शहरं
Join us  
Trending Stories
1
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
2
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
3
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा वापर ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
4
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
5
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
6
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
7
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
8
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
9
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
10
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
11
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
12
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
13
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
14
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
15
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
16
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
17
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
18
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
19
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
20
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य

पाणीपुरवठ्यावरून पुन्हा संघर्ष

By admin | Updated: August 5, 2016 00:52 IST

शहराला किती पाणी द्यायचे याचा कोटा ठरवून देण्याचा अधिकार कालवा समितीला आहे.

पुणे : शहराला किती पाणी द्यायचे याचा कोटा ठरवून देण्याचा अधिकार कालवा समितीला आहे. मात्र, ते पाणी शहराला दररोज द्यायचे की एक दिवसाआड हे ठरविण्याचा अधिकार महापालिकेला आहे, अशी भूमिका महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. तर शहराची पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय कालवा समितीकडून घेतला जाईल, असे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे शहराचे पाणीवाटप करायचा अधिकार अखेर कोणाला आहे, असा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये मागील वर्षी निम्माच पाणीसाठा झाल्यानंतर महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी सप्टेंबर महिन्यापासून शहराच्या पाण्यात ३० टक्के कपात करून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला. त्यामुळे आता धरणांमध्ये पुरेसा साठा झाल्यानंतर पाणीकपात रद्द करण्याचा अधिकार पालिकेलाच असला पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, मनसे, रिपाइंकडून करण्यात आली आहे. मुंबई, नवी मुंबई, कोल्हापूर येथील महापालिकांनी पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय त्यांच्यास्तरावर घेतला, मग पुणे महापालिकेलाच वेगळा न्याय लावला जात असल्याची टीका महापौर प्रशांत जगताप यांनी गुरुवारी केली. जगताप म्हणाले, ‘‘पालकमंत्र्यांना पाणीकपात रद्द करण्याचे श्रेय हवे असेल तर त्यांनी जरूर घ्यावे. मात्र, पुणेकरांना पाणी द्यावे. आता पुणेकरांनीच भाजपाचे आमदार, खासदार यांना याबाबत जाब विचारला पाहिजे. अजित पवार पालकमंत्री असताना त्यांनी धरणांमध्ये कमी पाणीसाठा असूनही शहराला दररोज पाणी दिले.’’शहराला कालवा समितीने ठरवून दिलेल्या कोेट्यानुसार शहराला पाणी दररोज द्यायचे की एकदिवसाआड हे पालिकेला ठरवू द्यावे, असे विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे म्हणाले. (प्रतिनिधी)