शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

पाणीपुरवठ्यावरून पुन्हा संघर्ष

By admin | Updated: August 5, 2016 00:52 IST

शहराला किती पाणी द्यायचे याचा कोटा ठरवून देण्याचा अधिकार कालवा समितीला आहे.

पुणे : शहराला किती पाणी द्यायचे याचा कोटा ठरवून देण्याचा अधिकार कालवा समितीला आहे. मात्र, ते पाणी शहराला दररोज द्यायचे की एक दिवसाआड हे ठरविण्याचा अधिकार महापालिकेला आहे, अशी भूमिका महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. तर शहराची पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय कालवा समितीकडून घेतला जाईल, असे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे शहराचे पाणीवाटप करायचा अधिकार अखेर कोणाला आहे, असा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये मागील वर्षी निम्माच पाणीसाठा झाल्यानंतर महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी सप्टेंबर महिन्यापासून शहराच्या पाण्यात ३० टक्के कपात करून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला. त्यामुळे आता धरणांमध्ये पुरेसा साठा झाल्यानंतर पाणीकपात रद्द करण्याचा अधिकार पालिकेलाच असला पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, मनसे, रिपाइंकडून करण्यात आली आहे. मुंबई, नवी मुंबई, कोल्हापूर येथील महापालिकांनी पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय त्यांच्यास्तरावर घेतला, मग पुणे महापालिकेलाच वेगळा न्याय लावला जात असल्याची टीका महापौर प्रशांत जगताप यांनी गुरुवारी केली. जगताप म्हणाले, ‘‘पालकमंत्र्यांना पाणीकपात रद्द करण्याचे श्रेय हवे असेल तर त्यांनी जरूर घ्यावे. मात्र, पुणेकरांना पाणी द्यावे. आता पुणेकरांनीच भाजपाचे आमदार, खासदार यांना याबाबत जाब विचारला पाहिजे. अजित पवार पालकमंत्री असताना त्यांनी धरणांमध्ये कमी पाणीसाठा असूनही शहराला दररोज पाणी दिले.’’शहराला कालवा समितीने ठरवून दिलेल्या कोेट्यानुसार शहराला पाणी दररोज द्यायचे की एकदिवसाआड हे पालिकेला ठरवू द्यावे, असे विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे म्हणाले. (प्रतिनिधी)