शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
5
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
6
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
7
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
8
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
9
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
10
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
11
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
12
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
13
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
14
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
15
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
16
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
17
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
18
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
19
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
20
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला

विकासकामुळे मनोरुग्णाचे हाल

By admin | Updated: June 21, 2015 01:28 IST

सुविधांवरून विकासकासोबत सुरू असलेल्या वादात मनोरुग्णाचा सांभाळ करणाऱ्या कुटुंबाला गेली दहा वर्षे हाल सोसावे लागत आहेत.

नवी मुंबई : सुविधांवरून विकासकासोबत सुरू असलेल्या वादात मनोरुग्णाचा सांभाळ करणाऱ्या कुटुंबाला गेली दहा वर्षे हाल सोसावे लागत आहेत. १५० सदनिका असलेल्या या इमारतीमध्ये वीज, पाणी अथवा इतर कसलीही सुविधा नसतानाही नरकयातना सोसत हे कुटुंब तिथे वास्तव्य करत आहे.सीबीडी सेक्टर १५ येथील संजीवन इमारतीमध्ये नवव्या मजल्यावर गेल्या १० वर्षांपासून एक कुटुंब वास्तव्याला आहे. रिशव पटेल हे विकासकाच्या त्रासाचा सामना करत तिथेच वास्तव्य करत आहेत. या काळात त्यांच्या घराची वीज व पाणीपुरवठा देखील खंडित केलेला आहे. त्यामुळे घरातील सदस्यांना नऊ मजले चढून पाणी भरावे लागत आहे. या नरकयातनेतून सुटका मिळवण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले, तर काही समाजसेवी संस्थांनाही संपर्क साधला. त्यापैकीच एका संस्थेने त्यांना खोट्या प्रकरणात गुंतवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप या कुटुंबाने केला आहे. राज पटेल (२२) हा त्या कुटुंबातील तरुण मानसिक रुग्ण आहे. आजारपणात मानसिक संतुलन बिघडल्यानंतर तो स्वत:ला दुखापत करून दुसऱ्यांवर देखील हल्ला करतो. त्याने यापूर्वी असे प्रयत्नही केल्याचे त्याची बहीण रिया पटेल यांनी सांगितले. त्यामुळे दहाव्या मजल्यावरील त्यांच्याच एका घरामध्ये राजला स्वतंत्र ठेवले आहे. यादरम्यान उपचारासह त्याला वेळेवर जेवणही दिले जायचे, असेही त्यांनी सांगितले. मात्र दरम्यानच्या काळात या कुटुंबावर आर्थिक संकट कोसळल्याने त्यांना जगणेही असह्य झाले आहे. त्यावरही मात करत हे कुटुंब कसेबसे जगत असताना त्यांना नव्या संकटाला सामोरे जावे लागले आहे.मदतीसाठी हाक दिलेल्या संस्थेनेच पोलिसांना सोबत घेऊन त्यांच्या घरावर छापा टाकला. सदर कुटुंबाने राज याला जबरदस्तीने डांबून ठेवले असल्याचे सांगत त्याच्या कुटुंबावर आरोप केला. त्यानुसार सीबीडी पोलिसांनीही कर्तव्याचा भाग म्हणून राज याला ताब्यात घेतले. परंतु चौकशीत त्याचा मानसिक आजार असल्याने वेगळे ठेवल्याचे समोर आले. त्याच्या उपचाराची आवश्यक वैद्यकीय कागदपत्रेही कुटुंबाकडे असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मीरा बनसोडे यांनी सांगितले. त्यामुळे संस्थेकडून कुटुंबावर झालेल्या आरोपात तथ्य नसल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र या प्रकाराचा मानसिक त्रास पटेल कुटुंबाला झाला. त्यांनी घर सोडावे याकरिता यापूर्वीही त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारे दबाव टाकण्यात आला. तसेच वडिलांना खोट्या गुन्ह्यात गुंतवल्याचेही रिया पटेल यांनी सांगितले. तर राजला डांबले असते तर त्याचा उपचार केला नसता अथवा जेवणही दिले नसते. शिवाय त्याला जाणीवपूर्वक वेगळ्या खोलीत ठेवले नसल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे संस्थेकडून झालेल्या मनस्तापाची तक्रार करणार असल्याचेही रिया पटेल यांनी सांगितले. (प्रतिनिधी)