पक्षाची मागणी सरकारने मान्य केली नाही. त्यामुळे हा प्रश्न थेट जनतेच्या दारात नेण्याचा निर्णय विरोधी पक्षाने घेतला आहे.

अतुल कुलकर्णी / मुंबई१९ आमदारांचे निलंबन मागे घ्यावे, ही विरोधी पक्षाची मागणी सरकारने मान्य केली नाही. त्यामुळे हा प्रश्न थेट जनतेच्या दारात नेण्याचा निर्णय विरोधी पक्षाने घेतला आहे. राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी भूमिकेचे वास्तव जनतेच्या दरबारात मांडण्यासाठी २९ मार्च ते ३ एप्रिल अशी संघर्ष यात्रा काढण्यात येणार आहे.विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असताना शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी सगळे विरोधी पक्ष एकत्र येऊन राज्यभर यात्रा काढणार आहेत. असे राज्याच्या इतिहासात पहिल्यांदा घडत आहे. मध्यावधी निवडणुकीचे पिल्लू भाजपाने जाणीवपूर्वक सोडले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीचे काही आमदार फूटून भाजपात येण्यास तयार असल्याचे सांगत विरोधकांमध्ये अस्वस्थता निर्माण करण्याचा यामागे हेतू आहे. जर विरोधी आमदारांना राजीनामे देऊन त्यांना निवडून आणायचे असेल तर त्या त्या ठिकाणी असणाऱ्या भाजपा सेनेच्या दोन नंबरच्या नेत्यांचे काय? त्यांना कसे गप्प करायचे?, जर विरोधकांनी एकास एक उमेदवार देण्याची भूमिका घेतली आणि त्यातून जर अशा आमदारांचा पराभव झाला तर त्यांची अवस्था ‘ना घर का ना घाट का’ अशी होईल त्याचे काय? त्यांचे पुनर्वसन कसे आणि कुठे करणार? असे अनेक प्रश्न आज भाजपाचे आमदार उपस्थित करत होते. भाजपाने शिवसेनेच्या मंत्र्यांना हाताशी धरून सेनेच्या आमदारांना जाणीवपूर्वक वाऱ्यावर सोडले आहे. शिवसेनेचे अस्वस्थ आमदार वेळ पडली तर भाजपात येतील, असा यामागचा डाव असल्याची चर्चा आहे.शुक्रवारी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बंगल्यावर सर्व विरोधकांची बैठक झाली. धनंजय मुंडे, पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार, नारायण राणे, जयंत पाटील यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. विधानसभेचे अधिवेशन ७ एप्रिल पर्यंत आहे. त्याआधीच २९ मार्च पासून संघर्ष यात्रा सुरु काढण्याचा निर्णय घेण्यात आला. या यात्रेचे नाव आणि मार्ग उद्या निश्चित होणार आहे. पण ही यात्रा चंद्रपूर, यवतमाळ, नागपूर, अमरावती, हिंगोली, परभणी, जालना, औरंगाबाद, बीड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, पुणे मार्गे ३ एप्रिलला पनवेलला येईल. तेथे या यात्रेचा समारोप होणार आहे.