शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
3
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
4
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
5
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
6
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
7
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
8
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
9
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
10
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
11
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
12
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
13
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
14
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
15
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
16
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
17
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
18
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
19
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
20
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा

देशभर उभारणार कॉँक्रिटचे रस्ते

By admin | Updated: January 24, 2015 01:39 IST

देशामध्ये दरवर्षी ५ लाख अपघात होतात, त्यामध्ये साधारणपणे दीड लाख लोकांचे बळी जातात. तर ३ लाख जणांना अपंगत्व येते.

पुणे : देशामध्ये दरवर्षी ५ लाख अपघात होतात, त्यामध्ये साधारणपणे दीड लाख लोकांचे बळी जातात. तर ३ लाख जणांना अपंगत्व येते. यातील ७० टक्के अपघात चालकाच्या चुकीमुळे होत असल्याचे अहवाल सांगतो; मात्र मला तो अहवाल मान्य नाही. देशातील रस्त्यांची रचना व्यवस्थित नाही, त्यांची स्थिती अत्यंत वाईट आहे, यामुळेच मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत, असे स्पष्ट प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी केले.आॅटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन आॅफ इंडिया (एआरएआय) या संस्थेतर्फे आयोजित ‘आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान परिषदे’च्या समारोपप्रसंगी गडकरी बोलत होते. देशभरातील अपघातप्रवण क्षेत्रांची यादी तयार करण्यात आली असून, त्या ठिकाणी रस्त्यांमध्ये असलेल्या त्रुटी दूर करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. संसदेच्या पुढच्या अधिवेशनामध्ये ‘रस्ते सुरक्षा’ विधेयक आणले जाणार आहे. देशभरातील रस्ते सिमेंट-काँक्रिटचे बनविण्याचे लक्ष्य आहे. त्यानंतर अनेक वर्षे रस्त्यांच्या देखभालीचा प्रश्नच राहणार नाही. त्याकरिता २७ जानेवारीला ४० सिमेंट कंपन्यांशी करार करण्यात येणार असून, १२० रुपयांमध्ये सिमेंट बॅग उपलब्ध होणार आहे, असे ते म्हणाले. देशातील ३० टक्के वाहन परवाने (लायसन्स) बोगस आहेत. वाहन चालविण्याच्या प्रशिक्षणासंदर्भात देशभर १० हजार इन्स्टिट्यूटची निर्मिती केली जात आहे. यापुढे संगणकाद्वारे वाहनचालकांची चाचणी घेतली जाणार आहे, असे गडकरी म्हणाले.च्जमीन तसेच पाण्यावर चालणाऱ्या बस परदेशातून खरेदी केल्यास त्याचे तिकीटदर आपल्याला परवाडणार नाहीत. त्यामुळे देशातच अशा बसची निर्मिती होण्याची गरज आहे. आॅटोमोटिव्ह क्षेत्रातील शास्त्रज्ञांनी त्यासाठी पुढाकार घ्यावा. नवे तंत्रज्ञान हे स्वीकारावेच लागेल, एकतर ते तुम्ही इथे तयार करा नाहीतर ते बाहेरून मागवावे लागेल. संशोधकांना आता जास्त वेळ देता येणार नाही. जो पळू शकणार नाही त्याला बाहेरचा रस्ता दाखविला जाईल, असे गडकरी यांनी स्पष्ट केले.जलवाहतुकीला प्राधान्य रस्ते, रेल्वे व जल वाहतूक यामध्ये जल वाहतूक ही सर्वांत किफायतशीर आहे. रस्ते वाहतुकीला प्रतिकिलोमीटर दीड रुपया, रेल्वे वाहतुकीला एक रुपया तर जल वाहतुकीला केवळ ३० पैसे खर्च येतो. काही दिवसांत नवीन १०१ वॉटरवेज तयार केले जाणार असल्याची माहिती गडकरी यांनी दिली.