शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

एफआरपी न देणाऱ्या चार कारखान्यांवर जप्ती

By admin | Updated: May 11, 2016 03:54 IST

आदेश देऊनही ८० टक्के एफआरपी देण्यास टाळाटाळ करणाऱ्या चार साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय३ साखर कारखान्यांचे ऊस गाळप परवाने रद्द करण्यात आले

पुणे : आदेश देऊनही ८० टक्के एफआरपी देण्यास टाळाटाळ करणाऱ्या चार साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय३ साखर कारखान्यांचे ऊस गाळप परवाने रद्द करण्यात आले असून तर २ कारखान्यांचे गाळप परवाने निलंबित करण्यात आले आहेत. मंगळवारी झालेल्या सुनावणीमध्ये साखर आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी ही कारवाई केली.सोलापूरमधील शंकर सहकारी कारखाना, खासदार संजयकाका पाटील यांचा सांगलीतील यशवंत साखर कारखाना, माजी आमदार राजेंद्र देशमुख यांचा सांगलीतील माणगंगा साखर कारखाना आणि औरंगाबादमधील सिद्धेश्वर साखर कारखाना यांच्यावर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. या कारखान्यांचे गाळप परवाने अगोदर रद्द करण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही त्यांनी एफआरपीची थकबाकी दिली नाही. त्यामुळे आज झालेल्या सुनावणीमध्ये डॉ. शर्मा यांनी जप्तीचे आदेश दिले. सिद्धेश्वर कारखान्याने ४२ टक्केच एफआरपी दिली असून, त्यांच्याकडून ६ कोटी २४ लाख रुपये देणे बाकी आहे. सिद्धेश्वर कारखान्याने ५४ टक्केच एफआरपी दिली असून, त्यांच्याकडून १७ कोटी ८ लाख रुपये एफआरपी देणे बाकी आहे, तर यशवंत कारखान्याने ५६ टक्के एफआरपी दिली असून, त्यांच्याकडून एफआरपीपोटी १४ कोटी २१ लाख रुपये देणे बाकी आहे.सर्व थकबाकी व्याजासह वसूल करून, ती शेतकऱ्यांना देण्यासाठी या कारखान्यांनी उत्पादित केलेली साखर, मोलॅसिस आणि बगॅस यांची विक्री करावी. आवश्यकता असल्यास कारखान्यांच्या मालमत्तेचीही विक्री करावी आणि थकीत रक्कम वसूल करून, ती शेतकऱ्यांना अदा करावी, असे डॉ. शर्मा यांनी जिल्हाधिकाऱ्यांना कळविले आहे. (प्रतिनिधी)