शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
4
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
5
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
6
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
7
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
8
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
9
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
10
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
11
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
12
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
13
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
14
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
15
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
16
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
17
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
18
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
19
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
20
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ

कोल्हापूरमध्ये उपसाबंदीवरून संघर्षाची चिन्हे

By admin | Updated: April 18, 2016 01:29 IST

पिण्याच्या पाण्यासाठी आता नदी, तलावांबरोबरच खासगी विहिरी, कूपनलिकांवरही (बोअरवेल) कोल्हापूर पाटबंधारे विभागाने उपासाबंदीचा आदेश काढला आहे. मात्र, त्यामुळे शेतकरी

- भीमगोंडा देसाई,  कोल्हापूरपिण्याच्या पाण्यासाठी आता नदी, तलावांबरोबरच खासगी विहिरी, कूपनलिकांवरही (बोअरवेल) कोल्हापूर पाटबंधारे विभागाने उपासाबंदीचा आदेश काढला आहे. मात्र, त्यामुळे शेतकरी आणि प्रशासनात संघर्ष होण्याची चिन्हे आहेत.स्वत:च्या पैशाने खोदलेल्या विहिरी आणि कूपनलिकांवर उपसाबंदी लादण्याचा प्रशासनास काय अधिकार आहे, असासंतप्त सवाल शेतकऱ्यांनी केलाआहे. कोल्हापूर जिल्ह्यातपाणीसाठे पिण्यासाठी पहिल्यांदा पिण्यासाठी आरक्षित करण्यात आले आहे. उर्वरित पाणी शेती, उद्योगासाठी वापरण्याला मुभा दिली आहे. नोव्हेंबर २०१५ पासून नदी, तलाव यांच्यावर उपसाबंदी झाली. उपसाबंदीच्या कालावधीत आकडे टाकून विद्युत पंपाद्वारे पाणी उपसणाऱ्या शेतकऱ्यांवर कडक कारवाई करा, अशी सूचनापालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीदोन दिवसांपूर्वी झालेल्यापाणीटंचाई निवारण बैठकीतदिली. त्यांच्या सूचनेचा आधारघेत ‘पाटबंधारे’च्या प्रशासनाने खासगी कूपनलिका, विहिरी यांच्यावरही उपसाबंदी केली आहे.सिंचनासाठी पाणीचार मोठ्या प्रकल्पांतील २.२७ टीएमसी, नऊ मध्यम प्रकल्पातील ०.२०१ टीएमसी, ५३ लघु पाटबंधारे प्रकल्पातील २.२१२ टीएमसी पाणी सिंचनासाठी राखीव आहे.काही शेतकरी उपसाबंदी नसलेल्या कालावधीत खासगी विहिरीत पाणी टाकत आहेत. उपसाबंदीच्या कालावधीत ते विहिरीतील पाणी उपसत असल्याच्या तक्रारी आहेत. उपसाबंदीची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी सरसकट खासगी विहिरी, कूपनलिका यांच्यावरही उपसाबंदी केली आहे.- विजय पाटील, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभागसर्वच खासगी विहिरी, कूपनलिकांचे पाणी पिण्यास योग्य नसते. त्यामुळे विंधन विहिरी, विहिरी यांच्यावर उपसाबंदी करणे अन्यायकारक आहे. उपसाबंदीचा आठ दिवसांचा कालावधीही अधिक आहे. त्यामुळे भाजीपाल्यासारखी पिके करपून जात आहेत. - भगवान काटे, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना