शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

संघटनांमधील वाद धुमसतोय

By admin | Updated: February 28, 2017 01:18 IST

दोन संघटनांमध्ये निर्माण झालेल्या वादाचे पडसात सोमवारीही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात उमटलेले दिसून आले.

पुणे : आक्षेपार्ह पोस्टर लावल्यामुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप)आणि स्टुडंट फेडरेशन आॅफ इंडिया (एसएफआय) या दोन संघटनांमध्ये निर्माण झालेल्या वादाचे पडसात सोमवारीही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात उमटलेले दिसून आले. एसएफआयच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांकडे विद्यापीठात रॅली काढण्यास परवानगी मागितली. मात्र, पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.गेल्या काही दिवसांपासून विद्यापीठाच्या आवारात अभाविप आणि एसएफआय या दोन संघटनांमध्ये वाद सुरू आहे. दोन्ही संघटनांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले; मात्र विद्यापीठाच्या आवारात दडपशाही केली जात असल्याचा आरोप करीत त्याच्या निषेधार्थ एसएफआयच्या कार्यकर्त्यांनी रॅली काढण्याची भूमिका घेतली. परंतु, पोलिसांकडून मोर्चास परवानगी न दिल्याने पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये काही काळ वाद झाला. त्यानंतर एकाच ठिकाणी बसून विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून निषेध नोंदवला. सकाळी ११ वाजल्यापासून दुपारी २ वाजेपर्यंत विद्यापीठात पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.विद्यापीठात जमावबंदी लागू करण्यात आली असल्याचे सांगून पोलिसांकडून रॅली काढण्यास परवानगी दिली जात नाही. मात्र, अभाविपला शनिवारवाड्यापासून कौन्सिल हॉलपर्यंत मोर्चा काढण्यास परवानगी दिली जाते. पोलिसांकडून हा दुजाभाव दाखवला जात असल्याचा आरोपही एसएफआयच्या कार्यकर्त्यांनी केला.एसएफआय संघटनेस संभाजी ब्रिगेड, आयसा, डाप्सा, सम्यक् विद्यार्थी आंदोलन आदी संघटनांनी पाठिंबा दिला. सर्व संघटनांनी भाजपाचे आमदार प्रशांत परिचारक यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध केला.>पोलिसांवर राजकीय दबावविद्यापीठाच्या मुख्य द्वारापासून ते मुख्य इमारतीपर्यंत रॅली काढण्यासाठी मागच्या आठवड्यात पोलिसांची परवानगी घेतली होती, मात्र सोमवारी सकाळी ११ वाजता अचानक परवानगी नाकारण्यात आली.राजकीय दबावातून ही परवानगी नाकारली जात असल्याचा आरोप भूषण राऊत या विद्यार्थ्याने केला.विद्यापीठातील अभाविपच्या कार्यकर्त्यांकडून दडपशाही व दादागिरी करून विद्यार्थ्यांवर दबाव आणला जात असल्याचा अरोप विद्यार्थी एसएफआयच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला. पोलिसांनी व विद्यापीठ प्रशासनाने विद्यापीठात निर्भीड वातावरण तयार करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणीही एसएफआयच्या कार्यकर्त्यांनी केली.>सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात चर्चा होण्यास हरकत नसली तरी चर्चा या संविधानाच्या कक्षेत राहूनच व्हायला हव्यात. विद्यार्थ्यांच्या चर्चा या वैचारिक पातळीवरच झाल्या पाहिजेत. विद्यापीठातर्फे कुठल्याही प्रकारच्या हिंसक घटनांचे समर्थन केले जाणार नाही. विद्यार्थ्यांनी समजूतदारपणा दाखवणे गरजेचे आहे. कोणत्याही घटनांमुळे विद्यापीठातील वातावरण दूषित होत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही. तरीही अशा बाबी समोर आल्या तर विद्यापीठ प्रशासनातर्फे संबंधितांवर योग्य कारवाई केली जाईल.- वासुदेव गाडे, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ >विद्यापीठातील विचार स्वातंत्र्य नष्ट होत चालले असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘सावित्री’ची लेक म्हणून बोलायला उभी असताना आज भीती वाटत आहे. आम्हाला दुसऱ्यांकडून देशभक्ती शिकवली जाते. मात्र, आम्ही कोणाला घाबरणार नाही. आम्ही वैचारिक स्वातंत्र्यासाठी उभे राहून लढा उभारू. शांततेच्या मार्गाने लोकशाहीसाठी आम्ही झगडत राहू.- एस. जी. राही, विद्यार्थी