शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
4
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
5
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
6
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
7
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
8
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
9
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
10
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
11
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
12
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
13
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
14
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
15
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
17
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
18
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
19
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
20
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस

विरोधक काढणार संघर्ष यात्रा

By admin | Updated: March 25, 2017 00:31 IST

१९ आमदारांचे निलंबन मागे घ्यावे, ही विरोधी पक्षाची मागणी सरकारने मान्य केली नाही. त्यामुळे हा प्रश्न थेट जनतेच्या दारात नेण्याचा निर्णय विरोधी पक्षाने घेतला आहे.

अतुल कुलकर्णी / मुंबई१९ आमदारांचे निलंबन मागे घ्यावे, ही विरोधी पक्षाची मागणी सरकारने मान्य केली नाही. त्यामुळे हा प्रश्न थेट जनतेच्या दारात नेण्याचा निर्णय विरोधी पक्षाने घेतला आहे. राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी भूमिकेचे वास्तव जनतेच्या दरबारात मांडण्यासाठी २९ मार्च ते ३ एप्रिल अशी संघर्ष यात्रा काढण्यात येणार आहे.विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असताना शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी सगळे विरोधी पक्ष एकत्र येऊन राज्यभर यात्रा काढणार आहेत. असे राज्याच्या इतिहासात पहिल्यांदा घडत आहे. मध्यावधी निवडणुकीचे पिल्लू भाजपाने जाणीवपूर्वक सोडले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीचे काही आमदार फूटून भाजपात येण्यास तयार असल्याचे सांगत विरोधकांमध्ये अस्वस्थता निर्माण करण्याचा यामागे हेतू आहे. जर विरोधी आमदारांना राजीनामे देऊन त्यांना निवडून आणायचे असेल तर त्या त्या ठिकाणी असणाऱ्या भाजपा सेनेच्या दोन नंबरच्या नेत्यांचे काय? त्यांना कसे गप्प करायचे?, जर विरोधकांनी एकास एक उमेदवार देण्याची भूमिका घेतली आणि त्यातून जर अशा आमदारांचा पराभव झाला तर त्यांची अवस्था ‘ना घर का ना घाट का’ अशी होईल त्याचे काय? त्यांचे पुनर्वसन कसे आणि कुठे करणार? असे अनेक प्रश्न आज भाजपाचे आमदार उपस्थित करत होते. भाजपाने शिवसेनेच्या मंत्र्यांना हाताशी धरून सेनेच्या आमदारांना जाणीवपूर्वक वाऱ्यावर सोडले आहे. शिवसेनेचे अस्वस्थ आमदार वेळ पडली तर भाजपात येतील, असा यामागचा डाव असल्याची चर्चा आहे.शुक्रवारी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बंगल्यावर सर्व विरोधकांची बैठक झाली. धनंजय मुंडे, पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार, नारायण राणे, जयंत पाटील यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. विधानसभेचे अधिवेशन ७ एप्रिल पर्यंत आहे. त्याआधीच २९ मार्च पासून संघर्ष यात्रा सुरु काढण्याचा निर्णय घेण्यात आला. या यात्रेचे नाव आणि मार्ग उद्या निश्चित होणार आहे. पण ही यात्रा चंद्रपूर, यवतमाळ, नागपूर, अमरावती, हिंगोली, परभणी, जालना, औरंगाबाद, बीड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, पुणे मार्गे ३ एप्रिलला पनवेलला येईल. तेथे या यात्रेचा समारोप होणार आहे.