शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

संघटनांमधील वाद धुमसतोय

By admin | Updated: February 28, 2017 01:18 IST

दोन संघटनांमध्ये निर्माण झालेल्या वादाचे पडसात सोमवारीही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात उमटलेले दिसून आले.

पुणे : आक्षेपार्ह पोस्टर लावल्यामुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप)आणि स्टुडंट फेडरेशन आॅफ इंडिया (एसएफआय) या दोन संघटनांमध्ये निर्माण झालेल्या वादाचे पडसात सोमवारीही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात उमटलेले दिसून आले. एसएफआयच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांकडे विद्यापीठात रॅली काढण्यास परवानगी मागितली. मात्र, पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.गेल्या काही दिवसांपासून विद्यापीठाच्या आवारात अभाविप आणि एसएफआय या दोन संघटनांमध्ये वाद सुरू आहे. दोन्ही संघटनांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले; मात्र विद्यापीठाच्या आवारात दडपशाही केली जात असल्याचा आरोप करीत त्याच्या निषेधार्थ एसएफआयच्या कार्यकर्त्यांनी रॅली काढण्याची भूमिका घेतली. परंतु, पोलिसांकडून मोर्चास परवानगी न दिल्याने पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये काही काळ वाद झाला. त्यानंतर एकाच ठिकाणी बसून विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून निषेध नोंदवला. सकाळी ११ वाजल्यापासून दुपारी २ वाजेपर्यंत विद्यापीठात पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.विद्यापीठात जमावबंदी लागू करण्यात आली असल्याचे सांगून पोलिसांकडून रॅली काढण्यास परवानगी दिली जात नाही. मात्र, अभाविपला शनिवारवाड्यापासून कौन्सिल हॉलपर्यंत मोर्चा काढण्यास परवानगी दिली जाते. पोलिसांकडून हा दुजाभाव दाखवला जात असल्याचा आरोपही एसएफआयच्या कार्यकर्त्यांनी केला.एसएफआय संघटनेस संभाजी ब्रिगेड, आयसा, डाप्सा, सम्यक् विद्यार्थी आंदोलन आदी संघटनांनी पाठिंबा दिला. सर्व संघटनांनी भाजपाचे आमदार प्रशांत परिचारक यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध केला.>पोलिसांवर राजकीय दबावविद्यापीठाच्या मुख्य द्वारापासून ते मुख्य इमारतीपर्यंत रॅली काढण्यासाठी मागच्या आठवड्यात पोलिसांची परवानगी घेतली होती, मात्र सोमवारी सकाळी ११ वाजता अचानक परवानगी नाकारण्यात आली.राजकीय दबावातून ही परवानगी नाकारली जात असल्याचा आरोप भूषण राऊत या विद्यार्थ्याने केला.विद्यापीठातील अभाविपच्या कार्यकर्त्यांकडून दडपशाही व दादागिरी करून विद्यार्थ्यांवर दबाव आणला जात असल्याचा अरोप विद्यार्थी एसएफआयच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला. पोलिसांनी व विद्यापीठ प्रशासनाने विद्यापीठात निर्भीड वातावरण तयार करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणीही एसएफआयच्या कार्यकर्त्यांनी केली.>सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात चर्चा होण्यास हरकत नसली तरी चर्चा या संविधानाच्या कक्षेत राहूनच व्हायला हव्यात. विद्यार्थ्यांच्या चर्चा या वैचारिक पातळीवरच झाल्या पाहिजेत. विद्यापीठातर्फे कुठल्याही प्रकारच्या हिंसक घटनांचे समर्थन केले जाणार नाही. विद्यार्थ्यांनी समजूतदारपणा दाखवणे गरजेचे आहे. कोणत्याही घटनांमुळे विद्यापीठातील वातावरण दूषित होत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही. तरीही अशा बाबी समोर आल्या तर विद्यापीठ प्रशासनातर्फे संबंधितांवर योग्य कारवाई केली जाईल.- वासुदेव गाडे, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ >विद्यापीठातील विचार स्वातंत्र्य नष्ट होत चालले असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘सावित्री’ची लेक म्हणून बोलायला उभी असताना आज भीती वाटत आहे. आम्हाला दुसऱ्यांकडून देशभक्ती शिकवली जाते. मात्र, आम्ही कोणाला घाबरणार नाही. आम्ही वैचारिक स्वातंत्र्यासाठी उभे राहून लढा उभारू. शांततेच्या मार्गाने लोकशाहीसाठी आम्ही झगडत राहू.- एस. जी. राही, विद्यार्थी