शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
5
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
6
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
7
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
8
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
9
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
10
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
11
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
12
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
13
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
14
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
15
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
16
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
17
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
18
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
19
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
20
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

देशभर उभारणार कॉँक्रिटचे रस्ते

By admin | Updated: January 24, 2015 01:39 IST

देशामध्ये दरवर्षी ५ लाख अपघात होतात, त्यामध्ये साधारणपणे दीड लाख लोकांचे बळी जातात. तर ३ लाख जणांना अपंगत्व येते.

पुणे : देशामध्ये दरवर्षी ५ लाख अपघात होतात, त्यामध्ये साधारणपणे दीड लाख लोकांचे बळी जातात. तर ३ लाख जणांना अपंगत्व येते. यातील ७० टक्के अपघात चालकाच्या चुकीमुळे होत असल्याचे अहवाल सांगतो; मात्र मला तो अहवाल मान्य नाही. देशातील रस्त्यांची रचना व्यवस्थित नाही, त्यांची स्थिती अत्यंत वाईट आहे, यामुळेच मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत, असे स्पष्ट प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी केले.आॅटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन आॅफ इंडिया (एआरएआय) या संस्थेतर्फे आयोजित ‘आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान परिषदे’च्या समारोपप्रसंगी गडकरी बोलत होते. देशभरातील अपघातप्रवण क्षेत्रांची यादी तयार करण्यात आली असून, त्या ठिकाणी रस्त्यांमध्ये असलेल्या त्रुटी दूर करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. संसदेच्या पुढच्या अधिवेशनामध्ये ‘रस्ते सुरक्षा’ विधेयक आणले जाणार आहे. देशभरातील रस्ते सिमेंट-काँक्रिटचे बनविण्याचे लक्ष्य आहे. त्यानंतर अनेक वर्षे रस्त्यांच्या देखभालीचा प्रश्नच राहणार नाही. त्याकरिता २७ जानेवारीला ४० सिमेंट कंपन्यांशी करार करण्यात येणार असून, १२० रुपयांमध्ये सिमेंट बॅग उपलब्ध होणार आहे, असे ते म्हणाले. देशातील ३० टक्के वाहन परवाने (लायसन्स) बोगस आहेत. वाहन चालविण्याच्या प्रशिक्षणासंदर्भात देशभर १० हजार इन्स्टिट्यूटची निर्मिती केली जात आहे. यापुढे संगणकाद्वारे वाहनचालकांची चाचणी घेतली जाणार आहे, असे गडकरी म्हणाले.च्जमीन तसेच पाण्यावर चालणाऱ्या बस परदेशातून खरेदी केल्यास त्याचे तिकीटदर आपल्याला परवाडणार नाहीत. त्यामुळे देशातच अशा बसची निर्मिती होण्याची गरज आहे. आॅटोमोटिव्ह क्षेत्रातील शास्त्रज्ञांनी त्यासाठी पुढाकार घ्यावा. नवे तंत्रज्ञान हे स्वीकारावेच लागेल, एकतर ते तुम्ही इथे तयार करा नाहीतर ते बाहेरून मागवावे लागेल. संशोधकांना आता जास्त वेळ देता येणार नाही. जो पळू शकणार नाही त्याला बाहेरचा रस्ता दाखविला जाईल, असे गडकरी यांनी स्पष्ट केले.जलवाहतुकीला प्राधान्य रस्ते, रेल्वे व जल वाहतूक यामध्ये जल वाहतूक ही सर्वांत किफायतशीर आहे. रस्ते वाहतुकीला प्रतिकिलोमीटर दीड रुपया, रेल्वे वाहतुकीला एक रुपया तर जल वाहतुकीला केवळ ३० पैसे खर्च येतो. काही दिवसांत नवीन १०१ वॉटरवेज तयार केले जाणार असल्याची माहिती गडकरी यांनी दिली.