शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

मनसेच्या मेळाव्याला सशर्त परवानगी

By admin | Updated: April 7, 2016 01:57 IST

गुढी पाडव्याला शिवाजी पार्कवर मनसेचा ‘आवाज’ घुमणार असला तरी या ‘शांतता क्षेत्र’ असलेल्या शिवाजी पार्कमध्ये ध्वनीक्षेपक वापरण्यास उच्च न्यायालयाने सक्त मनाई केली आहे

मुंबई: गुढी पाडव्याला शिवाजी पार्कवर मनसेचा ‘आवाज’ घुमणार असला तरी या ‘शांतता क्षेत्र’ असलेल्या शिवाजी पार्कमध्ये ध्वनीक्षेपक वापरण्यास उच्च न्यायालयाने सक्त मनाई केली आहे. मेळाव्यादरम्यान ध्वनी प्रदूषण नियंत्रण व नियमन, २००० चे उल्लंघन झाल्यास मनसेवर सक्त कारवाई करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि महापालिकेला दिला आहे. त्यामुळे राज ठाकरे यांना आता ‘आवाज’ चढवता येऊ शकत नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (मनसे) शिवाजी पार्कवर गुढीपाडवा मेळावा आयोजित करण्यासाठी मुंबई महापालिकेने फेब्रुवारीमध्येच परवानगी दिली आहे,तर ४ मार्च रोजी शिवाजी पार्क पोलिसांनी मेळाव्यासाठी ध्वनीक्षेपक वापरण्याची मुभा दिली. याविरुद्ध वेकॉम ट्रस्टने उच्च न्यायालयात अर्ज केला. शिवाजी पार्क ‘शांतता क्षेत्र’ जाहीर करूनही पोलिसांनी मनसेला ध्वनीक्षेपक वापरण्यास परवानगी दिली कशी? असा प्रश्न याचिकाकर्त्या ट्रस्टने उपस्थित केला. या अर्जावरील सुनावणी न्या. अभय ओक व न्या. प्रकाश नाईक यांच्या खंडपीठापुढे होती.‘कायद्यांतर्गत ‘शांतता क्षेत्रा’ मध्ये ध्वनीक्षेपक वापरणे गुन्हा आहे, असे असतानाही तुम्ही ध्वनीक्षेपक वापरण्यास परवानगी देता? तुमची (राज्य सरकार) भूमिका स्पष्ट करा,’ असे खंडपीठाने म्हटले. मात्र मुख्य सरकारी वकील पूर्णिमा कंथारिया या प्रश्नावर खंडपीठाला समाधानकारक उत्तर देऊ शकल्या नाहीत. त्यावर मनसेतर्फे ज्येष्ठ वकील व्ही. थोरात यांनी मुळातच शिवाजी पार्क ‘शांतता क्षेत्र’ म्हणून जाहीर करण्यात आले नसल्याचे खंडपीठाला सांगितले.‘तुम्हाला महापालिका आणि पोलिसांकडून ‘शांतता क्षेत्रा’च्या आधारावरच परवानगी देण्यात आली आहे. शिवाजी पार्क ‘शांतता क्षेत्र’ नाही, असे तुमचे म्हणणे असेल तर त्याअंतर्गत मिळालेल्या दोन्ही परवानगी नाकारा. पुन्हा नव्याने अर्ज करा आणि तुमचा मुद्दा सरकार आणि महापालिकेपुढे मांडा,’ असा टोलाही खंडपीठाने उच्च न्यायालयाला लगावला. या मेळाव्यादरम्यान ध्वनीक्षेपक लावणार नसून साऊंड डिस्ट्रीब्यूशन सिस्टिम वापरण्यात येईल, असे अ‍ॅड. थोरात यांनी सांगितले. ‘मेळाव्यादरम्यान नियमांचे उल्लंघन झाल्यास महापालिका आणि राज्य सरकारने कायद्यानुसार कारवाई करावी. आवश्यकता पडल्यास फौजदारी कारवाईही करावी,’ असे म्हणत खंडपीठाने राज्य सरकारला १३ एप्रिलपर्यंत कृती अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. (प्रतिनिधी)‘मेळाव्यादरम्यान नियमांचे उल्लंघन झाल्यास महापालिका आणि राज्य सरकारने कायद्यानुसार कारवाई करावी. आवश्यकता पडल्यास फौजदारी कारवाईही करावी,’ असे म्हणत खंडपीठाने राज्य सरकारला १३ एप्रिलपर्यंत कृती अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.